शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

Railway News: पुण्याहून धावणाऱ्या रेल्वेला आता सुरक्षेचे 'कवच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 21:03 IST

रेल्वे मंत्रालय रेल्वे गाड्या वेगवान करण्याबरोबरच त्या अधिक सुरक्षित करण्यालादेखील प्राधान्य देत आहे

प्रसाद कानडे

पुणे : पुण्याहून धावणाऱ्या रेल्वेचा प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे. कारण रेल्वे प्रशासनाने दिल्ली- मुंबईसह मुंबई- चेन्नई मार्गावर ‘कवच’ यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. कवच ही अपघात रोखणारी यंत्रणा असून, ती रेल्वे मार्गासह इंजिनमध्येदेखील कार्यान्वित केली जाणार आहे. देशातील चार प्रमुख मार्गांवर ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. सध्या मुंबई-चेन्नई मार्गावर टेस्टिंगचे काम सुरू असून, लवकरच ती कार्यान्वित करण्याची शक्यता आहे.रेल्वे मंत्रालय रेल्वे गाड्या वेगवान करण्याबरोबरच त्या अधिक सुरक्षित करण्यालादेखील प्राधान्य देत आहे. त्यासाठीच कवच ही यंत्रणा लागू केली जात आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात देशातील २००० किलोमीटर मार्गावर कवच लागू करण्याचा निर्णय घेतला. यात दिल्ली-मुंबईचा समावेश आहे. तसेच मुंबई- चेन्नई व चेन्नई-कोलकाता मार्गावरदेखील कवच असणार आहे. देशातील सुवर्ण चतुष्कोन रेल्वेमार्गावर ही सुविधा असणार आहे.

कवच म्हणजे काय ?

रेल्वेच्या इंजिनमध्ये टीसीएएस (ट्रेन कॉलेजन अव्हॉइड सिस्टीम) ही प्रणाली बसविली जाईल. हे स्पॉट सिग्नलला वायरलेसद्वारे जोडले गेले असणार आहे. यासाठी स्थानकांवर पहिल्यांदाच कम्युनिकेशन टॉवर उभारला जाईल. याच्यामार्फत गाडी वेगाने धावत असलेल्या गाडीने जर सिग्नल लाल असताना जर सिग्नल मोडला तर आपोआप ब्रेक लागून गाडी थांबेल, त्यामुळे पुढचा अपघात टळणार आहे. तसेच हे करीत असताना सहायक रेल्वे चालकाला स्पॉट सिग्नल पाहण्याची गरज नाही. कारण कॅबमध्येच स्क्रीनवर पुढचा सिग्नल कोणता असणार आहे, हे आधीच कळेल, त्यामुळे गाडी थांबवायची की नाही, हे आधीच चालकाला ठरविणे सोपे होणार आहे. यामुळे वेगात सातत्य राहण्यास मदत होणार आहे.

''रेल्वे प्रवास सुरक्षित होण्यासाठी कवच प्रणाली लागू असणार आहे. यासाठी प्रत्येक स्थानकावर स्वतंत्र कम्युनिकेशन टॉवर उभे केले जाईल. याच्या माध्यमातून जर रेल्वे चालक सिग्नल ब्रेक करून पुढे गेला, तर आपोआप रेल्वे थांबेल असे उमेश बोलांडे (कार्यकारी संचालक, टेलिकॉम विभाग, रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली) यांनी सांगितले.'' 

''देशातील प्रमुख रेल्वे मार्गांवर ‘कवच’ ही प्रणाली काम करेल. यात मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गाचादेखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याहून धावणाऱ्या गाड्यांना देखील कवचचा फायदा होईल. वेगवान प्रवासाबरोबरच तो अधिक सुरक्षित देखील होणार आहे असे शिवाजी सुतार (मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई) यांनी सांगितले.'' 

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीSocialसामाजिकGovernmentसरकार