शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्य सरकारकडून पुणे विभागासाठी साडेतीनशे कोटींची नुकसानभरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 14:36 IST

महाआघाडी सरकार सत्तेत येऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला, तरी शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते. 

ठळक मुद्देमहाआघाडी सरकारकडून आकस्मिकता निधीतून मदत :राष्ट्रपती राजवटीत दीडशे कोटींचे वाटप राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाने माजवला हाहाकार

सुषमा नेहरकर-शिंदे - पुणे : सरकार स्थापन झाल्यानंतर देखील शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नसल्याची टीका सुरू झाल्यानंतर महाआघाडी शासनाने तातडीने आकस्मिकता निधीतून पुणे विभागासाठी ३२८ कोटी १० लाख रुपयांचा मदत निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वितरित केला आहे. राज्यात आठ-दहा दिवसांसाठी आलेल्या राष्ट्रपती राजवटीत पुणे विभागात सुमारे दीडशे कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. आता अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदतीचे वाटप होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी सांगितले. सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील शेतपिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. हाताशी आलेले पीक पावसामुळे वाहून गेले. शेत पिकासोबतच जनावरे, शेततळी, शेतीचे बांध, घरांचेदेखील मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले. राज्यात सत्तास्थापनेचे नाटक सुरू असताना शेतकरी मात्र या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे होरपळून निघत होता. सत्ता स्थापनेसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सरकार स्थापन करत असल्याचा आव आणला जात होता; परंतु शेतकºयांना मात्र प्रत्यक्ष मदत मात्र मिळत नव्हती. राज्यात काही दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट आल्यानंतर राज्यपालांनी पुणे विभागासाठी तातडीची मदत म्हणून सुमारे दीडशे कोटी रुपयांची मदत केली; परंतु त्यानंतर महाआघाडी सरकार सत्तेत येऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला, तरी शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते. याबाबत महाआघाडी सरकारवर विरोधकांनी टीका केली. शेतकरीदेखील नवीन सरकारकडून मदत मिळेल याच्या प्रतीक्षेत होते. अखेर महाआघाडी सरकारने पुणे विभागासाठी मदतीचा दुसरा हप्ता दिला आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी मदतीचा हप्ता प्राप्त झाला असून, लवकरच शेतकºयांच्या बँक खात्यात मदत निधीचे वाटप करण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले, अशी माहिती उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी दिली........वाटप केलेला निधी व नव्याने मंजूर निधीजिल्हा                             वाटप झालेला निधी (राष्ट्रपती राजवट)         महाआघाडी सरकारकडून आलेला निधी                                        पुणे                               ३९ कोटी ५५ लाख                                                        ८६ कोटी ४४ लाखसातारा                           १७ कोटी ५७ लाख                                                      ३८ कोटी ४० लाखसांगली                        ३४ कोटी ४८ लाख                                                         ७५ कोटी ३४ लाखसोलापूर                       ५८ कोटी १५ लाख                                                       १२७ कोटी ७ लाखकोल्हापूर                       ३८ लाख                                                                   ८४ लाखएकूण                       १५० कोटी १५ लाख                                                        ३२८ कोटी १० लाख

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारRainपाऊस