शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

लॉकडाऊनचा असाही घाला! भारती विद्यापीठ परिसरात नैराश्यातून एकाच दिवशी तिघांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 22:07 IST

भारती विद्यापीठ परिसरात आज एकाच दिवशी तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

धनकवडी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने शासनाने महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊन जाहीर केल्याने हजारोंचा रोजगार हिरावला गेला आहे. त्याचे दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. भारती विद्यापीठ परिसरात आज एकाच दिवशी तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

निरंजन बाळकृष्ण साळुंखे (वय ३५, रा. वर्धापन बिल्डिंग, वंडरसिटीजवळ) या तरुणाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. निरंजन हा वाहन चालक होता. गेल्या महिन्यांपासून तो बेरोजगार होता. त्याचा मित्र निरंजन याला दररोज जेवणाचा डबा आणून देत असे. तो मित्र शनिवारी रविवारी आला नव्हता. सोमवारी दुपारी डबा घेऊन आला तेव्हा निरंजनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. 

पोपट पांडुरंग सलगर (वय ४०, रा. सुखसागरनगर) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.  पोपट याची दोन्ही मुले गावाला गेली आहेत. पत्नी कामाला बाहेर गेली होती. त्यामुळे तो एकटाच घरी होता. त्याचा मित्र सतत फोन करीत होता. मात्र, पोपट फोन उचलत नसल्याने मित्र घरी गेल्यावर त्याने आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

राजीव गांधी उद्यानासमोर एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज उघड झाले. त्याच्याजवळ कोणतीही चिठ्ठी, मोबाईल अथवा ओळख पटले, असे कोणतीही वस्तू नव्हती, असे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले. एकाच परिसरात तीन वेगवेगळ्या आत्महत्येच्या घटनांनी परिसरात एकच चर्चेचा विषय झाला आहे. ़़़़़़़़़मनाला उद्विग्न करणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांचे स्वरूप दिवसेंदिवस उग्र होते आहे. प्रत्यक्ष आत्महत्येची कारणे अनेक असली तरी बहुतेक घटनांमध्ये संबंधित व्यक्तीची वैफल्यग्रस्त मानसिक अवस्था हा महत्त्वाचा समान धागा आढळतो. अशा पीडितांना संवादाचा अभाव जाणवतो, मदत वेळेवर मिळत नाही, कोणाकडे मदत मागावी हे कळत नाही, मदत मागण्याचा कमीपणाही वाटतो. समाजामध्ये आत्महत्या करण्याचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे. आत्यंतिक नैराश्याच्या पोटी केल्या जाणाऱ्या आत्महत्या प्रयत्नपूर्वक रोखायला हव्यात आणि त्यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न केला पाहिजे.ध्यानगुरु रघुनाथ येमुल गुरुजी.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूDhankawadiधनकवडीPoliceपोलिस