शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

ट्रॅक्टर ट्रॉलीला २८ टक्के, मर्सिडीजला ६ टक्के जीएसटी, ही तर शेतकर्‍यांची चेष्टा : शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 6:22 PM

बारामती दौर्‍यावर असताना खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारची शेतकरी विषयक धोरणे, कर्जमाफी, जीएसटी धोरणाविषयी राज्य सरकारवर टीका केली. 

ठळक मुद्देराज्य सरकारची कर्जमाफी म्हणजे शेतकर्‍यांच्या डोळ्यात धुळफेक : राजू शेट्टीशेट्टी यांची केंद्र सरकारची शेतकरी विषयक धोरणे, कर्जमाफी, जीएसटी धोरणाविषयी राज्य सरकारवर टीका

बारामती : जीएसटीमुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला २८ टक्के तर मर्सिडीज कारला ६ टक्के जीएसटी ही शेतकर्‍यांची चेष्टा नाही का? असा परखड सवाल करीत ही तर शेतकर्‍यांना बरबाद करणारी नीती आहे, अशी खरमरीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली.बारामती दौर्‍यावर असताना ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार शेट्टी यांनी केंद्र सरकारची शेतकरी विषयक धोरणे, कर्जमाफी, जीएसटी धोरणाविषयी राज्य सरकारवर टीका केली. शेट्टी म्हणाले, राज्य सरकारची कर्जमाफी म्हणजे शेतकर्‍यांच्या डोळ्यात धुळफेक आहे. शेतकर्‍यांची केवळ चेष्टा झाली आहे. त्यांच्या हातात काही पडलेले नाही. सरकार शेतकर्‍यांना मदत करतेय म्हणजे उपकार करत नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आहे. मात्र, शासन मदत करण्याऐवजी त्यांची चेष्टा करीत आहे. ४ हजार ५०० ज्या सोयाबीनला भाव मिळाला ते सोयाबीन ३ हजार रुपये हमीभाव असताना २४०० रुपयांनी विकण्याची वेळ आली. प्रत्येक पिकाच्याबाबत असेच झालं. त्याला राज्य सरकारचे धोरण कारणीभूत आहे. मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात केल्यामुळे सोयाबीन, सूर्यफुल, भुईमूगचे दर पडले. डाळ मोठ्या प्रमाणात आयात झाल्याने तूर, उडीद, मुगाचे भाव देखील पडले. त्याचे प्रायश्चित्त म्हणून सरकारने शेतकर्‍यांचे कर्ज संपवावे. त्याला पुन्हा आयुष्य सुरु करण्याची संधी द्यावी. दिलेल्या आश्वासनानुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा. अन्यथा खोटारडेपणाची कोणती शिक्षा द्यायची ते शेतकरी ठरवतील, असा टोला शेवटी त्यांनी लगावला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण, शेतकरी कृती समितीचे नेते सतिश काकडे, महेंद्र तावरे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

उसाला चांगला दर मिळाला पाहिजेयावेळी नैसर्गिक परिस्थीती चांगली आहे. शेतकर्‍यांच्या उसाला चांगला दर मिळाला पाहिजे. या हंगामात किती उत्पादन होणार, साखरेची जागतिक परिस्थती काय असणार याचा अंदाज बांधणार आहे. दराबाबत शेतकर्‍यांची मते तसेच कारखानदारांशी चर्चा करून उस दराच्या मागणीबात निर्णय घेतला जाईल. सगळ्या शेतकर्‍यांची संमती घेण्यात येईल, असे  खासदार शेट्टी यांनी सांगितले.

...ते तर आधीपेक्षाही वाईट निघालेआधीच्या सरकारचा अनुभव वाईट आल्याने मोठ्या आशेने नवीन लोकांबरोबर संगत केली. ते तर आधीपेक्षा वाईट निघाले. सगळेच राजकीय पक्ष सारखेच आहेत. प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकर्‍यांचा दबावगट आवश्यक आहे. या दबावगटावर मतपेटी हलली पाहिजे. त्यावेळी कोणताही पक्ष शेतकर्‍यावर अन्याय करण्याची हिंमत करणार नाही, असे खासदार शेट्टी म्हणाले.

दिल्लीमध्ये १८० शेतकरी संघटना एकत्र येणारशेतकर्‍यांच्या प्रश्नाबाबत दि २० नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये देशातील १८० शेतकरी संघटना एकत्र येवून मोठे आंदोलन केले जाणार आहे. यावेळी १० लाख शेतकरी एकत्र येणार आहेत. यामध्ये शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होवू नये यासाठी स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला हमीभाव मिळावा, ही आमची मागणी आहे. दिल्लीमध्ये होणार्‍या या आंदोलनासाठी आत्तापर्यंत १४ राज्यांचा दौरा आपण केला आहे. ऊस परिषदेनंतर उर्वरित राज्यांचा दौरा लवकरच केला जाणार आहे, असे खासदार राजु शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीGSTजीएसटी