शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

Manikrao Kokate: शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला व्यापारी, बाजार समित्या जबाबदार; कोकाटेंची घणाघाती टीका

By नितीन चौधरी | Updated: February 24, 2025 18:09 IST

शेतकऱ्याला हमखास भाव मिळेल याची शाश्वती राहिली नसल्याने शेतकरी शेतमाल रस्त्यावर फेकून देतात आणि सरकारवर रोषही व्यक्त करतात

पुणे : एखाद्या पिकाची लागवड केल्यानंतर त्यातून शेतकऱ्याला हमखास भाव मिळेल याची शाश्वती राहिली नसल्याने शेतकरी शेतमाल रस्त्यावर फेकून देतात. सरकारवर रोषही व्यक्त करतात. त्यात शेतकऱ्यांचा दोष नसून बाजारातील अस्थिरता कारणीभूत आहे. ही अस्थिरता दूर झाली पाहिजे. याला केवळ व्यापारी आणि बाजार समिती जबाबदार असल्याची घणाघाती टीका कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. त्यासाठी बाजार समितीमधील व्यापाऱ्यांची नोंदणी बंधनकारक करावी, असेही ते म्हणाले.

पणन विभागातर्फे आयोजित राज्यातील बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत ते बोलत होते. यावेळी पणनमंत्री जयकुमार रावल, आमदार दिलीप बनकर, अनुराधा चव्हाण, माजी खासदार देवीदास पिंगळे, सहकार आयुक्त दीपक तावरे, पणन संचालक विकास रसाळ, पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम उपस्थित होते.

कृषी विभागाचा आत्मा बाजार समित्या आहेत. शेतकरी विक्री व्यवस्थेवर अवलंबून असल्याने ती नीट न असल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात काय वाईट दिवस येतात, त्याची कल्पना न केलेली बरी. मागणी व पुरवठ्यातील तफावतीमुळे भाव पडतात आणि शेतकरी अस्थिर होतो. बांधावरील खरेदीत व्यापाऱ्यांवर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे शेतकरी लुटला जात असून, सर्व व्यापाऱ्यांना बाजार समितीमध्ये नोंदणी बंधनकारक करावी, असेही कोकाटे म्हणाले. व्यापारी मोकळा कसा सुटू शकतो, शेतकऱ्यांची फसवणूक कशी करू शकतो, असा सवाल करत व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये अनामत रक्कम जमा करावी, असे त्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनी किती माल विकला, किती पैसे परत दिले, किती माल शिल्लक आहे याची तपासणी देखील बाजार समितीने करावी. हे केल्याशिवाय व्यापारी सरळ होणार नाहीत, असेही ते म्हणाले. व्यापाऱ्यांवर बंधने आणणे आवश्यक असून, त्याशिवाय शेतकरी स्थिर होऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले.

राज्यातील बाजार समित्या सरकारी जागांवर उभ्या आहेत. मात्र, काही आमदार कृषी विभागाची जागा बाजार समित्यांना द्यावी, अशी मागणी करत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून करारावर काही जागा देता येणे शक्य आहे का, याची चाचपणी करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. मात्र, बाजार समिती यांनी केवळ गाळे बांधून त्याची विक्री करू नये. शेतकऱ्यांना काय सुविधा देता येतात हे पाहणे गरजेचे आहे. त्याशिवाय शेतकरी व बाजार समितीमध्ये वेगळे नाते निर्माण होऊ शकणार नाही.

रावल म्हणाले, अजूनही काही बाजार समित्यांची जागा पडून आहे. त्याचा वापर होत नाही. स्थानिक गरजा लक्षात घेऊन तेथे व्यवसाय विकास नियोजन तयार करणे गरजेचे आहे. बाजार समित्यांनी मोठे होऊन शेतकरी आपल्याकडे येतील याची व्यवस्था केली पाहिजे. तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा दिल्या पाहिजेत. पुढील काळात बदलणे गरजेचे आहे. सरकारी गोष्टींवर अवलंबून न राहता समित्यांनी स्वतःची व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे. राज्यातील समित्यांना निधी मिळण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे १२०० कोटींचा निधी मागितला आहे. 

टॅग्स :PuneपुणेManikrao Kokateमाणिकराव कोकाटेFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahayutiमहायुती