शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

Summer Vacation: मुलांनो मामाच्या गावाला जायचं विसरा; यंदा उन्हाळी सुट्टी शाळेतच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 21:02 IST

यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला किंवा नातेवाईकांकडे जाण्याचे नियोजन एप्रिल महिन्यानंतरच करावे लागणार

पुणे : वार्षिक सत्र परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांची उन्हाळ्याची सुट्टी सुरू होते. मात्र, यंदा परीक्षा झाल्यानंतरही सुमारे 15 दिवस शाळा सुरू ठेवाव्या लागणार आहेत. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला किंवा नातेवाईकांकडे जाण्याचे नियोजन एप्रिल महिन्यानंतरच करावे लागणार आहे.

सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्च महिन्यात सकाळच्या सत्रात शाळा सुरू ठेवल्या जातात. परंतु, यंदा मार्च ते एप्रिल अखेरपर्यंत इयत्ता पहिली ते नववीपर्यंतचे वर्ग पूर्णवेळ सुरू ठेवाव्यात. तसेच एप्रिल अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सुरू ठेवाव्यात. रविवारी सुध्दा ऐच्छिक स्वरुपात शाळा सुरू ठेवता येतील. त्याचप्रमाणे दररोज शाळांमध्ये 100 टक्के विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी कोणत्याही कारणासाठी शाळेत येत नाहीत. परंतु, यंदा परीक्षा संपल्यानंतरही शाळेत यावे लागेल, असे शिक्षण विभागाने प्रसिध्द केलेल्या अध्यादेशानुसार दिसून येत आहे. मार्च महिन्याच्या तिस-या आठवड्यात परीक्षा घेतल्यानंतर मे महिन्यात निकाल जाहीर करावा,असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले म्हणाले, अनेकांना कोरोनामुळे दोन वर्षे घराबाहेर जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये गावी जाण्यासाठी पालकांनी एस.टी. व रेल्वेचे रिझर्वेशन करून ठेवले. मात्र,परीक्षा संपल्या तरीही शाळा सुरूच राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गावी जाण्यासाठी मे महिन्याची वाट पहावी लागेल. तसेच निकाल तयार करण्यासाठी काही दिवसांची सुट्टी आवश्यक असून दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात अडथळा येणार नाही,याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र,शासनाने प्रसिध्द केलेल्या अध्यादेशामुळे काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :SchoolशाळाSummer Specialसमर स्पेशलStudentविद्यार्थीEducationशिक्षणexamपरीक्षा