शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

आज खासगीत कोणाचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करायचे ते ठरतं ! हे राजकारणामागील राजकारण - हर्षवर्धन पाटील

By श्रीकिशन काळे | Updated: December 4, 2023 14:20 IST

पूर्वी राजकारणात कोणत्याही पक्षाचे असले तरी योग्य मान दिला जात असे, पण आता मात्र एकमेकांवर आरोप केले जातात

पुणे : सध्या राजकारणात कोण कुठे असेल, ते सांगता येत नाही. आज कोणत्या पक्षात आहे, ते पहावे लागते. उद्या कोणत्या पक्षात असतील, ते माहिती नसते. तसेच कोणाला जर शुभेच्छा दिल्या, तरी त्याला राजकारण समजले जाते. नेमके कशासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत, ते समजत नाही. पण कोणाचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करायचा असेल, तर तो आज केला जातो, असे राजकारणामागील राजकारण ज्येष्ठ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उलगडले.

स्वा. रामभाऊ बराटे मित्र परिवारातर्फे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती (बांधकाम व आरोग्य) स्व. रामभाऊ बराटे यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (दि.४) कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार तर कीर्तनकार हभप चंद्रकांत वांजळे महाराज यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हर्षवर्धन पाटील आणि माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, माजी आमदार संभाजी कुंजीर, बापूसाहेब पठारे, विकास दांगट पाटील आदी उपस्थित हाेते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, पूर्वीचे राजकारण आता राहिले नाही. आम्ही १९९०-९२ च्या साली राजकारणात नव्या दमाचे लोकं आलो होतो. तेव्हा राजकारणात कोणी कोणत्याही पक्षाचे असले तरी त्याला योग्य तो मान दिला जात असे. पण आता मात्र एकमेकांवर आरोप केले जातात. जिल्हा परिषदेमध्ये देखील वातावरण बदलले आहे. रामभाऊ बराटे यांनी ज्या विचारांनी राजकारण केले, त्या विचारांची आज गरज आहे.’’

अप्पासाहेब शिवतरे हे जेव्हा सभापती होते, तेव्हा ते काम झाले की जिल्हा परिषदेची गाडी कार्यालयात लावत असत आणि पायी किंवा सायकलवर ते घरी जात. त्यांनी सर्व काम समाजासाठी केले. आज ते पहायला मिळत नाही. रामभाऊ बराटे यांचे देखील मोठे योगदान आहे. त्यांच्या स्मृती जपण्याचे काम त्यांचे मित्र करत आहेत. - उल्हास बापट, माजी आमदार

टॅग्स :Puneपुणेharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलBJPभाजपाPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र