शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Railway News: पुण्याहून धावणाऱ्या रेल्वेला आता सुरक्षेचे 'कवच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 21:03 IST

रेल्वे मंत्रालय रेल्वे गाड्या वेगवान करण्याबरोबरच त्या अधिक सुरक्षित करण्यालादेखील प्राधान्य देत आहे

प्रसाद कानडे

पुणे : पुण्याहून धावणाऱ्या रेल्वेचा प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे. कारण रेल्वे प्रशासनाने दिल्ली- मुंबईसह मुंबई- चेन्नई मार्गावर ‘कवच’ यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. कवच ही अपघात रोखणारी यंत्रणा असून, ती रेल्वे मार्गासह इंजिनमध्येदेखील कार्यान्वित केली जाणार आहे. देशातील चार प्रमुख मार्गांवर ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. सध्या मुंबई-चेन्नई मार्गावर टेस्टिंगचे काम सुरू असून, लवकरच ती कार्यान्वित करण्याची शक्यता आहे.रेल्वे मंत्रालय रेल्वे गाड्या वेगवान करण्याबरोबरच त्या अधिक सुरक्षित करण्यालादेखील प्राधान्य देत आहे. त्यासाठीच कवच ही यंत्रणा लागू केली जात आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात देशातील २००० किलोमीटर मार्गावर कवच लागू करण्याचा निर्णय घेतला. यात दिल्ली-मुंबईचा समावेश आहे. तसेच मुंबई- चेन्नई व चेन्नई-कोलकाता मार्गावरदेखील कवच असणार आहे. देशातील सुवर्ण चतुष्कोन रेल्वेमार्गावर ही सुविधा असणार आहे.

कवच म्हणजे काय ?

रेल्वेच्या इंजिनमध्ये टीसीएएस (ट्रेन कॉलेजन अव्हॉइड सिस्टीम) ही प्रणाली बसविली जाईल. हे स्पॉट सिग्नलला वायरलेसद्वारे जोडले गेले असणार आहे. यासाठी स्थानकांवर पहिल्यांदाच कम्युनिकेशन टॉवर उभारला जाईल. याच्यामार्फत गाडी वेगाने धावत असलेल्या गाडीने जर सिग्नल लाल असताना जर सिग्नल मोडला तर आपोआप ब्रेक लागून गाडी थांबेल, त्यामुळे पुढचा अपघात टळणार आहे. तसेच हे करीत असताना सहायक रेल्वे चालकाला स्पॉट सिग्नल पाहण्याची गरज नाही. कारण कॅबमध्येच स्क्रीनवर पुढचा सिग्नल कोणता असणार आहे, हे आधीच कळेल, त्यामुळे गाडी थांबवायची की नाही, हे आधीच चालकाला ठरविणे सोपे होणार आहे. यामुळे वेगात सातत्य राहण्यास मदत होणार आहे.

''रेल्वे प्रवास सुरक्षित होण्यासाठी कवच प्रणाली लागू असणार आहे. यासाठी प्रत्येक स्थानकावर स्वतंत्र कम्युनिकेशन टॉवर उभे केले जाईल. याच्या माध्यमातून जर रेल्वे चालक सिग्नल ब्रेक करून पुढे गेला, तर आपोआप रेल्वे थांबेल असे उमेश बोलांडे (कार्यकारी संचालक, टेलिकॉम विभाग, रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली) यांनी सांगितले.'' 

''देशातील प्रमुख रेल्वे मार्गांवर ‘कवच’ ही प्रणाली काम करेल. यात मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गाचादेखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याहून धावणाऱ्या गाड्यांना देखील कवचचा फायदा होईल. वेगवान प्रवासाबरोबरच तो अधिक सुरक्षित देखील होणार आहे असे शिवाजी सुतार (मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई) यांनी सांगितले.'' 

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीSocialसामाजिकGovernmentसरकार