शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
6
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
7
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
8
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
9
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
10
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
11
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
12
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
13
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
14
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
15
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
16
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
17
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
18
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
19
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
20
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश

कांदा भाववाढीचा व्यापाऱ्यांनाच लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 13:53 IST

Onion Price Updates : सामान्यांच्या डोळ्यात कांद्याच्या तिखटपणापेक्षा भाववाढीनेच पाणी..

ठळक मुद्देयंदा नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कांद्याचे भाव कडाडल्याने चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरूतसेच रब्बी हंगामात रोपांच्या मरतुकीमुळे लागवड कमीपुढील वर्षीही भाव तेजीत ; यंदा खरीप पीकही गेले शेतकऱ्यांकडे मालच कमी :

संजय बारहाते- टाकळी हाजी : सध्या कांद्याच्या भावाने विक्रमी पातळी गाठली आहे. सामान्यांच्या डोळ्यात कांद्याच्या तिखटपणापेक्षा भाववाढीनेच पाणी आले आहे. भाववाढीमुळे शेतकरी खुशीत असल्याची चर्चा होत आहे; मात्र खरा लाभ शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यालाच झाला आहे. कांद्याचे भाव गेल्या डिसेंबरमध्ये नीचांकी पातळीवर होते. नीचांकी भावाने शेतकऱ्यांच्या प्रपंचाचा गाडाच मोडून गेला होता. यंदाही अतिवृष्टीने बहुतांश शेतकऱ्यांचे कांदापीक सडल्याने मालच कमी निघत आहे. परिणामी भाववाढीची लॉटरी व्यापाऱ्यांनाच पावली आहे.यंदा नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कांद्याचे भाव कडाडल्याने चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली. राज्यात कांदा उत्पादन प्रामुख्याने नाशिक, पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्हयात सर्वाधिक होते. खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात कांद्याचे उत्पादन होत असले तरी खरिपात पीक अतिपावसामुळे गेले. रब्बीलाही कांदारोपांमध्ये पाणी साचून राहिल्याने रोपांची मरतुक मोठ्या प्रमाणात झाली. रोपेच कमी असल्याने रब्बी कांदा लागवडीखालील क्षेत्र निम्म्याने घटले. कांदापिक लावगडीनंतर साडेचार महिन्यांत येत असल्याने विहीर बागायतदार शेतकरीसुद्धा कांद्याचे पीक घेतो. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात कांद्याच्या नीचांकी पातळीचा अनेक शेतकºयांची दैना झाली होती. टाकळी हाजी येथील शेतकरी महिला मनीषा बारहाते यांची प्रत्येकी ५० किलोच्या ३२ पिशव्यांची कांदापट्टी अवघी चार रुपये हाती आली होती. कमी भावामुळे वैतागलेल्या शेतकºयांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांना कांद्याची रक्कम व बांगड्या आहेर पाठविल्याची चर्चा राज्यभर गाजली.कांद्याचे पीक उत्पादनासाठी बी, मशागत, शेणखत, रासायनिक खते, कीटकनाशके, वीजबिल, लागवड, काढणी, मजुरी यांसाठी सुमारे एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च येतो. यंदा तर रोपे पावसाने खराब झाल्याने हा खर्च एक लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे, असे प्रगतिशील शेतकरी सोनभाऊ मुसळे यांनी सांगितले. गेल्या वर्षी कांद्याला मातीमोल भाव मिळाल्याने उत्पादन खर्चसुद्धा मिळत नव्हता. हजारो शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस नेण्यापेक्षा कांदाचाळीमध्ये साठवून ठेवण्यावरच भर दिला. मात्र साठवलेला कांदाही पावसाचे पाणी चाळीत साठून सडून गेला. शेतकऱ्यांना पीक कर्ज परत बँकेत भरता आले नाही. उधारीवर आणलेल्या खते, कीटकनाशकाचे बिलही देता आले नाही. उधारी थकल्याने यंदा शेतकऱ्यांनी पुन्हा गेल्यावर्षीसारखे नुकसान होऊ नये, म्हणून पाच-सहा रुपये किलो दराने व्यापाऱ्याला कांदा विकून टाकला होता. परिणामी कांदा भाववाढीचा फायदा मोठे शेतकरी व व्यापारी यांनाच झाला. लहान कांदा उत्पादक शेतकरी मात्र भाव आहे, पण कांदाच नसल्याने निराश झाला आहे. कर्जाचा बोजा मात्र वाढला आहे.....शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामामध्ये कांद्याची लावगड केली जाते. सप्टेंबरमध्ये रोपे टाकतात. मात्र अतिपावसाने रोपे व ज्यांनी कांदे लागवड केली, ती पण गेल्याने दुबार लागवडीचे संकट बळीराजावर आले असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे यांनी दिली....कांदा लागवड महिला मजुरांना घेऊन दिवसा करावी लागते, मात्र काही वेळा वीज रात्री सोडतात दिवसा बंद ठेवतात. त्यामुळे लागवडीसाठी मोठा प्रश्न उभा राहत असून दोन हजार रुपये भाड्याने डिझेल जनरेटर आणून लागवड करावी लागते........कांद्याला हवाय हमीभाव : कांद्याला प्रतिवीस रुपये हमीभाव दिला तरी शेतकरी व ग्राहक दोन्ही समाधानी होतील. मात्र शेतकरी अनेक वर्षे मागणी करूनही हमीभाव शासन देत नाही. तसेच शेतकरी व किरकोळ विक्रेता यामध्ये मोठी तफावत असून, शेतकऱ्याकडून घेतलेला कांदा ग्राहकाला दुप्पट भावात घ्यावा लागत आहे.......गेल्यावर्षी मातीमोल भाव मिळाल्याने यावर्षी लवकरच कांदा विकलाकांदा भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांना व मोठ्या शेतकऱ्यांनायंदाही अतिपावसामुळे लागवडी घटल्याखराब हवामानाचा पुन्हा कांद्याला फटका

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी