शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आधी शहिदांना श्रद्धांजली आणि मगच घातली वरमाला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 16:32 IST

जन्मभूमीच्या संरक्षणार्थ धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका जोडप्याने पहिल्यांदा हुतात्म्यांना वंदन करून मगच लग्न करणे पसंत केले आहे.

पुणे : जन्मभूमीच्या संरक्षणार्थ धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका जोडप्याने पहिल्यांदा हुतात्म्यांना वंदन करून मगच लग्न करणे पसंत केले आहे. त्यांच्या या कृतीची चर्चा सध्या पुण्यातल्या पंचक्रोशीत रंगली असून समाज माध्यमात त्यांचा फोटो व्हायरल होत आहे. 

   याबाबत अधिक माहिती अशी की, कुंजीरवाडी येथील  सोमनाथ गिरे यांची कन्या शीतल व आळंदी म्हातोबाची येथील  मधुकर जवळकर यांचे चिरंजीव रोहन यांचा विवाह काही दिवसांपूर्वी पार पडला. यातून वधू शीतलचे काका अण्णासाहेब गिरे हे केंद्रीय राखीव दलात जवान म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आणि कुटुंबीयांनी पुलवामा येथील हल्ला आणि गडचिरोली येथील हल्ला या घटनांनी व्यथित होऊन लग्न अत्यंत साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला. त्याही पुढे जात नव परिणीत दाम्पत्याने आधी शहिदांना वंदन करून मगच पुढील विधी केले. त्यांचे हे फोटो सध्या व्हायरल झाले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विवाहप्रसंगी विविध सामाजिक व राजकीय मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :marriageलग्नpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाnaxaliteनक्षलवादीSoldierसैनिक