शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुचाकी प्रवास ठरतोय जीवघेणा, ३७३ अपघाती मृत्यू, वर्षभरात घडले दीड हजार अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 06:03 IST

बेफाम सोडलेला अ‍ॅक्सिलेटर, प्रचंड वेग आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, वेडीवाकडी वळणे घेत भरधाव निघालेल्या दुचाकी, जोरजोरात हॉर्न वाजवीत जाणारे चालक हे चित्र पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर नेहमीचेच झाले आहे.

- लक्ष्मण मोरेपुणे : बेफाम सोडलेला अ‍ॅक्सिलेटर, प्रचंड वेग आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, वेडीवाकडी वळणे घेत भरधाव निघालेल्या दुचाकी, जोरजोरात हॉर्न वाजवीत जाणारे चालक हे चित्र पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर नेहमीचेच झाले आहे. मात्र, वेगात गाडी चालविणे दुचाकीचालकांना भलतेच महागात पडत चालले आहे. गेल्या वर्षभरात दोन्ही शहरांमध्ये झालेल्या प्राणांतिक अपघातांमध्ये सर्वाधिक प्रमाण दुचाकीस्वारांचे आहे. गेल्या वर्षभरात ३७३ अपघाती मृत्यूंपैकी २१२ मृत्यू दुचाकीस्वारांचे असून, त्याखालोखाल १०६ पादचारी अपघातांचे बळी ठरले आहेत. वाहनचालकांची बेदरकार वृत्ती स्वत:सह इतरांच्याही जिवावर उठल्याचे चित्र आहे.रस्त्यावर होणाºया अपघाती मृत्यूंमध्ये सर्वाधिक प्रमाण दुचाकीस्वारांचे आहे. गेल्या तीन वर्षांत १ हजार २२१ अपघाती मृत्यूंपैकी ६५१ दुचाकीस्वारांना रस्त्यावर प्राण गमवावे लागले आहेत. यासोबतच पादचारी, आॅटो रिक्षाचालक, मोटार, ट्रक, बसेस आणि अन्य वाहनांच्या अपघातांची संख्याही लक्षणीय आहे.अत्याधुनिक आणि वेगवान दुचाकी वापरण्याकडे तरुणांचा अधिक कल आहे. यामुळे रस्त्यांवरील ‘रॅश ड्रायव्हिंग’चे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनचालकांची गाड्या चालविण्याची पद्धत पाहून अन्य वाहनचालकांच्या मनात धडकीच भरते. रस्त्यावरून गरोदर स्त्रिया, वृद्ध आणि रुग्ण नागरिक जात असतात. शाळकरी मुले, पादचारी यांचीही रस्त्यावर वर्दळ असते. परंतु यांच्याकडे दुर्लक्ष करून बेदरकार वाहनचालक स्वत:च्या धुंदीत बेफाम जात असतात.वेडीवाकडी वळणे घेत, मैत्रिणींना खूश करण्यासाठी दुचाकी भरधाव चालवल्यामुळे अपघात घडत आहेत. वाहतूक पोलिसांकडून अशा दुचाकींवर कारवाई केली जाते; परंतु वाहनाचा वेग मोजणाºया ‘स्पीड गन’ वाहतूक पोलिसांकडे कमी असल्यामुळे या कारवायांमध्ये मर्यादा येतात. प्रचंड गर्दी असूनही त्या गर्दीमधून ‘गॅप’ काढत जाणारे तरुण, दुचाकीवर मोबाइल कानाला लावून बोलणारे, महामार्गांवर अवजड वाहनांना खेटून घेतली जाणारी वळणे, त्यांना ‘कट’ मारणे अशा अनेक कारणांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात झालेले आहेत. विशेषत: वळणांवर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर किंवा पदपथाला धडकल्यानेही अनेक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे. अनेकदा दारू पिऊन दुचाकी चालवल्यामुळे, तसेच वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे.शहरातील रस्त्यांवर वर्षाला साधारणपणे दीड हजाराच्या आसपास अपघात होतात. गेल्या तीन वर्षांत प्राणांतिक अपघातांचे प्रमाण घटले असले तरी बेदरकार वृत्ती मात्र अद्याप कमी झालेली नाही. दुचाकी अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण तरुणांचे आहे. अपघात घडविणाºया व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे सुशिक्षितांचे आहे. उपनगरातीलच नव्हे, तर शहराच्या मध्यवस्तीतही भरधाव जाणारी वाहने म्हणजे चालतीबोलती ‘किलिंग’ मशिन ठरत आहेत. पुण्यातील रस्त्यांवर गेल्या वर्षभरात गंभीर व किरकोळ स्वरूपाच्या दीड हजार अपघातांमध्ये ३७३ निष्पापांचे बळी गेले आहेत.अनेक अपघातांत दोष नसताना घरातील कमावती व्यक्ती गेल्यामुळे कुटुंबांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. वाहन चालवताना संयम दाखविल्यास अपघात कमी होऊन होणारी जीवितहानी टळेल. ‘मानवी जीवन अमूल्य आहे आणि ते जपायला हवे,’ असे नेहमी सांगण्यात येते; मात्र हे केवळ बोलण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. पुणेकर वाहनचालकांकडून सर्रास होणारे वेगमर्यादेचे उल्लंघन ही नित्याचीच बाब झाली.या गोष्टी प्रकर्षाने टाळा- वेगमर्यादेचे उल्लंघन करणे- वाहनांमध्ये स्पर्धा करणे- मर्यादेपेक्षा अधिक माणसेअथवा सामान भरणे- वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे- दारू पिऊन वाहन चालविणे- धोकादायक अवस्थेतओव्हरटेकिंग करणे- चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या ठिकाणी वाहन पार्क करणेवर्षभरातील अपघातांचीवाहननिहाय आकडेवारीप्रकार मृत गंभीर किरकोळपादचारी १०६ १७९ ८०सायकल ०४ १४ ०४दुचाकी २१२ ४१७ २२८आॅटो रिक्षा ०३ ३१ २८मोटार १८ १८ ५२ट्रक ०३ ०४ ०४बस ०२ १३ १८अन्य वाहने ०१ ०० ०३अन्य व्यक्ती २४ ३४ २४एकूण ३७३ ७१० ४४१

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात