शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

Manikrao Kokate: शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला व्यापारी, बाजार समित्या जबाबदार; कोकाटेंची घणाघाती टीका

By नितीन चौधरी | Updated: February 24, 2025 18:09 IST

शेतकऱ्याला हमखास भाव मिळेल याची शाश्वती राहिली नसल्याने शेतकरी शेतमाल रस्त्यावर फेकून देतात आणि सरकारवर रोषही व्यक्त करतात

पुणे : एखाद्या पिकाची लागवड केल्यानंतर त्यातून शेतकऱ्याला हमखास भाव मिळेल याची शाश्वती राहिली नसल्याने शेतकरी शेतमाल रस्त्यावर फेकून देतात. सरकारवर रोषही व्यक्त करतात. त्यात शेतकऱ्यांचा दोष नसून बाजारातील अस्थिरता कारणीभूत आहे. ही अस्थिरता दूर झाली पाहिजे. याला केवळ व्यापारी आणि बाजार समिती जबाबदार असल्याची घणाघाती टीका कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. त्यासाठी बाजार समितीमधील व्यापाऱ्यांची नोंदणी बंधनकारक करावी, असेही ते म्हणाले.

पणन विभागातर्फे आयोजित राज्यातील बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत ते बोलत होते. यावेळी पणनमंत्री जयकुमार रावल, आमदार दिलीप बनकर, अनुराधा चव्हाण, माजी खासदार देवीदास पिंगळे, सहकार आयुक्त दीपक तावरे, पणन संचालक विकास रसाळ, पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम उपस्थित होते.

कृषी विभागाचा आत्मा बाजार समित्या आहेत. शेतकरी विक्री व्यवस्थेवर अवलंबून असल्याने ती नीट न असल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात काय वाईट दिवस येतात, त्याची कल्पना न केलेली बरी. मागणी व पुरवठ्यातील तफावतीमुळे भाव पडतात आणि शेतकरी अस्थिर होतो. बांधावरील खरेदीत व्यापाऱ्यांवर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे शेतकरी लुटला जात असून, सर्व व्यापाऱ्यांना बाजार समितीमध्ये नोंदणी बंधनकारक करावी, असेही कोकाटे म्हणाले. व्यापारी मोकळा कसा सुटू शकतो, शेतकऱ्यांची फसवणूक कशी करू शकतो, असा सवाल करत व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये अनामत रक्कम जमा करावी, असे त्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनी किती माल विकला, किती पैसे परत दिले, किती माल शिल्लक आहे याची तपासणी देखील बाजार समितीने करावी. हे केल्याशिवाय व्यापारी सरळ होणार नाहीत, असेही ते म्हणाले. व्यापाऱ्यांवर बंधने आणणे आवश्यक असून, त्याशिवाय शेतकरी स्थिर होऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले.

राज्यातील बाजार समित्या सरकारी जागांवर उभ्या आहेत. मात्र, काही आमदार कृषी विभागाची जागा बाजार समित्यांना द्यावी, अशी मागणी करत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून करारावर काही जागा देता येणे शक्य आहे का, याची चाचपणी करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. मात्र, बाजार समिती यांनी केवळ गाळे बांधून त्याची विक्री करू नये. शेतकऱ्यांना काय सुविधा देता येतात हे पाहणे गरजेचे आहे. त्याशिवाय शेतकरी व बाजार समितीमध्ये वेगळे नाते निर्माण होऊ शकणार नाही.

रावल म्हणाले, अजूनही काही बाजार समित्यांची जागा पडून आहे. त्याचा वापर होत नाही. स्थानिक गरजा लक्षात घेऊन तेथे व्यवसाय विकास नियोजन तयार करणे गरजेचे आहे. बाजार समित्यांनी मोठे होऊन शेतकरी आपल्याकडे येतील याची व्यवस्था केली पाहिजे. तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा दिल्या पाहिजेत. पुढील काळात बदलणे गरजेचे आहे. सरकारी गोष्टींवर अवलंबून न राहता समित्यांनी स्वतःची व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे. राज्यातील समित्यांना निधी मिळण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे १२०० कोटींचा निधी मागितला आहे. 

टॅग्स :PuneपुणेManikrao Kokateमाणिकराव कोकाटेFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahayutiमहायुती