शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

समस्यांच्या चक्रव्यूहात तीनहत्ती चौक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 02:33 IST

महात्मा फुले चौक : अनधिकृत पार्किंग व फ्लेक्सचा सुळसुळाट, वाढलेले गवत व झुडपांनी रया गेली

धनकवडी : पाच वर्षांपूर्वी कारंजे बंद पडले, सुशोभिकरणात उभारलेले हत्ती काही वेळा कोसळले, वाहतूक बेटांमध्ये वाढणारे गवत आणि झुडुपांना वेळेत काढण्याची तसदी महापालिकेने कधीही घेतली नाही या समस्या कायम असतानाच या ऐसपैस चौकात बेकायदा पार्किंग बोकाळली. खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तर चौकाची चौपाटी केली. गेली अनेक वर्षे फ्लेक्सबाजीचा अड्डा ठरलेल्या चौकाला किमान विद्रुपीकरणाच्या कचाट्यातून मुक्त करा आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले चौक या नावाचं वैभव जतन करा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाया होत नसल्यामुळे बेकायदा पार्किंग आणि फ्लेक्सबाजीचा अड्डा ठरलेला क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले म्हणजेच तीन हत्ती चौकाला विद्रूपीकरणाचे लागलेले ग्रहण सुटण्याचे नाव घेत नाही. पश्चिमेला धनकवडी गावठाण आणि तळजाई पठार, पूर्वेला संभाजीनगर, सातारा रस्ता ते बिबवेवाडी तर दक्षिणेला भारती विद्यापीठ परिसर, आंबेगावचा दत्तनगर, कात्रज, उत्तरेला पद्मावती, सहकारनगर ते थेट शहराला जोडण्याची प्रमुख भूमिका बजावणारा हा चौक आहे. सातारा रस्त्यावरील सिग्नलचे अडथळे, वेगवान वाहतूक आणि जोखीम टाळणारे या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. विकास आराखड्यात रस्त्यासाठी जागा नसताना राऊत बाग ओढ्यावर पूल उभारून ऐसपैस जागा निर्माण करण्याचे प्रयत्न २००३ मध्ये तत्कालीन नगरसेवक सुभाष जगताप यांनी केले. त्यानंतर मध्यभागी वर्तुळाकार आणि तिन्ही दिशांना पाकळ्या असलेली वाहतूक बेटं उभारण्यात आली. त्याकाळी सुशोभित चौकाचे एक उत्तम उदाहरण ठरले होते. त्यावेळी महापालिकेने २५ लाख रुपये खर्च केले होते. रंगीबेरंगी प्रकाशझोतात न्हावून जाणारे कारंजे पाहण्यासाठी नागरिकांना स्टेडियमसारखी बैठक व्यवस्था उभारली होती. काही वर्षांनंतर या सुशोभिकरणाला घरघर लागली. ती दूरवस्था दूर करण्यात महापालिका आजवर अपयशी ठरली आहे. परिणामी, या दुर्लक्षित चौकाचा गैरफायदा अनेकजण घेऊ लागले. चौकात चारही बाजूला जागा मिळेल तिथे बेकायदा पार्किंगने जागा व्यापली. या चौकाला विद्रूप करण्याची जणू स्पर्धाच लागल्यासारखी सातत्याने फ्लेक्सबाजीचे ग्रहण लागले. महापालिकेचा पंगू आकाशचिन्ह विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षाचा फायदा बेशिस्तीने घेतला. ट्रक, मिनी बस, स्कूल बस, टेम्पो, रिक्षांनी तर बेकायदेशीर पार्किंगची हक्काची जागा केली. रहदारीला अडथळा होऊन अपघाती स्थितीचा सामना नागरिकांना सातत्याने करावा लागत आहे. संपूर्ण फ्लेक्सने व्यापणारा हा चौक समोरून येणारी वाहने दिसत नसल्यामुळे धोकादायक ठरत आहे.कुठे आहेत कारंजी आणि हिरवळ?धनकवडीतील या चौकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धनकवडी गाव, भारती विद्यापीठ परिसर सातारा रस्ता मार्गे बिबवेवाडीलाही शहराशी जोडणारा महत्त्वाचा चौक आहे.ओढा परिसरातील उपलब्ध झालेल्या प्रशस्त जागेचा वापर करून १५ वर्षांपूर्वी या चौकाचा विकास करण्यात आला. मध्यभागी वर्तुळाकार वाहतूक बेट, तिन्ही रस्त्यांना त्रिकोणी आकाराचे वाहतूक बेट, सुंदर फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे चौकाची रचना करण्यात आली होती.या सर्व वाहतूक बेटांमध्ये हिरवळ व झाडी लावण्यात आली होती. मध्यभागी असलेल्या वर्तुळाकार बेटामध्ये केलेली तीन हत्तींची उभारणी आणि कारंजे लक्षवेधी ठरले.1 अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षामुळे विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पाय रोवले. एकूणच मोठ्या आकाराच्या सुशोभित चौकाचे वैभव लोप पावल्याची स्थिती आहे. चौकाचे नव्याने सुशोभिकरण होणार असल्याची चर्चा गेली वर्षभर घोंगावत आहे; त्याला विलंब होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आहे.2 नगरसेवक महेश वाबळे, म्हणाले, चौकाला नव्याने सुशोभित करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. त्यासाठीच्या सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. १५ दिवसांत कामाला सुरुवात होणार आहे.3 यामध्ये तीन हत्तींची प्रतिमा आहे तशीच ठेवून कारंजे , गार्डन आणि सुशोभित झाडे लावून सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर १२० फुट लांब व ७ फुट उंचीचे संभाजीमहाराजांचे म्युरल उभारण्यात येणार आहे. 

टॅग्स :Puneपुणे