शहरं
Join us  
Trending Stories
1
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
2
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
3
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
4
फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
5
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
6
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
7
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
8
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
9
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
10
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
11
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
12
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
13
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
14
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
15
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
16
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
17
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
18
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
19
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
20
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
Daily Top 2Weekly Top 5

जीआयएसच्या कक्षेत हजारो अनधिकृत मिळकती

By admin | Updated: March 5, 2017 04:41 IST

तब्बल २८ कोटी रुपये खर्च करून सुरू केलेल्या जीएसआय (जिओग्राफीकल सिस्टिम इन्फर्मेशन) यंत्रणेमुळे पालिका हद्दीतील कर लावला जात नसलेल्या किंवा वाढीव

पुणे : तब्बल २८ कोटी रुपये खर्च करून सुरू केलेल्या जीएसआय (जिओग्राफीकल सिस्टिम इन्फर्मेशन) यंत्रणेमुळे पालिका हद्दीतील कर लावला जात नसलेल्या किंवा वाढीव बांधकाम केलेल्या अनेक इमारतींचा शोध लागत आहे. आतापर्यंत या यंत्रणेद्वारे तपासण्यात आलेल्या मिळकतींमध्ये कमी कर लावला जात असलेल्या अशा काही हजार मिळकती निदर्शनास आल्या आहेत. त्या सर्वांना नोटिसा बजावून वसुली करण्यास मिळकत कर विभागाने सुरुवात केली आहे.उपग्रहाद्वारे तपासणी करणारी ही यंत्रणा अत्यंत आधुनिक यंत्रणा आहे. पाच महिन्यांपूर्वी निविदा जाहीर करून दोन कंपन्यांना हे काम देण्यात आले. २८ कोटी रुपयांचे हे काम आहे. मिळकत कर विभागाकडे नोंदणी असलेल्या ८ लाख २५ हजार मिळकती उपग्रहांद्वारे यात शोधल्या जातील. त्यानंतर त्याच कंपन्यांचे कर्मचारी या मिळकतींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करतील. त्यात वाढीव बांधकाम, बेकायदेशीर बांधकाम तसेच बांधकामांची नोंदच नाही, असे प्रकार असतील, तर त्याची नोंद करून ते पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कळवले जाईल. लगेचच त्यांना मिळकत कर विभागाकडून नोटीस आकारून कर वसूल करण्यात येईल. तपासणी झालेल्या मिळकतींना शहराच्या नकाशावर विशिष्ट संकेतांक दिला जाणार आहे. ही तपासणी उपग्रह यंत्रणेमार्फत होत असल्याने त्यात शहरातील नवी-जुनी अशी एकही मिळकत तपासणीविना राहणार नाही. आतापर्यंत या यंत्रणेने शहरातील १ लाख १३ हजार इमारती तपासल्या आहेत. त्यात काही हजार मिळकती असा कमी कर लावला जात असलेल्या किंवा मुळीच कर लावला जात नाही अशा आढळल्या आहेत, अशी माहिती मिळकत कर विभागाकडून देण्यात आली. प्रत्यक्षात अशा मिळकतींची संख्या काही लाख असल्याचे या यंत्रणेसाठी पाठपुरावा करणारे माजी उपमहापौर आबा बागूल यांचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांत शहरात व प्रामुख्याने उपनगरांमध्ये तसेच नव्याने पालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये अशा प्रकारच्या बांधकामांचे पेवच फुटले आहे. त्याची कसलीही नोंद मिळकत कर विभागाकडे नाही. त्यातील काही बांधकामे बड्या लोकांची आहेत. काहीजणांनी आपल्या इमारतीच्या वर परमिट रुम तसेच बिअर बार, हॉटेल्स सुरू केली आहेत. त्याचीही नोंद पालिकेकडे नाही. जीआयएस यंत्रणेच्या तपासणीतून यापैकी काहीही सुटू शकत नाही. त्यामुळेच या यंत्रणेचा आग्रह धरला होता, असे बागूल म्हणाले.दरम्यान राज्य सरकारने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या मिळकत कराची वसुली किमान ९० टक्के झालीच पाहिजे, अशी सक्ती केली आहे. महापालिका आयुक्तांच्या सर्व्हिस बुकबरोबरच याचा संबंध सरकारने जोडला असून, यापेक्षा कमी वसुली झाली, तर दंडात्मक कारवाईही केली जाईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे मिळकत कर विभागात सध्या धावपळ उडाली आहे. यावर्षी मिळकत कर विभागाला १ हजार ६०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मागील वर्षी या विभागाने विक्रमी म्हणजे १ हजार २०० कोटी रुपयांची वसुली केली होती. यावर्षी आतापर्यंत १ हजार ४७ कोटी रुपये वसूल झाले आहेत. आता येत्या २५ दिवसांत ( ३१ मार्चअखेर) किमान ४०० कोटी रुपयांची वसुली मिळकत कर विभागाला करायची आहे. त्यासाठी त्यांनी आता या यंत्रणेचा आधार घेतला असून, काम घेतलेल्या दोन्ही संस्थांना कामाचा वेग वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी आणून दिलेल्या माहितीच्या आधारे रोज नोटिसा बजावल्या जात आहेत. कर जमा न करणाऱ्यांवर लगेचच कारवाईही करण्यात येत आहे. (प्रतिनिधी) दोन हजार कर्मचाऱ्यांकडून तपासणीचे कामया यंत्रणेचे सुमारे २ हजार कर्मचारी यंत्रणेतून शोधलेल्या मिळकती तपासणीचे काम करीत आहेत. एका कंपनीने ९ महिन्यांत, तर दुसऱ्या कंपनीने ६ महिन्यांत त्यांना नेमून दिलेल्या भागातील काम पूर्ण करायचे आहे. त्यांना प्रत्येक मिळकतीमागे पैसे दिले जात आहेत.विहित मुदतीत काम पूर्ण झाले नाही, तर पुढे त्यांचा दर कमी करण्यात येणार आहे. महापालिकेच्या उत्पनात यामुळे मोठी भर पडणार आहे. किमान ४ लाख मिळकती अशा सापडू शकतील, असे बागूल यांचे म्हणणे आहे. त्यातून पालिकेला साधारण २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर दरवर्षी मिळू शकतो, असे ते म्हणाले. बेकायदा बांधकामांचाही शोध यातून लागणार असून, त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली जाईल. बेकायदा बांधकामांची संख्या तर शहरात प्रचंड असून, त्या सर्व मिळकती या यंत्रणेतून उघड होतील, असे ते म्हणाले. जीआयएस यंत्रणेचा वापर चांगला होत आहे. त्यामुळे योग्य कर लावला जात नसलेल्या अनेक मिळकती उघड होत आहेत. आतापर्यंत सुमारे १५ हजार मिळकती अशा आढळल्या असून, त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.- सुहास मापारी, उपायुक्त, कर संकलन विभागमिळकत कर विभागाने ही यंत्रणा वापरावी यासाठी सतत दोन वर्षे पाठपुरावा करीत होतो, मात्र ते टाळण्यात येत होते. फक्त मिळकत कर विभागच नाही, तर बांधकाम विभाग, उद्यान, पथदिवे, अशा अनेक कामांसाठी या यंत्रणेचा वापर होऊ शकतो. आयुक्तांनी हे सर्व विभाग आता या यंत्रणेला जोडले पाहिजेत. पालिकेचे उत्पनाचे स्रोत कमी होत आहेत. ते वाढविण्यासाठी प्रशासनाकडून अपेक्षित प्रयत्न केले जात नाहीत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला; तर प्रशासनाच्या अनेक चुका, त्रुटी उघडकीस येतील, या भीतीने अधिकारी तंत्रज्ञानाच्या वापरास नकार देत असतात, मात्र त्याचा वापर करणे जरुरीचे आहे.- आबा बागूल, माजी उपमहापौर, नगरसेवक