शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Railway News: पुण्याहून धावणाऱ्या रेल्वेला आता सुरक्षेचे 'कवच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 21:03 IST

रेल्वे मंत्रालय रेल्वे गाड्या वेगवान करण्याबरोबरच त्या अधिक सुरक्षित करण्यालादेखील प्राधान्य देत आहे

प्रसाद कानडे

पुणे : पुण्याहून धावणाऱ्या रेल्वेचा प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे. कारण रेल्वे प्रशासनाने दिल्ली- मुंबईसह मुंबई- चेन्नई मार्गावर ‘कवच’ यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. कवच ही अपघात रोखणारी यंत्रणा असून, ती रेल्वे मार्गासह इंजिनमध्येदेखील कार्यान्वित केली जाणार आहे. देशातील चार प्रमुख मार्गांवर ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. सध्या मुंबई-चेन्नई मार्गावर टेस्टिंगचे काम सुरू असून, लवकरच ती कार्यान्वित करण्याची शक्यता आहे.रेल्वे मंत्रालय रेल्वे गाड्या वेगवान करण्याबरोबरच त्या अधिक सुरक्षित करण्यालादेखील प्राधान्य देत आहे. त्यासाठीच कवच ही यंत्रणा लागू केली जात आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात देशातील २००० किलोमीटर मार्गावर कवच लागू करण्याचा निर्णय घेतला. यात दिल्ली-मुंबईचा समावेश आहे. तसेच मुंबई- चेन्नई व चेन्नई-कोलकाता मार्गावरदेखील कवच असणार आहे. देशातील सुवर्ण चतुष्कोन रेल्वेमार्गावर ही सुविधा असणार आहे.

कवच म्हणजे काय ?

रेल्वेच्या इंजिनमध्ये टीसीएएस (ट्रेन कॉलेजन अव्हॉइड सिस्टीम) ही प्रणाली बसविली जाईल. हे स्पॉट सिग्नलला वायरलेसद्वारे जोडले गेले असणार आहे. यासाठी स्थानकांवर पहिल्यांदाच कम्युनिकेशन टॉवर उभारला जाईल. याच्यामार्फत गाडी वेगाने धावत असलेल्या गाडीने जर सिग्नल लाल असताना जर सिग्नल मोडला तर आपोआप ब्रेक लागून गाडी थांबेल, त्यामुळे पुढचा अपघात टळणार आहे. तसेच हे करीत असताना सहायक रेल्वे चालकाला स्पॉट सिग्नल पाहण्याची गरज नाही. कारण कॅबमध्येच स्क्रीनवर पुढचा सिग्नल कोणता असणार आहे, हे आधीच कळेल, त्यामुळे गाडी थांबवायची की नाही, हे आधीच चालकाला ठरविणे सोपे होणार आहे. यामुळे वेगात सातत्य राहण्यास मदत होणार आहे.

''रेल्वे प्रवास सुरक्षित होण्यासाठी कवच प्रणाली लागू असणार आहे. यासाठी प्रत्येक स्थानकावर स्वतंत्र कम्युनिकेशन टॉवर उभे केले जाईल. याच्या माध्यमातून जर रेल्वे चालक सिग्नल ब्रेक करून पुढे गेला, तर आपोआप रेल्वे थांबेल असे उमेश बोलांडे (कार्यकारी संचालक, टेलिकॉम विभाग, रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली) यांनी सांगितले.'' 

''देशातील प्रमुख रेल्वे मार्गांवर ‘कवच’ ही प्रणाली काम करेल. यात मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गाचादेखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याहून धावणाऱ्या गाड्यांना देखील कवचचा फायदा होईल. वेगवान प्रवासाबरोबरच तो अधिक सुरक्षित देखील होणार आहे असे शिवाजी सुतार (मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई) यांनी सांगितले.'' 

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीSocialसामाजिकGovernmentसरकार