शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्यावरून ज्यांना अटक, त्यांनीच बदनामीची उलटी केस करा-प्रकाश आंबेडकर

By रोशन मोरे | Updated: August 4, 2023 16:41 IST

औरंगजेबाचे स्टेट्स ठेवलेल्यांनी आता हिम्मत दाखवणे गरजेचे आहे

पुणे : प्रकाश आंबेडकर हे औरंगजेबाच्या मजारीवर जाण्यावरून विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावरून आंबेडकर यांनी उत्तर दिले आहे. कुणाच्या मजारीवर जाऊन, अथवा कब्रस्तानात जाऊन फुले वाहण्यास बंदी असल्याचा कायदा दाखवावा. ज्या मुलांना औरंगजेबाचे स्टेट्स ठेवण्यावरून अटक केली होती. त्यामुलांनीच त्यांना बदनामी करण्यात आल्याची उलटी केस करावी. त्यांनी हिम्मत दाखवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले आहेत. पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा देत आंबडेकर म्हणाले,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. जर, पंतप्रधान असा आरोप करत असतील तर त्यांनी संपूर्ण माहिती संबंधित यंत्रणांकडून घेतली असेल. त्यामुळे दहा दिवसांत संबंधित व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंदवावा. गुन्हा दाखल केला नाही तर राष्ट्रवादीची, जनतेची माफी पंतप्रधानांनी मागावी. अन्यथा पक्ष संपवण्यासठी पंतप्रधान असे आरोप करत करत आहेत. असे आम्ही समजू आणि आंदोलन करू. पंतप्रधानांनी आरोप करून एक राजकीय पक्षाच्या संपवण्याची प्रक्रिया करत आहेत. जर पंतप्रधान आरोप करत असतील तर त्यांनी एफआयआर दाखल करावी. दखल करत नसतील तर ते देशाला फसवत आहेत. राजकीय पक्ष हे देशाची ओळख आहेत. देशाचे राजकारण हे ब्लॅकमेलरचे, दमदाटीचे राजकारण होऊ नये. ब्लॅकमेल करून पक्ष संपवले जात आहे.

शिवसेना, काँग्रेसला आवाहन करणार

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राजकीय पक्ष पंतप्रधान संपवण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि काँग्रेस पक्षाला आवाहन करणार आहोत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष यात सहभागी असल्याने ते आंदोलनात येतीलच. शिवाय इतर पक्ष, संघटनांनी या आंदोलनात सहभागी व्हावे.

छान छान चालल्यामागे ब्लॅकमेलिंग

राष्ट्रवादीवर आरोप केल्यानंतर अजित पवार सत्तेत सहभागी झाले. तर, नंतर पुण्यात झालेल्या कार्यक्रमात शरद पवार पंतप्रधानांसोबत स्टेजवर होते. त्यामुळे सगळ छान छान सुरु असलेल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, या छान छान दिसण्यामागे ब्लॅकमेलिंग सुरु आहे का? हे तपासून पाहिले पाहिजे असे आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारणPoliceपोलिसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस