शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष फोडायला अन् सत्तेचे नंबर वाढवायला त्यांच्याकडे वेळ, पण... सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 12:18 IST

Supriya Sule पुणेकर टॅक्स भरतात त्याचे पैसे जातात कुठं? पुणे तुंबण्याला पुणे महापलिका आणि प्रशासन जबाबदार

पुणे : पुणे शहरात शनिवारी सायंकाळी आलेल्या जोरदार पावसाने सर्व जनजीवन विस्कळीत केले. अनेक घरांमध्ये, दुकानात पाणी शिरले. शहरातील रस्त्यांवर जणू नदी अवतरली होती. यात पुणेकरांचा दैना झाली. शहरात अवघ्या दोन तासांत झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने महापालिकेच्या कारभाराची पाेलखाेल केली. स्मार्ट सिटी पाण्यात बुडाली आणि यातच एका मुलीचा नाहक बळी गेला. हे सर्व घडूनही महापालिका प्रशासन स्वत:ची जबाबदारी झटकत निर्लज्जपणे पावसाकडे बाेट दाखवत आहे. शहरात पावसाळी उपाययोजना कमी पडली; पण ते मान्य न करता कमी वेळात मोठा पाऊस बरसल्याने यंत्रणा कमी पडली असे म्हणत महापालिका प्रशासनाने हात झटकली. हद्द म्हणजे, पुढील दोन तासात सर्व पाणी हटविण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केला आहे. 

शहराचा मागील काही वर्षांत झपाट्याने झालेला विस्तार, यात जागा बळकावण्याच्या हव्यासापोटी नैसर्गिक ओढे-नाल्यांवर केलेले अतिक्रमण, त्याकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष, सिमेंट रस्त्याचे वाढलेले जाळे अन् तुंबलेली गटारे यासह विविध कारणांमुळे पुण्याची तुंबई झाली. स्मार्ट सिटीचे वाभाडे निघाले आणि ‘विकास’ पाण्यात वाहून गेला, अशा शब्दांत पुणेकर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शनिवारी  शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, एरंडवणा, कोथरूड, कर्वेनगर, हडपसर, लोहगाव, धानोरी, सिंहगड रोड परिसर, वारजेसह शहराच्या विविध भागांत नागरिकांची तारांबळ उडवली होती. याभागात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेणे व पुणे महानगर पालिकेस त्यादृष्टीने उपाय योजना करण्यास सुचवण्यासाठी आज दौरा केला. यावेळी त्यांनी शनिवारी झालेल्या मुसळधार पावसासंदर्भांत नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.  

सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुणे शहरात गुन्हेगारी, ड्रुग्स इशू वाढतायेत. क्राईम रोज वाढत आहे. एका पावसात पुणेकरांची वाईट अवस्था झालीये. पुण्यात बाहेरून लोक राहायला येतात. नवरा बायको दोघे कमावून पुण्यात राहतात. शिक्षणासाठी पुण्याकडे देश अपेक्षेने बघतोय. असं एका पावसात पुण्याची अवस्था  बिकट झाल्याचे पाहून वाईट वाटते. सगळ्या घरांमध्ये पाणी साचतंय. पुणेकर टॅक्स भरतात त्याचे पैसे जातात कुठं? नाल्यांचा प्लॅनिंग, इमारतीला परवानगी PMC देत. मग या पुणे तुंबण्याला पुणे महापलिका (Pune Municipal Corporation) आणि प्रशासन जबाबदार आहे. त्यांचे ९८ नगरसेवक त्यांचे निवडून आले. केंद्रापर्यंत त्यांचंच सरकार आहे. आता ते  पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. सत्तेचे नंबर वाढवायला त्यांच्याकडे वेळ आहे. पण या नागरी समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अशा महाराष्ट्र सरकारकडून आता काय अपेक्षा करणार? सरकारच राजकारण मतांशी जोडलेल असतं. सत्ता हि जनतेच्या सेवेसाठी असते. पुण्याबद्दल सातत्याने नकारात्मक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. मी याबाबत आता आयुक्तांना भेटणार आहे. दिल्लीत तुम्ही कोणते मुद्दे मांडणार असं विचारले असता सुळे म्हणाल्या, राज्यात बेरोजगारी हा महत्वाचा मुद्दा आहे. पुण्यातून कंपन्या बाहेर चालल्या आहेत. हिंजवडीबाबत आम्ही मिटिंग घेणार आहोत. पवार साहेबांच्या आग्रहामुळे राजीव गांधी इफ्नोटेक पार्क स्थापन झाली. ६ लाख लोक काम करतात. जगाला दिशा दाखवण्याचं काम आपण केलं. हिंजवडीत पूर्ण देशातून मूल काम करतात. त्यांना असं बाहेर जाऊन देणार नाही.     

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका