शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

'' कौमार्य''  शस्त्रक्रियेसाठी तरूणी मोजतायेत हजारो रूपये........

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 06:00 IST

‘कंजारभाट’ समाजात तरूणींच्या केल्या जाणा-या कौमार्य चाचणीवरून अनेक वादंग उठले.

ठळक मुद्देतरूणींचा कौमार्य शस्त्रक्रियेकडे कल वाढला, पुण्या-मुंबईत वाढले प्रमाण

पुणे :  एकीकडे कौमार्य चाचणीवरून ‘कंजारभाट’ समाजातील तरूणी आवाज उठवत असताना दुसरीकडे मात्र विविध वर्गातील तरूणींकडूनच ‘कौमार्य’ पुन:प्राप्तीसाठी हजारो रूपये मोजले जात आहेत. पुण्या-मुंबईमध्ये वर्षाला जवळपास 20 ते 30 तरूणी कौमार्य शस्त्रक्रिया करून घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खरतर स्त्रीचं ’योनीपटल’ हा अत्यंत नाजूक भाग असतो. लग्नानंतर केवळ शारीरिक संबंधांनंतरच नव्हे तर आजच्या धकाधकीच्या जीवनात सायकलिंग, खेळ किंवा व्यायामाने देखील आतला पापुद्रा फाटू शकतो हे सत्य वैद्यकीय तज्ञांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानेही ‘कौमार्य चाचणी’ अवैज्ञानिक मानत हा विषय अभ्यासक्रमातून वगळला आहे.  तरीही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात  ‘कौमार्य’ विषयीचा दृष्टीकोनला बदलू शकलेला नाही, हे दुर्देव म्हणावे लागेल. ‘कंजारभाट’ समाजात तरूणींच्या केल्या जाणा-या कौमार्य चाचणीवरून अनेक वादंग उठले. मात्र तरीही मानसिकता बदललेली नाही हे तरूणींकडून कौमार्य पुन:प्राप्तीसाठी केल्या जाणा-या शस्त्रक्रियेवरून अधोरेखित झाले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रसिद्ध कॉस्मँटिक व प्लँस्टिक सर्जन डॉ. पराग सहस्त्रबुद्धधे यांच्याशी संवाद साधला असता तरूणींचा कौमार्य शस्त्रक्रियेकडे कल वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.     ते म्हणाले, योनीपटलावर एक पापुद्रा असतो. पण प्रत्येक मुलीला तो जन्मजात असतोच असं नाही. मात्र आपल्याकडे असा एक समज आहे की लग्नानंतर शरीरसंबंधावेळी हा पापुद्रा फाटला तर त्या तरूणीचे कौमार्य सहीसलामत आहे. खरेतर हेच केवळ पापुद्रा फाटण्याचे एकमेव कारण असू शकत नाही. त्याला अनेक कारणं आहेत. मात्र आजही कौमार्याबददलच्या मानसिकतेत फरक पडलेला नाही. तरूणी जेव्हा आमच्याकडे येतात. तेव्हा त्यांचे कुणाशीतरी शरीरसंबंध आले आहेत. पण आता माझे दुस-या तरूणाबरोबर लग्न होणार आहे त्यामुळे कौमार्य मला परत हवं आहे असे मुलींकडून सांगितले जाते. ते पुन्हा मिळवून देणे शक्य नसले तरी त्या पापुद्राचा काही भाग शिल्लक राहिलेला असतो. तो शस्त्रक्रियेच्या माध्यमातून जोडला जाऊ शकतो. ही शस्त्रक्रिया लग्नाच्या आठ ते दहा दिवस आधी केली जाते. कारण जे पापुद्रे जोडलेले असतात ते फारकाळ टिकत नाहीत. पण तरीही शरीरसंबंधानंतर पापुद्रा फाटला तरी रक्तस्त्राव होईलच हे सांगता येत नाही. मात्र काही बुरसटलेल्या समाजाच्या डोक्यातून आजही कौमार्याचा पुरावा मागितला जात असल्याने तरूणी दबावाखाली येऊन कौमार्य सिद्ध करण्यासाठी धडपड करत आहेत. कौमार्य पुन:प्राप्तीसाठी विविध वर्गातील तरूणी हजारो रूपये मोजायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले.----------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यWomenमहिलाSex Lifeलैंगिक जीवनdoctorडॉक्टर