शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कांदा भाववाढीचा व्यापाऱ्यांनाच लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 13:53 IST

Onion Price Updates : सामान्यांच्या डोळ्यात कांद्याच्या तिखटपणापेक्षा भाववाढीनेच पाणी..

ठळक मुद्देयंदा नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कांद्याचे भाव कडाडल्याने चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरूतसेच रब्बी हंगामात रोपांच्या मरतुकीमुळे लागवड कमीपुढील वर्षीही भाव तेजीत ; यंदा खरीप पीकही गेले शेतकऱ्यांकडे मालच कमी :

संजय बारहाते- टाकळी हाजी : सध्या कांद्याच्या भावाने विक्रमी पातळी गाठली आहे. सामान्यांच्या डोळ्यात कांद्याच्या तिखटपणापेक्षा भाववाढीनेच पाणी आले आहे. भाववाढीमुळे शेतकरी खुशीत असल्याची चर्चा होत आहे; मात्र खरा लाभ शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यालाच झाला आहे. कांद्याचे भाव गेल्या डिसेंबरमध्ये नीचांकी पातळीवर होते. नीचांकी भावाने शेतकऱ्यांच्या प्रपंचाचा गाडाच मोडून गेला होता. यंदाही अतिवृष्टीने बहुतांश शेतकऱ्यांचे कांदापीक सडल्याने मालच कमी निघत आहे. परिणामी भाववाढीची लॉटरी व्यापाऱ्यांनाच पावली आहे.यंदा नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कांद्याचे भाव कडाडल्याने चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली. राज्यात कांदा उत्पादन प्रामुख्याने नाशिक, पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्हयात सर्वाधिक होते. खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात कांद्याचे उत्पादन होत असले तरी खरिपात पीक अतिपावसामुळे गेले. रब्बीलाही कांदारोपांमध्ये पाणी साचून राहिल्याने रोपांची मरतुक मोठ्या प्रमाणात झाली. रोपेच कमी असल्याने रब्बी कांदा लागवडीखालील क्षेत्र निम्म्याने घटले. कांदापिक लावगडीनंतर साडेचार महिन्यांत येत असल्याने विहीर बागायतदार शेतकरीसुद्धा कांद्याचे पीक घेतो. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात कांद्याच्या नीचांकी पातळीचा अनेक शेतकºयांची दैना झाली होती. टाकळी हाजी येथील शेतकरी महिला मनीषा बारहाते यांची प्रत्येकी ५० किलोच्या ३२ पिशव्यांची कांदापट्टी अवघी चार रुपये हाती आली होती. कमी भावामुळे वैतागलेल्या शेतकºयांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांना कांद्याची रक्कम व बांगड्या आहेर पाठविल्याची चर्चा राज्यभर गाजली.कांद्याचे पीक उत्पादनासाठी बी, मशागत, शेणखत, रासायनिक खते, कीटकनाशके, वीजबिल, लागवड, काढणी, मजुरी यांसाठी सुमारे एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च येतो. यंदा तर रोपे पावसाने खराब झाल्याने हा खर्च एक लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे, असे प्रगतिशील शेतकरी सोनभाऊ मुसळे यांनी सांगितले. गेल्या वर्षी कांद्याला मातीमोल भाव मिळाल्याने उत्पादन खर्चसुद्धा मिळत नव्हता. हजारो शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस नेण्यापेक्षा कांदाचाळीमध्ये साठवून ठेवण्यावरच भर दिला. मात्र साठवलेला कांदाही पावसाचे पाणी चाळीत साठून सडून गेला. शेतकऱ्यांना पीक कर्ज परत बँकेत भरता आले नाही. उधारीवर आणलेल्या खते, कीटकनाशकाचे बिलही देता आले नाही. उधारी थकल्याने यंदा शेतकऱ्यांनी पुन्हा गेल्यावर्षीसारखे नुकसान होऊ नये, म्हणून पाच-सहा रुपये किलो दराने व्यापाऱ्याला कांदा विकून टाकला होता. परिणामी कांदा भाववाढीचा फायदा मोठे शेतकरी व व्यापारी यांनाच झाला. लहान कांदा उत्पादक शेतकरी मात्र भाव आहे, पण कांदाच नसल्याने निराश झाला आहे. कर्जाचा बोजा मात्र वाढला आहे.....शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामामध्ये कांद्याची लावगड केली जाते. सप्टेंबरमध्ये रोपे टाकतात. मात्र अतिपावसाने रोपे व ज्यांनी कांदे लागवड केली, ती पण गेल्याने दुबार लागवडीचे संकट बळीराजावर आले असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे यांनी दिली....कांदा लागवड महिला मजुरांना घेऊन दिवसा करावी लागते, मात्र काही वेळा वीज रात्री सोडतात दिवसा बंद ठेवतात. त्यामुळे लागवडीसाठी मोठा प्रश्न उभा राहत असून दोन हजार रुपये भाड्याने डिझेल जनरेटर आणून लागवड करावी लागते........कांद्याला हवाय हमीभाव : कांद्याला प्रतिवीस रुपये हमीभाव दिला तरी शेतकरी व ग्राहक दोन्ही समाधानी होतील. मात्र शेतकरी अनेक वर्षे मागणी करूनही हमीभाव शासन देत नाही. तसेच शेतकरी व किरकोळ विक्रेता यामध्ये मोठी तफावत असून, शेतकऱ्याकडून घेतलेला कांदा ग्राहकाला दुप्पट भावात घ्यावा लागत आहे.......गेल्यावर्षी मातीमोल भाव मिळाल्याने यावर्षी लवकरच कांदा विकलाकांदा भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांना व मोठ्या शेतकऱ्यांनायंदाही अतिपावसामुळे लागवडी घटल्याखराब हवामानाचा पुन्हा कांद्याला फटका

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी