शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

"ज्यांच्यावर आरोप होताहेत त्यांची सखोल चौकशी व्हावी, त्याला कुणाचाही विरोध होता कामा नये..!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 17:36 IST

सार्वजनिक क्षेत्रात काम करत असेल तर वादातीत राहिले पाहिजे...

पुणे : मागील काही दिवसांपासून पूजा चव्हाण कथित आत्महत्येप्रकरणाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवली आहे. या प्रकरणात वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव चर्चेत आल्यामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांनी संजय राठोडांचा राजीनामा घ्यावा अशी जोरदार मागणी देखील केली आहे. आता यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील पूजा चव्हाण प्रकरणी महत्वपूर्ण विधान केले आहे. 

राजू शेट्टी हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणासह विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले. शेट्टी म्हणाले,पूजा चव्हाण प्रकरणावरून ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यात संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. मात्र ज्यांच्यावर आरोप होतो आहे ते कुठल्याही पक्षाचे असले तरी खुलासे झाले पाहिजे. चौकशीला सामोरे गेले पाहिजे. आणि दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, चौकशीला कुणीही विरोध करता कामा नये अशी माझी स्पष्ट भूमिका आहे.

सार्वजनिक क्षेत्रात काम करत असेल तर जीवन वादातीत राहिले पाहिजे. राज्यात महिलांवर अन्याय होत असेल तर ठोस भूमिका घ्यावी. मात्र सध्या जे राजीनाम्याची मागणी करत त्यांची भूमिका विश्वामित्रासारखीच आहे. त्यांच्या काळातही अश्या स्वरूपात आरोप झाले होते. मात्र त्यांची तोंड त्यावेळी गप्प होती. आगामी अधिवेशनात या प्रकरणावर चर्चा होणारच आहे. परंतु गृहमंत्र्यांनी याबाबत खुलासा करायला हवा असेही शेट्टी यावेळी म्हणाले. 

हल्ली बऱ्याच गोष्टी अचानक घडायला लागल्या आहेत. शेतकरी आंदोलन सुरू असताना अंबानी आणि अदानी यांच्यासाठीच बनवल्याचा समज आहे. ज्यांच्यावर रोख आहेत त्यांना सहानुभूती देण्यासाठी हे घडवले आहे का याबद्दल पोलिसांनी खुलासा करावा. गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या, मुंबई सुरक्षित नाही का असे प्रश्न पडतात.

देशाला अचानक घटना घडण्याची सवय लागली की काय याचे उत्तर सरकारने द्यावे. मात्र यात मला काळबेर वाटते. करून भावना व्यक्त करत असतील मोदींच नाव दिलं, अमित शाहयांचेही देतील. आपल्या मृत्युनंतर समाज आपली दखल घेणार नाही अशी भीती अनेकांना वाटते म्हणून ते आधीच नाव देतात.

साखर एफआरपी हळूहळू शेतकऱ्यांची FRP थकीत होत चालली आहे. थकबाकी वाढत चालली आहे, ती मिळाली पाहिजे. ती मिळाली नाहीतर सुप्रीम कोर्टात जाण्याची आमची तयारी सुरू आहे. आम्ही पैसे सोडणार नाही, दर वाढवायचा निर्णय कारखानदार आणि केंद्र सरकार घेईल.

टॅग्स :PuneपुणेSanjay Rathodसंजय राठोडRaju Shettyराजू शेट्टीPoliticsराजकारणPooja Chavanपूजा चव्हाण