शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

काही सेकंदाची घाई कशासाठी भावा? वेळ नव्हे, जीव महत्त्वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 15:25 IST

सहा महिन्यांत ३७ हजार वाहनांनी तोडले सिग्नल....

पुणे : वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांची संख्या पुण्यात दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करतात; पण शेवटी काही सेकंदांच्या घाईमुळे आपला जीव जाऊ शकतो हे भान वाहनधारकांना राहत नाही. यामुळे किरकोळ अपघातांसह गंभीर अपघात देखील होण्याचा धोका अधिक असतो. तसेच सिग्नल यंत्रणा ही वाहतुकीचे नियोजन चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी उभारलेली असते. मात्र पुणेकर मात्र सिग्नलही जुमानत नसल्याचे पोलिसांनी कारवाई केलेल्या वाहनांच्या आकडेवारीवरून सिद्ध होते. त्यामुळे वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.

सहा महिन्यांत ३७ हजार वाहनांनी तोडले सिग्नल

पुणे शहर वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते ११ ऑगस्ट या कालावधीत ३७ हजार ७ वाहनधारकांनी सिग्नल तोडला आहे. यात काहींनी तर एकापेक्षा अधिक वेळा सिग्नल तोडला असल्याचे त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईवरून सिद्ध होत आहे.

दंड किती ?

पहिल्यांदा सिग्नल तोडल्यावर वाहतूक पोलिसांकडून ५०० रुपये दंड आकारण्यात येतो. यानंतर मात्र पुुन्हा जेवढ्या वेळी वाहन चालक सिग्नल तोडणार त्याला प्रत्येकवेळी १५०० रुपये दंड ठोठावण्यात येतो.

सात महिन्यात भरला १ कोटी ९४ लाख रुपयांचा दंड

सिग्नल तोडलेल्या ३७ हजार ७ वाहनधारकांनी ११ ऑगस्टपर्यंत १ कोटी ९२ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा दंड भरला आहे. सिग्नल तोडणाऱ्यांपैकी ६३२ जणांनी १५०० रुपयांप्रमाणे दंड भरला असल्याचे देखील यावरून सिद्ध होते.

अपघाताची शक्यता वाढते

पुणेकरांमध्ये सिग्नल तोडण्याची जणू स्पर्धाच लागली असल्याचे दिसून येते. काही मिनिटे सिग्नलवर थांबण्यास वाहनचालक तयार नसतात. पण यामुळे ज्या रोडवरील सिग्नल सुटला आहे ती वाहने भरधाव जात असताना आपण सिग्नल तोडला तर गंभीर अपघात होऊ शकतो. जीव जाऊ शकतो याचे भान वाहनचालकांना नसते. मुळात जर आपण नियमांचे पालन केले तर दंडही भरावा लागणार नाही आणि अपघातही होणार नाही.

नागरिकांनी वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे असते. आम्ही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करतो; पण वाहनचालकांच्या घाईमुळे गंभीर अपघात झाला तर ते जीवावर बेतू शकते, यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

- राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीस