शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
2
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
3
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
4
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
5
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
6
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
7
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
8
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
9
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
10
चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी दररोज किती पाणी प्यावं? डर्मेटोलॉजिस्टने दिलं अचूक उत्तर
11
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
12
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
13
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
14
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
15
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
16
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
17
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
18
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
19
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
20
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलर- पिकअप टेम्पोचा भीषण अपघात, एक ठार, पाच जखमी; पिकअप टेम्पोला रॉडने फरफटत नेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 22:36 IST

पघातानंतर ट्रेलर चालक वाहनासह पसार झाला. जखमींना तळेगाव स्टेशन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

 

तळेगाव दाभाडे : गणेश विसर्जन उरकून गावाहून मुंबईकडे जाणाऱ्या दोन पिकअप टेम्पोला ट्रेलरची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर एका चिमुरड्यासह पाच जण जखमी झाले आहेत. हा अपघात तळेगाव चाकण महामार्गावरील माळवाडी येथे रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास झाला. अपघातानंतर ट्रेलर चालक वाहनासह पसार झाला. जखमींना तळेगाव स्टेशन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.शालूबाई विष्णू गुंड (वय ६७, रा. कामवठे, पनवेल, नवी मुंबई, मूळ रा. वडगाव दर्या, ता. पारनेर जि. अहिल्यानगर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा स्वप्निल विष्णू गुंड (वय ३४) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे त्याच्यावर उपचार करणारे डॉ. अजित माने यांनी सांगितले. स्वप्निल गुंड हा पिकअप चालक आहे. संदेश हरिश्चंद्र ढेरे (१९), रंगनाथ गंगाराम आहेर (३६), शीतल रंगनाथ आहेर (३४ वर्षे), शिवांश रंगनाथ आहेर (वय- ५ वर्षे, सर्व रा. कामवठे, पनवेल, नवी मुंबई, मूळ रा. आणे, ता. जुन्नर, जि. पुणे) अशी अपघातातील अन्य जखमींची नावे आहेत.

ट्रेलरच्या बाहेर आलेल्या लोखंडी सामानाने पिकअप टेम्पोला फरफटत नेले. ट्रेलरमधील लोखंडी सामान रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले होते. या भीषण अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात आली. या अपघातात पिकअप टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज चौधरी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

गुंड, आहेर, ढेरे कुटुंबावर काळाचा घाला:गुंड, आहेर, ढेरे परिवारातील सदस्य आळेफाटा येथून मुंबईकडे दोन पिकअप टेम्पोमधून चालले होते. व्यवसायानिमित्त ते मुंबईला स्थायिक आहेत. गणेशोत्सवानिमित्त ते गावी आले होते. गावाहून मुंबईकडे जात असता माळवाडी या ठिकाणी पिकअप टेम्पो आला . मात्र त्याचवेळी मध्यरात्री त्यांच्यावर काळाने घाला घातला.या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या दहा वर्षांत या महामार्गावर एक हजारहून अधिक जणांचे हकनाक बळी गेले आहेत. तर काही जण जायबंदी झाले आहेत. किरकोळ अपघातांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. मात्र त्याची नोंद होत नाही. महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेल्या या चारपदरी रस्त्याचे लवकरात लवकर रुंदीकरण व्हावे . त्यामुळे या ५३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील कामगार, विद्यार्थी आणि वाहनचालकांना दिलासा मिळेल.- दिलीप डोळस, उपाध्यक्ष, तळेगाव- चाकण शिक्रापूर महामार्ग कृती समिती

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू