शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

ग्रामविकास विभागाच्या निवडणूक आयोगाचा संदर्भ देऊन बदल्या; बारामतीच्या वकीलांनी तक्रारीची आयोगाकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 15:06 IST

आयोगाने बदल्या बाबत दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही न करणाऱ्या, वाईट विचारांनी प्रेरित असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी

बारामती : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने नुकत्याच निवडणूक आयोगाच्या संदर्भ देऊन बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र सदर अधिकारी प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रियेत आहेत का, याची खात्री केलेली नाही. बहुतांशी अधिकाऱ्यांना नियुक्तीच्या ठिकाणी ३ वर्षे कालावधी सदर ठिकाणी पूर्ण झालेला नाही. निवडणूक कर्तव्यात नियुक्ती झालेली नाही. काही अधिकाऱ्यांना सदर ठिकाणी फक्त काही महिने सेवा पूर्ण केली आहे. असे असतानाही बदली करण्यात आली आहे. याबाबत बारामतीचे वकील अॅड तुषार झेंडे पाटील यांनी थेट निवडणुक आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची निवडणुक आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकाराची चाैकशी सुरु करण्यात आली आहे.

अॅड झेंडे पाटील यांनी ‘मेल’द्वारे तक्रार केली आहे. त्यानुसार ग्रामविकास विभागाने निवडणूक आयोगाच्या पत्राचा चुकीचे अर्थ काढून नव्हे तर लावून पद व अधिकाराचा दुरोपयोग करून स्वतःचा व इतरांचा फायद करून दिला आहे का? अशी शंका येतेच. कृपया याची गांभीर्याने दखल घ्यावी. सर्व बदल्या तात्काळ रद्द करुन सखोल चौकशी विशेष पथका मार्फत करावी,अशी मागणी केली आहे.

निवडणुकीच्या काळात मतदारांवर प्रभाव असणारा अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात स्वजिल्ह्यात कार्यरत असलेल्या अधिका-यांवर मेहर नजर दाखवली आहे. महाराष्ट्र विकास सेवा गट अ-ब मधील स्वजिल्ह्यातील अधिका-यांच्या‌ बदल्या का केल्या नाहीत, असा सवाल अॅड झेंडे यांनी उपस्थित केला आहे. याची गंभीर दखल घेऊन तात्काळ सर्व बदल्या रद्द कराव्यात, या कार्यासनातील सर्व संबंधितांना तात्काळ सदर हटविण्यात येऊन सखोल चौकशी करावी. जे अधिकारी स्वजिल्ह्यात आहेत, तर काही अधिकारी तीन वर्षे कालावधी पूर्ण केला आहे. अशा बदल्या राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी आयोगाच्या नियंत्रणाखाली ठेवून संबंधित सर्वांना समुपदेशनाचे पदस्थापना देण्यात यावी. मतदारांवर प्रभाव पाडता येणार नाही. यामुळे आयोगा विषयी सकारात्मक संदेश जनतेपर्यंत पोहचू शकतो. आयोगाने बदल्या बाबत दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही न करणाऱ्या, वाईट विचारांनी प्रेरित असलेल्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी. यामुळे भविष्यात निवडणूक प्रक्रियेचा फायदा घेऊन बदल्यांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी मार्गदर्शक सुचनांचा पायंडा पाडला जाईल. याची सहानुभूती पूर्वक नोंद घ्यावी, अशी मागणी वकीलांनी केली आहे.

याबाबत अॅड तुषार झेंडे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले कि, या तक्रारीची निवडणुक आयोगाने दखल घेतली आहे. याबाबत चाैकशी सुरु करण्यात आली आहे. याप्रकरणी उपलब्ध पुरावे देखील देण्याची सुचना आयोगाने केल्याचे  अॅड झेेेंडे पाटील म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBaramatiबारामतीElectionनिवडणूकVotingमतदान