शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
4
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
5
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
6
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
7
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
8
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
9
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
10
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
11
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
12
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
14
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
15
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
16
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
17
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
18
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
19
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
20
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत

पक्ष फोडायला अन् सत्तेचे नंबर वाढवायला त्यांच्याकडे वेळ, पण... सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 12:18 IST

Supriya Sule पुणेकर टॅक्स भरतात त्याचे पैसे जातात कुठं? पुणे तुंबण्याला पुणे महापलिका आणि प्रशासन जबाबदार

पुणे : पुणे शहरात शनिवारी सायंकाळी आलेल्या जोरदार पावसाने सर्व जनजीवन विस्कळीत केले. अनेक घरांमध्ये, दुकानात पाणी शिरले. शहरातील रस्त्यांवर जणू नदी अवतरली होती. यात पुणेकरांचा दैना झाली. शहरात अवघ्या दोन तासांत झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने महापालिकेच्या कारभाराची पाेलखाेल केली. स्मार्ट सिटी पाण्यात बुडाली आणि यातच एका मुलीचा नाहक बळी गेला. हे सर्व घडूनही महापालिका प्रशासन स्वत:ची जबाबदारी झटकत निर्लज्जपणे पावसाकडे बाेट दाखवत आहे. शहरात पावसाळी उपाययोजना कमी पडली; पण ते मान्य न करता कमी वेळात मोठा पाऊस बरसल्याने यंत्रणा कमी पडली असे म्हणत महापालिका प्रशासनाने हात झटकली. हद्द म्हणजे, पुढील दोन तासात सर्व पाणी हटविण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केला आहे. 

शहराचा मागील काही वर्षांत झपाट्याने झालेला विस्तार, यात जागा बळकावण्याच्या हव्यासापोटी नैसर्गिक ओढे-नाल्यांवर केलेले अतिक्रमण, त्याकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष, सिमेंट रस्त्याचे वाढलेले जाळे अन् तुंबलेली गटारे यासह विविध कारणांमुळे पुण्याची तुंबई झाली. स्मार्ट सिटीचे वाभाडे निघाले आणि ‘विकास’ पाण्यात वाहून गेला, अशा शब्दांत पुणेकर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शनिवारी  शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, एरंडवणा, कोथरूड, कर्वेनगर, हडपसर, लोहगाव, धानोरी, सिंहगड रोड परिसर, वारजेसह शहराच्या विविध भागांत नागरिकांची तारांबळ उडवली होती. याभागात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेणे व पुणे महानगर पालिकेस त्यादृष्टीने उपाय योजना करण्यास सुचवण्यासाठी आज दौरा केला. यावेळी त्यांनी शनिवारी झालेल्या मुसळधार पावसासंदर्भांत नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.  

सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुणे शहरात गुन्हेगारी, ड्रुग्स इशू वाढतायेत. क्राईम रोज वाढत आहे. एका पावसात पुणेकरांची वाईट अवस्था झालीये. पुण्यात बाहेरून लोक राहायला येतात. नवरा बायको दोघे कमावून पुण्यात राहतात. शिक्षणासाठी पुण्याकडे देश अपेक्षेने बघतोय. असं एका पावसात पुण्याची अवस्था  बिकट झाल्याचे पाहून वाईट वाटते. सगळ्या घरांमध्ये पाणी साचतंय. पुणेकर टॅक्स भरतात त्याचे पैसे जातात कुठं? नाल्यांचा प्लॅनिंग, इमारतीला परवानगी PMC देत. मग या पुणे तुंबण्याला पुणे महापलिका (Pune Municipal Corporation) आणि प्रशासन जबाबदार आहे. त्यांचे ९८ नगरसेवक त्यांचे निवडून आले. केंद्रापर्यंत त्यांचंच सरकार आहे. आता ते  पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. सत्तेचे नंबर वाढवायला त्यांच्याकडे वेळ आहे. पण या नागरी समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अशा महाराष्ट्र सरकारकडून आता काय अपेक्षा करणार? सरकारच राजकारण मतांशी जोडलेल असतं. सत्ता हि जनतेच्या सेवेसाठी असते. पुण्याबद्दल सातत्याने नकारात्मक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. मी याबाबत आता आयुक्तांना भेटणार आहे. दिल्लीत तुम्ही कोणते मुद्दे मांडणार असं विचारले असता सुळे म्हणाल्या, राज्यात बेरोजगारी हा महत्वाचा मुद्दा आहे. पुण्यातून कंपन्या बाहेर चालल्या आहेत. हिंजवडीबाबत आम्ही मिटिंग घेणार आहोत. पवार साहेबांच्या आग्रहामुळे राजीव गांधी इफ्नोटेक पार्क स्थापन झाली. ६ लाख लोक काम करतात. जगाला दिशा दाखवण्याचं काम आपण केलं. हिंजवडीत पूर्ण देशातून मूल काम करतात. त्यांना असं बाहेर जाऊन देणार नाही.     

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका