शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांकडून पुणे - सातारा रोडवर टोल वसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 12:43 IST

ते टोलवरील कर्मचाऱ्यांच्या हातापाया पडून सोडण्याची विनंती करीत आहेत़ . तरीही त्यांच्याकडून जबरदस्तीने टोल वसुल केला जात आहे़.

ठळक मुद्दे टोल वसुली तातडीने स्थगित करण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

पुणे : कोल्हापूर, सांगली येथील महापूरा अडलेल्यांसाठी मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांकडून खेड शिवापूर आणि आणेवाडी येथील टोल नाक्यांवर टोल वसुली केली जात असून त्यामुळे संताप व्यक्त होत आहे़. हे दोन्ही टोलनाके राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे येत असून त्यांचे पत्र आल्याशिवाय टोल वसुली थांबविण्यास तेथील टोलनाक्यावरील अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे़. अनेक वाहनचालकांकडील पैसे संपले असल्याने त्यांच्याकडे टोल भरण्यासाठी पैसे शिल्लक नाहीत, ते टोलवरील कर्मचाऱ्यांच्या हातापाया पडून सोडण्याची विनंती करीत आहेत़ . तरीही त्यांच्याकडून जबरदस्तीने टोल वसुल केला जात आहे़. याबाबत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी ही टोल वसुली तातडीने स्थगित करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे़.गेली अनेक दिवस बंद असलेला महामार्ग आता सुरु झाल्याने जागोजागी थांबून राहिलेली वाहने आता कोल्हापूरच्या दिशेने निघाली आहेत़. खेड शिवापूर आणि आणेवाडी येथील टोल नाक्यांवर त्यांच्याकडून टोल वसुली केली जात आहे़. विवेक वेलणकर आणि संजय शिरोडकर यांनी नितीन गडकरी यांना पत्र पाठविले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे ते कोल्हापूर दरम्यान हजारो वाहने अनेक दिवस अडकून पडली आहेत.  पुराचे पाणी ओसरल्यानंतर या रस्त्यावर आता वाहतूक हळूहळू सुरू होईल.  

सातारा ते कोल्हापूर या रस्त्यावर किणी आणि तासवडे या दोन ठिकाणी टोल नाके असून ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात आहेत. आमच्या मागणीनंतर या दोन्ही टोल नाक्यावर टोल वसुली १५ दिवस स्थगित करण्याची घोषणा राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र पुणे ते सातारा या रस्त्यावर खेड शिवापुर आणि आणेवाडी या दोन ठिकाणी टोल नाके असून ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहे. या रस्त्यावरची वाहतूकस्थिती पूर्णपणे व्यवस्थित होईपर्यंत या दोन्ही टोलनाक्यांवरील टोलवसुली स्थगित करण्याची आवश्यकता आहे,  अन्यथा अस्मानी संकटामुळे गांजलेल्या वाहनचालकांना हा टोलचा भुर्दंड पडेल.आपणास विनंती की आपण तातडीने आदेश काढून किमान १५ दिवसांसाठी ही टोलवसुली स्थगित करून जनतेला दिलासा द्यावा.  

नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदीच्या निर्णयानंतर तीन आठवडे टोलवसुली थांबवली गेली होती हे आम्ही आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. राज्यभरातून सांगली, कोल्हापूरला मदती घेऊन जाणारी वाहने या दोन टोलनाक्यांवरुन जाणार आहे़. महापूरात अडकलेल्यांच्या मदतीसाठी गोळा झालेली मदत पोहचविण्यासाठी अनेकांनी आपली वाहने विना मोबदला उपलब्ध करुन दिली आहेत़. त्यांना या टोलचा भुर्दंड बसणार आहे़ त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने ही टोल वसुली स्थगित करण्याची आवश्यकता आहे. याबाबत सातारा जिल्हा ट्रान्स्पार्ट असोशिएशनचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी लोकमत शी बोलताना सांगितले की, गेली ७ दिवस आणेवाडी टोलनाक्याजवळ हजारो वाहने अडकून पडली आहेत़. त्यांना स्थानिकांनी व आम्ही जेवण दिले़. त्यांच्याकडील पैसेही संपून गेले आहेत़. काल सायंकाळनंतर वाहने सोडण्यास सुरुवात केली आहे़. इतके दिवस रोड बंद असल्याने आता तितके दिवस टोल वसुली बंद करणे अपेक्षित होते़. तरीही ही टोल वसुली केली जात आहे़.

राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना त्यांचे काहीही देणेघेणे नाही़ .त्यांनी टोल वसुली करणाऱ्यांना पत्र देऊन टोल थांबविणे भाग होते़. पण त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे़. त्यामुळे पैसे नसलेले वाहनचालक गयावया करताना दिसत असले तरी त्यांच्याकडून टोल वसुल केला जात आहे़. तसेच मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांकडूनही टोल वसुल केला जात असल्याचे गवळी यांनी सांगितले़.

टॅग्स :PuneपुणेtollplazaटोलनाकाVivek Velankarविवेक वेलणकरNitin Gadkariनितीन गडकरीfloodपूर