शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

आजच्या विद्यार्थ्यांचा झालाय संभ्रमित अर्जुन - नंदकुमार सागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 02:36 IST

महाभारतामध्ये अर्जुन ज्या पद्धतीने गलितगात्र झाला होता. माझ्या समोरील सर्व नातेवाईक माझे आहेत, मी त्यांना कसे मारू, कशासाठी मारू, त्यांना मारून काय साध्य होणार, असे नाना प्रश्न त्याला पडले होते. आजचा विद्यार्थी हा असाच झाला आहे.

महाभारतामध्ये अर्जुन ज्या पद्धतीने गलितगात्र झाला होता. माझ्या समोरील सर्व नातेवाईक माझे आहेत, मी त्यांना कसे मारू, कशासाठी मारू, त्यांना मारून काय साध्य होणार, असे नाना प्रश्न त्याला पडले होते. आजचा विद्यार्थी हा असाच झाला आहे. कोणत्या साईडला प्रवेश घेऊ, कोणता क्लास लावू, करिअरचे काय, असे प्रश्न त्याच्या समोर आहेत. आपल्याला आपला विद्यार्थी परीक्षार्थी न होता तो संस्कारक्षम गुणवंत होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज आपण आपल्या सभोवताली पाहातो आहोत शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे, असे मत राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले प्राचार्य नंदकुमार सागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.ते म्हणाले, अनेकदा उच्च शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया निम्मे वर्ष संपले तरी पूर्ण होत नाही. आजच्या शिक्षण क्षेत्रात नवीन नवीन बदल घडत आहेत ते समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून शिक्षण पद्धती हवी. त्यामुळे त्यांच्या रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असणाºया विषयाची शिक्षण पद्धती निर्माण करावी. कारण, भविष्यात त्यांना त्यांचे करिअर घडविण्यासाठी मदत होईल.भारताचे माजी राष्ट्रपती स्वर्गीय अब्दुल कलाम यांनी ‘भारत हा महासत्ता व्हायचा असेल तर जास्तीत जास्त युवक हा सुशिक्षित होणे गरजेचे आहे’, असे विधान केले होते. सुशिक्षित म्हणजे शिक्षण परीक्षा पद्धतीत अडकून राहण्यापेक्षा त्यांच्या मानसिकतेचा विचार करून कृतियुक्त शिक्षणावर भर दिला पाहिजे. केवळ पुस्तकी शिक्षण न देता ज्ञानरचनावादावर शिक्षण पद्धती अवलंबून असावी. अध्ययन-अध्यापन, संशोधन व समाज विस्तार हे खरे शिक्षणाचे मूळ असणे महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या परिस्थितीचे संशोधन करून आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, दारिद्र्य नष्ट करण्यासाठीचे प्रयोजन असणे गरजेचे आहे.केवळ नोकरदार निर्माण करण्यापेक्षा सामाजिक भान ठेवून उद्योजक निर्माण करणारे भारताचे आदर्श नागरिक शाळा-शाळांमधून घडविण्याचे कार्य होणे गरजेचे आहे. गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अथक परिश्रमाची गरज असते. तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर स्वत:ची नैतिक मूल्ये मजबूत करून समाजामध्ये आपले असामान्य कर्तृत्व निर्माण करणारी शिक्षण पद्धती असावी.जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जेजुरी या विद्यालयात मी २४ वर्षे मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे. शालेय प्रशासन करताना मुख्याध्यापकाजवळ भाषणकौशल्य, वक्तृत्व कौशल्य व अध्यापन कौशल्य हे व्यक्तिगत गुण असणे आवश्यक आहे. शालेय प्रशासन व अध्ययन-अध्यापन या प्रकियेत विद्यार्थी हा केंद्रस्थानी असतो. माझाही शिक्षक म्हणून कायम हाच प्रयत्न राहिलेला आहे.मी स्वत: वर्ग व विषय अध्यापन करत असून माझ्या विषयाचा दहावी बोर्ड परीक्षेत कायम १०० टक्के निकाल लागला आहे. अध्ययन, अध्यापन व उपक्रमांद्वारे कृतीसंशोधनाचे काम करीत आहे.शालेय शैक्षणिक कामाचे वार्षिक नियोजन, वर्गवार विषयवार वेळापत्रके, बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक कार्यक्रमांचे नियोजन, अभ्यासात मागे असणाºया विद्यार्थ्यांसाठी सुधारात्मक उपक्रम राबवीत असतो. तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक विकासाकडे लक्ष देतो.आपल्या देशाची संस्कृती व परंपरा यांना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. संस्कृतीबरोबरच गुरू परंपरेला फार मोठा इतिहास आहे. पूर्वीची शिक्षणपद्धती आश्रम शिक्षणपद्धती होती. या शिक्षणपद्धतीमध्ये काळानुसारबदल होत गेला आणि निर्माणझाली एक शिक्षणपद्धती. यामध्ये फक्त मुले ज्ञानार्जन घेत होती. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या त्यागाने, प्रयत्नाने मुलींना शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला आणि खºया अर्थाने शिक्षणव्यवस्था सुरू झाली.जवळपास २०व्या शतकामध्ये गुरू आणि शिष्य यांचे एक अतूट असे नाते निर्माण झाले. अतिशय मनमोकळे शिक्षण, शिस्तबद्धता, कडक परीक्षा पद्धती यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद होत होता. आज ही शिक्षणपद्धती बदललेली जाणवते.संवादाचे आधुनिक असे अनेक पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहेत. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये संवादाचा अभाव जाणवतो. यासाठी सुसंवाद वाढवणारी व सुजाण नागरिक घडवणारी शिक्षणपद्धती आता गरजेची आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी