शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
Covid Cases: कोरोना वाढतोय! पंतप्रधान मोदींना भेटण्याआधी मंत्री, नेत्यांना RT-PCR चाचणी सक्तीची
4
मुलाचा मृत्यू झाल्यावर वडिलांनी मृतदेहासोबत पुरली बाईक; मन हेलावून टाकणारी घटना
5
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
6
ऐरोली स्थानकाजवळ चायनीजच्या गाडीत सिलिंडरचा स्फोट, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर!
7
...तर प्रवाशांनी खच्चून भरलेली ट्रेन दगड, मातीत गाडली जाईल
8
५ मे रोजी लग्न, २५ ला हनिमून, २९ ला अपघात... बेपत्ता कपलचा गेल्या १३ दिवसांपासून शोध सुरू
9
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
10
Astrology: प्रेम होणे, प्रेमभंग होणे आणि प्रेमविवाह यशस्वी होणे याचेही पत्रिकेत विशिष्ट योग असतात!
11
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
12
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
13
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
14
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
15
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम
16
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
17
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
18
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
19
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
20
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."

पक्ष फोडायला अन् सत्तेचे नंबर वाढवायला त्यांच्याकडे वेळ, पण... सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 12:18 IST

Supriya Sule पुणेकर टॅक्स भरतात त्याचे पैसे जातात कुठं? पुणे तुंबण्याला पुणे महापलिका आणि प्रशासन जबाबदार

पुणे : पुणे शहरात शनिवारी सायंकाळी आलेल्या जोरदार पावसाने सर्व जनजीवन विस्कळीत केले. अनेक घरांमध्ये, दुकानात पाणी शिरले. शहरातील रस्त्यांवर जणू नदी अवतरली होती. यात पुणेकरांचा दैना झाली. शहरात अवघ्या दोन तासांत झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने महापालिकेच्या कारभाराची पाेलखाेल केली. स्मार्ट सिटी पाण्यात बुडाली आणि यातच एका मुलीचा नाहक बळी गेला. हे सर्व घडूनही महापालिका प्रशासन स्वत:ची जबाबदारी झटकत निर्लज्जपणे पावसाकडे बाेट दाखवत आहे. शहरात पावसाळी उपाययोजना कमी पडली; पण ते मान्य न करता कमी वेळात मोठा पाऊस बरसल्याने यंत्रणा कमी पडली असे म्हणत महापालिका प्रशासनाने हात झटकली. हद्द म्हणजे, पुढील दोन तासात सर्व पाणी हटविण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केला आहे. 

शहराचा मागील काही वर्षांत झपाट्याने झालेला विस्तार, यात जागा बळकावण्याच्या हव्यासापोटी नैसर्गिक ओढे-नाल्यांवर केलेले अतिक्रमण, त्याकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष, सिमेंट रस्त्याचे वाढलेले जाळे अन् तुंबलेली गटारे यासह विविध कारणांमुळे पुण्याची तुंबई झाली. स्मार्ट सिटीचे वाभाडे निघाले आणि ‘विकास’ पाण्यात वाहून गेला, अशा शब्दांत पुणेकर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शनिवारी  शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, एरंडवणा, कोथरूड, कर्वेनगर, हडपसर, लोहगाव, धानोरी, सिंहगड रोड परिसर, वारजेसह शहराच्या विविध भागांत नागरिकांची तारांबळ उडवली होती. याभागात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेणे व पुणे महानगर पालिकेस त्यादृष्टीने उपाय योजना करण्यास सुचवण्यासाठी आज दौरा केला. यावेळी त्यांनी शनिवारी झालेल्या मुसळधार पावसासंदर्भांत नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.  

सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुणे शहरात गुन्हेगारी, ड्रुग्स इशू वाढतायेत. क्राईम रोज वाढत आहे. एका पावसात पुणेकरांची वाईट अवस्था झालीये. पुण्यात बाहेरून लोक राहायला येतात. नवरा बायको दोघे कमावून पुण्यात राहतात. शिक्षणासाठी पुण्याकडे देश अपेक्षेने बघतोय. असं एका पावसात पुण्याची अवस्था  बिकट झाल्याचे पाहून वाईट वाटते. सगळ्या घरांमध्ये पाणी साचतंय. पुणेकर टॅक्स भरतात त्याचे पैसे जातात कुठं? नाल्यांचा प्लॅनिंग, इमारतीला परवानगी PMC देत. मग या पुणे तुंबण्याला पुणे महापलिका (Pune Municipal Corporation) आणि प्रशासन जबाबदार आहे. त्यांचे ९८ नगरसेवक त्यांचे निवडून आले. केंद्रापर्यंत त्यांचंच सरकार आहे. आता ते  पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. सत्तेचे नंबर वाढवायला त्यांच्याकडे वेळ आहे. पण या नागरी समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अशा महाराष्ट्र सरकारकडून आता काय अपेक्षा करणार? सरकारच राजकारण मतांशी जोडलेल असतं. सत्ता हि जनतेच्या सेवेसाठी असते. पुण्याबद्दल सातत्याने नकारात्मक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. मी याबाबत आता आयुक्तांना भेटणार आहे. दिल्लीत तुम्ही कोणते मुद्दे मांडणार असं विचारले असता सुळे म्हणाल्या, राज्यात बेरोजगारी हा महत्वाचा मुद्दा आहे. पुण्यातून कंपन्या बाहेर चालल्या आहेत. हिंजवडीबाबत आम्ही मिटिंग घेणार आहोत. पवार साहेबांच्या आग्रहामुळे राजीव गांधी इफ्नोटेक पार्क स्थापन झाली. ६ लाख लोक काम करतात. जगाला दिशा दाखवण्याचं काम आपण केलं. हिंजवडीत पूर्ण देशातून मूल काम करतात. त्यांना असं बाहेर जाऊन देणार नाही.     

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका