शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
2
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
3
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
5
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
6
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
7
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
8
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
9
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
10
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
11
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
12
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
13
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
14
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
15
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
16
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
17
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
18
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
19
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
20
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!

Summer Vacation: मुलांनो मामाच्या गावाला जायचं विसरा; यंदा उन्हाळी सुट्टी शाळेतच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 21:02 IST

यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला किंवा नातेवाईकांकडे जाण्याचे नियोजन एप्रिल महिन्यानंतरच करावे लागणार

पुणे : वार्षिक सत्र परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांची उन्हाळ्याची सुट्टी सुरू होते. मात्र, यंदा परीक्षा झाल्यानंतरही सुमारे 15 दिवस शाळा सुरू ठेवाव्या लागणार आहेत. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला किंवा नातेवाईकांकडे जाण्याचे नियोजन एप्रिल महिन्यानंतरच करावे लागणार आहे.

सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्च महिन्यात सकाळच्या सत्रात शाळा सुरू ठेवल्या जातात. परंतु, यंदा मार्च ते एप्रिल अखेरपर्यंत इयत्ता पहिली ते नववीपर्यंतचे वर्ग पूर्णवेळ सुरू ठेवाव्यात. तसेच एप्रिल अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सुरू ठेवाव्यात. रविवारी सुध्दा ऐच्छिक स्वरुपात शाळा सुरू ठेवता येतील. त्याचप्रमाणे दररोज शाळांमध्ये 100 टक्के विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी कोणत्याही कारणासाठी शाळेत येत नाहीत. परंतु, यंदा परीक्षा संपल्यानंतरही शाळेत यावे लागेल, असे शिक्षण विभागाने प्रसिध्द केलेल्या अध्यादेशानुसार दिसून येत आहे. मार्च महिन्याच्या तिस-या आठवड्यात परीक्षा घेतल्यानंतर मे महिन्यात निकाल जाहीर करावा,असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले म्हणाले, अनेकांना कोरोनामुळे दोन वर्षे घराबाहेर जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये गावी जाण्यासाठी पालकांनी एस.टी. व रेल्वेचे रिझर्वेशन करून ठेवले. मात्र,परीक्षा संपल्या तरीही शाळा सुरूच राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गावी जाण्यासाठी मे महिन्याची वाट पहावी लागेल. तसेच निकाल तयार करण्यासाठी काही दिवसांची सुट्टी आवश्यक असून दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात अडथळा येणार नाही,याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र,शासनाने प्रसिध्द केलेल्या अध्यादेशामुळे काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :SchoolशाळाSummer Specialसमर स्पेशलStudentविद्यार्थीEducationशिक्षणexamपरीक्षा