शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रविवारची सुट्टी असल्याने ते मोर्चात सहभागी नाहीत; धस यांचा पुण्यातील आमदारांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 18:12 IST

वाल्मिक कराड बीडमध्ये संघटीत टोळी तयार करुन गुंडगिरी करत आहे, त्याला मंत्री धनजंय मुंढे यांचा आशीर्वाद आहे

पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, जोपर्यंत फाशीची शिक्षा होणार नाही, तोपर्यंत राज्यात विविध मोर्चे सुरु राहतील, असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी पुण्यातील आक्रोश मोर्चामध्ये दिला आहे. यावेळी पुण्यातील आमदार या जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले नाहीत. यावरून सुरेश धस यांनी पुण्यातील आमदारांवर निशाणा साधला. रविवार असल्याने पुण्यातील आमदारांना कदाचित सुट्टी असेल म्हणून ते सहभागी झाले नाहीत असा खोचक टोला त्यांनी आमदारांना लगावला आहे. 

सरपंच संतोष देशमुख व बुद्धवासी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी पुण्यात सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष ज्योती मेटे, संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख, पत्नी अश्वीनी देशमुख, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष्राचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, विकास पासलकर आदी उपस्थित झाले होत. यावेळी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, आबालवृद्ध सहभागी झाले होते.

सुरेश धस म्हणाले, बीडमध्ये संघटित टोळी सुरु आहे. वाल्मिक कराड संघटीत टोळी तयार करुन गुंडगिरी करत आहे. त्याला मंत्री धनजंय मुंढे यांचा आशीर्वाद आहे. त्याशिवाय संतोष देशमुख यांची हत्या झालेली नाही. कुणीही असला तरी त्याला फाशीच झाली पाहिजे. ही आमची कायम मागणी आहे. ‘मला अटक करा पुण्यात...’ असे म्हणतात. परंतु आता सर्व आरोपी पुण्यातच होते. पुणे तिथं काय उणं आता काहीच उरलं नाही. कुणामुळे झाले तर या वाल्किम कराड आणि गँगमुळे. गँग्ज ऑफ परळीमुळे पुण्याचे नाव खराब होत आहे. बीडमधील या टोळींचे जिथे जिथे फ्लॅट असतील, पुणेकरांना विनंती आहे की, दिसेल तर फक्त कळवा. परंतु या लोकांना फाशीची शिक्षा द्या, तोपर्यंत समाज गप्प बसणार नाही.

ज्योती मेटे म्हणाल्या, या घटनेला जातीय रंग येतो की काय असे वाटत आहे. आरोपीला शोधण्यासाठी एवढा विलंब का लागला? प्रशासनाकडून जर दिरंगाई झाली असेल तर जाणीवपूर्वक झाली आहे का, याचे उत्तर शासनाने दिले पाहिजे. शासनाने मोर्चाची गांभीर्याने देखल घ्यावी. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी.

टॅग्स :Puneपुणेbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSuresh Dhasसुरेश धसwalmik karadवाल्मीक कराडDhananjay Mundeधनंजय मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसbajrang sonwaneबजरंग सोनवणे