शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

'' कौमार्य''  शस्त्रक्रियेसाठी तरूणी मोजतायेत हजारो रूपये........

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 06:00 IST

‘कंजारभाट’ समाजात तरूणींच्या केल्या जाणा-या कौमार्य चाचणीवरून अनेक वादंग उठले.

ठळक मुद्देतरूणींचा कौमार्य शस्त्रक्रियेकडे कल वाढला, पुण्या-मुंबईत वाढले प्रमाण

पुणे :  एकीकडे कौमार्य चाचणीवरून ‘कंजारभाट’ समाजातील तरूणी आवाज उठवत असताना दुसरीकडे मात्र विविध वर्गातील तरूणींकडूनच ‘कौमार्य’ पुन:प्राप्तीसाठी हजारो रूपये मोजले जात आहेत. पुण्या-मुंबईमध्ये वर्षाला जवळपास 20 ते 30 तरूणी कौमार्य शस्त्रक्रिया करून घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खरतर स्त्रीचं ’योनीपटल’ हा अत्यंत नाजूक भाग असतो. लग्नानंतर केवळ शारीरिक संबंधांनंतरच नव्हे तर आजच्या धकाधकीच्या जीवनात सायकलिंग, खेळ किंवा व्यायामाने देखील आतला पापुद्रा फाटू शकतो हे सत्य वैद्यकीय तज्ञांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानेही ‘कौमार्य चाचणी’ अवैज्ञानिक मानत हा विषय अभ्यासक्रमातून वगळला आहे.  तरीही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात  ‘कौमार्य’ विषयीचा दृष्टीकोनला बदलू शकलेला नाही, हे दुर्देव म्हणावे लागेल. ‘कंजारभाट’ समाजात तरूणींच्या केल्या जाणा-या कौमार्य चाचणीवरून अनेक वादंग उठले. मात्र तरीही मानसिकता बदललेली नाही हे तरूणींकडून कौमार्य पुन:प्राप्तीसाठी केल्या जाणा-या शस्त्रक्रियेवरून अधोरेखित झाले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रसिद्ध कॉस्मँटिक व प्लँस्टिक सर्जन डॉ. पराग सहस्त्रबुद्धधे यांच्याशी संवाद साधला असता तरूणींचा कौमार्य शस्त्रक्रियेकडे कल वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.     ते म्हणाले, योनीपटलावर एक पापुद्रा असतो. पण प्रत्येक मुलीला तो जन्मजात असतोच असं नाही. मात्र आपल्याकडे असा एक समज आहे की लग्नानंतर शरीरसंबंधावेळी हा पापुद्रा फाटला तर त्या तरूणीचे कौमार्य सहीसलामत आहे. खरेतर हेच केवळ पापुद्रा फाटण्याचे एकमेव कारण असू शकत नाही. त्याला अनेक कारणं आहेत. मात्र आजही कौमार्याबददलच्या मानसिकतेत फरक पडलेला नाही. तरूणी जेव्हा आमच्याकडे येतात. तेव्हा त्यांचे कुणाशीतरी शरीरसंबंध आले आहेत. पण आता माझे दुस-या तरूणाबरोबर लग्न होणार आहे त्यामुळे कौमार्य मला परत हवं आहे असे मुलींकडून सांगितले जाते. ते पुन्हा मिळवून देणे शक्य नसले तरी त्या पापुद्राचा काही भाग शिल्लक राहिलेला असतो. तो शस्त्रक्रियेच्या माध्यमातून जोडला जाऊ शकतो. ही शस्त्रक्रिया लग्नाच्या आठ ते दहा दिवस आधी केली जाते. कारण जे पापुद्रे जोडलेले असतात ते फारकाळ टिकत नाहीत. पण तरीही शरीरसंबंधानंतर पापुद्रा फाटला तरी रक्तस्त्राव होईलच हे सांगता येत नाही. मात्र काही बुरसटलेल्या समाजाच्या डोक्यातून आजही कौमार्याचा पुरावा मागितला जात असल्याने तरूणी दबावाखाली येऊन कौमार्य सिद्ध करण्यासाठी धडपड करत आहेत. कौमार्य पुन:प्राप्तीसाठी विविध वर्गातील तरूणी हजारो रूपये मोजायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले.----------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यWomenमहिलाSex Lifeलैंगिक जीवनdoctorडॉक्टर