शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पुण्यात थरार! भररस्त्यात पत्नीवर चाकूने सपासप वार करुन निर्घृण खून; भेकराईनगरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 21:09 IST

सागर आणि शुभांगी यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला असून ते दोघे जण उरुळी देवाची येथे राहत होते.

पुणे : सारखी माहेरी जात सासरी येण्यास नकार दिल्याने भररस्त्यात झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या पोटात चाकूने वार करुन तिचा खून केला.

शुभांगी सागर लोखंडे (वय २१, रा. भेकराईनगर) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. सागर बाळु लोखंडे (वय २३, रा. उरुळी देवाची मुळ रा. विजयवाडी, अकलुज) याला हडपसर पोलिसांनीअटक केली आहे. ही घटना भेकराईनगरमधील शिवशक्तीनगर चौकात बुधवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी रेणुका राजू हनवते (वय ३७, रा. भेकराईनगर) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर आणि शुभांगी यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघे जण उरुळी देवाची येथे राहत होते. सागरला दारु आणि गांजाचे व्यसन आहे. त्यामुळे त्यांच्यात वाद होऊन शुभांगी ही वारंवार भेकराईनगर येथे माहेरी आईकडे येत असे. आताही शुभांगी ही माहेरी आली होती. तेथून ती आज सकाळी कामाला जाण्यास निघाली होती. वाटेत शिवशक्ती चौकात सागरने शुभांगीला गाठले व तिला घरी येण्यास सांगितले. त्याला शुभांगीने नकार दिला. त्यावरुन त्यांच्यात रस्त्यातच वाद सुरु झाला. त्यावेळी सागरने शुभांगीच्या पोटात चाकूने वार केले. गंभीर जखमी झाल्याने शुभांगी जागेवर रक्ताच्या थारोळ्यात पडली. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच तिचा मृत्यु झाला. हडपसर पोलिसांनी सागर लोखंडे याचा शोध घेऊन त्याला अटक केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक