तीन दिवस नागरिकांचे पाण्यासाठी हाल

By Admin | Updated: May 8, 2014 22:33 IST2014-05-08T17:52:17+5:302014-05-08T22:33:22+5:30

वाळुंजनगर (ता. आंबेगाव) येथील हडवळा या ठिकाणी असणारे रोहित्र गेले तीन दिवसांपासून बिघडले आहे.

Three days for drinking water | तीन दिवस नागरिकांचे पाण्यासाठी हाल

तीन दिवस नागरिकांचे पाण्यासाठी हाल

लोणी धामणी : वाळुंजनगर (ता. आंबेगाव) येथील हडवळा या ठिकाणी असणारे रोहित्र गेले तीन दिवसांपासून बिघडले आहे. या रोहित्रावरील जवळजवळ ३० ते ३५ विद्युत पंप बंद पडल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, अशी माहिती उपसरपंच महेंद्र वाळुंज यांनी दिली.
गेली तीन दिवस येथील रोहित्र बिघडल्याने वाळुंजनगरच्या नागरिकांचे मात्र हाल झाले आहेत. या संदर्भात वाळुंज यांनी लोणी येथील शाखा उपअभियंता यांच्याशी संपर्क साधला असता, मी आठ दिवस रजेवर आहे. आल्यावर पाहू. तसेच, येथील स्थानिक वायरमनशी संपर्क साधला असता, मी रजेवर आहे, साहेबांना सांगा, अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे. लोणी येथील वीजवितरण कार्यालयाशी संबंधित सर्व वायरमन ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर राहत असल्याने त्यांचे कामाकडे लक्ष नाही, अशा कामचुकार व दूर राहणार्‍या कर्मचार्‍यांवरती कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Web Title: Three days for drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.