शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

मी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते; कारण जनता माझ्या पाठिशी - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 20:26 IST

नरेंद्र मोदींची भूमिका ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पाठिंबा देणारी, संविधानाचे संरक्षण करणारी, दलितांच्या आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा देणारी आहे

पिंपरी : मंत्रीपद येत - जात राहते. मात्र काॅंग्रेसच्या काळात मला मंत्रीपद मिळाले नाही. काॅंग्रेसने ती संधी दिली नाही. तसेच आम्ही कुणाची निंदा नालस्ती करीत नाही, हा नेता असा, तो नेता तसा, अशी सवय आम्हाला नाही, पण मी ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते. कारण जनता माझ्या पाठिशी आहे. आम्ही कुणावर टिका करीत नाही. असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले ब्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे रविवारी (दि. ३) सायंकाळी पिंपरी येथे सत्ता संकल्प मेळावा झाला. यावेळी आठवले बोलत होते. 

आठवले म्हणाले, स्वत:च्या बळावर निवडून येणारा रिपब्लिकन पक्ष करायचा आहे. नरेंद्र मोदींची भूमिका ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पाठिंबा देणारी, संविधानाचे संरक्षण करणारी, दलितांच्या आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा देणारी आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष त्यांच्यासोबत आहे. शिवसेना, भाजपासोबत जाताना मी सर्वांना विचारले. सर्वांनी सांगितले की, जायला हरकत नाही. राजकारणात असे धाडसी निर्णय घ्यायचे असतात. त्यामुळे आम्ही भाजपासोबत आहोत. 

मी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते 

केंद्रामधील मंत्रिपद हे स्वत:साठी नव्हे तर सामान्यांसाठी आहे. काॅंग्रेसच्या काळात मला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. काॅंग्रेसने ती संधी दिली नाही. पण मी ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते. कारण जनता माझ्या पाठिशी आहे. आम्ही कुणावर टिका करीत नाही. कुणाची निंदा नालस्ती करणे, हा नेता असा आहे, तो नेता तसा आहे, अशी सवय आम्हाला नाही. आम्ही आमचा कार्यक्रम लोकांसमोर मांडत असतो, असे आठवले म्हणाले.

‘त्या’ अधिकाऱ्यांची बदली करून टाकू

सामाजिक न्याय मंत्रालयाकडून विविध योजना राबविण्यात येतात. त्याचा लाभ तरुणांनी घ्यावा. तरुणांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे. कर्ज घेऊन उद्योग उभारावे. त्यासाठी मी दिल्लीत आहे. कर्ज मागणी करूनही अधिकाऱ्यांनी ऐकले नाही तर त्या अधिकाऱ्यांची बदली करून टाकल्याशिवाय राहणार नाही, असे रामदास आठवले म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNarendra Modiनरेंद्र मोदी