शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

तहानलेले पुणेकर संतापले; बालेवाडीत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनाच दोन तास कोंडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 10:30 IST

पालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क करून आपली सुटका करून घेतली

केदार कदम 

पाषाण : बालेवाडी येथे पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारीची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना नागरिकांनी विठ्ठल मंदिरामध्ये दोन तास कोंडून ठेवून आपला राग व्यक्त केला. यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क करून आपली सुटका करून घेतली.

बालेवाडी गावठाण परिसरामध्ये अवघा अर्धा तास पाणी सोडण्यात येते. नागरिकांच्या तक्रारीकडे प्रशासनाचे अधिकारी गांभीर्याने पाहत नाहीत. योग्य उपाययोजना वेळेवर होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देऊनही पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. यासाठी बालेवाडी येथे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकण्यासाठी अधिकाऱ्यांना एकत्रित बोलवले होते. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत बालेवाडी येथील विठ्ठल मंदिरामध्ये कोंडून ठेवले. पाणीपुरवठा अधिकारी एकनाथ गाडेकर, श्रीधर कामत, अशोक सांगडे, लाईनमन भाऊराव पाटोळे व एल अँड टी कंपनीचे अधिकारी यांना नागरिकांनी कोंडून ठेवले.

दुपारी दोन वाजल्यापासून ते सव्वाचार वाजेपर्यंत अधिकारी विठ्ठल मंदिरामध्ये अडकून पडले होते. यानंतर अधिकाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलीस कर्मचारी दाखल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी कुलूप तोडून अधिकाऱ्यांची सुटका केली.

आमच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला

याठिकाणी बालेवाडी गावठाणात दोन-तीन दिवस पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने या भागातील संतप्त नागरिकांनी आमच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. मंदिरात कोंडून ठेवले. तरी या भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा केली जाईल. - प्रसन्न जोशी, अधीक्षक अभियंता चतु:शृंगी पाणीपुरवठा विभाग

रोजच्या या प्रश्नाला आम्ही बालेवाडीकर कंटाळलो 

पाणी येण्याची वेळही नक्की नाही. पाणी येते तेही खूप कमी दाबाने येते. तक्रार करूनही काही फायदा होत नाही. पाणीप्रश्नामुळे आम्ही नागरिक हैराण झालो आहोत. एवढा धो धो पाऊस पडतो आहे. धरणे भरली असूनही आम्हांला मात्र तीन तीन दिवस पाणी येत नाही. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी परिस्थिती आमची झाली आहे. आम्ही घरपट्टी, पाणीपट्टी वेळेत भरतो. सगळ्यात जास्त मनपाला कर जमा होतो. तो आमच्याच भागातून तरी पाण्यासारखी मूलभूत गरज प्रशासनाला भागवता येत नाही. रोजच्या या प्रश्नाला आम्ही बालेवाडीकर कंटाळलो आहोत. - त्रस्त ग्रामस्थ, बालेवाडी

पाणी देण्याऐवजी प्रशासन अधिकारी नवीन कारणे देत आहेत

वारंवार बालेवाडीमधील विस्कळीत पाणीपुरवठ्याची तक्रार करत आहेत. नागरिकांना पाणी देण्याऐवजी प्रशासन अधिकारी नवीन कारणे देत आहेत. यामुळे नागरिक संतप्त झाले व त्यांनी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले. प्रशासनाने आता तरी नागरिकांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा. - अमोल बालवडकर, माजी नगरसेवक.

उपाययोजनांवरती काम होणे आवश्यक

नागरिकांचा पाणीप्रश्न सुटला पाहिजे, परंतु अधिकाऱ्यांना डांबून ठेवून पाणीप्रश्न सुटणार नाही. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा होऊन उपाययोजनांवरती काम होणे आवश्यक आहे. - सागर बालवडकर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.

घटनाक्रम चौकट

१.३० वा. पाणीपुरवठा अधिकारी बालेवाडीतील पाणी समस्या पाहण्यासाठी आले होते. विठ्ठल मंदिरामध्ये असलेल्या नागरिकांची पहिल्या मजल्यावर चर्चा करण्यासाठी पाणीपुरवठा अधिकारी थांबले होते. माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांना काही नागरिकांचा फोन आल्यानंतर ते निघून गेले. पाणीपुरवठा अधिकारी निघून जाऊ नये, म्हणून दोनच्या दरम्यान नागरिकांनी मंदिराच्या गेटला कुलूप लावले. दरम्यान, अधिकाऱ्यांनी पहिल्या मजल्यावरून उतरण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी संबंधित नागरिकांशी फोनद्वारे चर्चा करून कुलूप लावणाऱ्या नागरिकांशी संपर्क साधून कुलूप उघडण्याची विनंती केली. ३.३० दरम्यान अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून पोलिसांची संपर्क केला. ३.४५ वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ४. १५ वा. दरम्यान पोलिसांनी दरवाजाचे कुलूप तोडून अधिकाऱ्यांची सुटका केली.

टॅग्स :PuneपुणेBalewadiबालेवाडीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीcommissionerआयुक्त