शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पुण्यातील 'ते' १९ नगरसेवक संपर्कात आहेत ? अजित पवार यांचं 'सूचक' वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 15:22 IST

काही दिवसांपूर्वी पुण्यातील भाजपचे १९ नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली होती.

पुणे : आगामी काळात पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका होत आहे. त्यामुळे सध्या महापलिकेत सत्ताधारी पक्ष असलेला भाजप व राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मोर्चेबांधणीला सरुवात केली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी भाजपचे १९ नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली होती. त्यानंतर काहीकाळ भाजपच्या गोटात देखील चिंतेचे वातावरण होते. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे वृत्त फेटाळून लावत आमचे कुणीही नगरसेवक इतर पक्षात जाणार नसून इतर पक्षातलेच लोक आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले होते. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. 

अजित पवार हे एका बैठकीसाठी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यासह विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.तसेच त्यांनी भाजपचे १९ नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या मुद्द्यांवर भाष्य केले. पवार म्हणाले, काही जण जसे वारे बदलते तसे बदलतात. पण इतर पक्षाच्या नेतेमंडळींनी भेट घेतली तर त्यापाठीमागे त्यांची काही विकास कामे करून घ्यायची हाही उद्देश असतो. नेहमी बेरजेचे राजकारण करायचे असते. त्याचसोबत इलेक्टिव्ह मेरिटही बघायचा असतो.

धनंजय मुंडे प्रकरणावर अजित पवार म्हणाले... 

धनंजय मुंडें यांच्याबाबत दाखल करण्यात आलेली तक्रार संबंधित महिलेने मागे घेतली असल्याची बातमी सकाळीच कानावर आली. पण त्यांच्या प्रकरणाचा संपूर्ण तपास होऊ द्या, सत्य बाहेर येऊ द्या असे आम्ही म्हणत होतो. पण तरीदेखील धनंजय मुंडे आणि आमच्या पक्षाची बदनामी करण्यात आली. मात्र अशा आरोपांमुळे बहुजन समाजातून पुढे आलेला एक सहकारी बदनाम होतो. त्याचं कुटुंब डिस्टर्ब होतं, त्याला वाली कोण? मान्य आहे की काही लोक चुका करत असतील पण त्याची किंमत सगळ्यांनीच मोजायची का? एखादी राजकीय व्यक्ती प्रचंड काम करत एखाद्या पदापर्यंत पोहचते. त्यासाठी अफाट कष्ट घ्यावे लागतात. पण असं काही जेव्हा घडतं तेव्हा त्याला एक क्षणात पायउतार व्हावे लागते. याचा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे. 

आम्हाला जेव्हा परवानगी मिळेल तेव्हा आम्ही लस घेऊ लसीकरणाबाबत अडचणी आहेत. ग्रामीण भागात प्रमाण जास्त आहे. 60/65 टक्के लसीकरण झालं. मात्र शहरात 25 / 30 टक्के च लोकांनी लस घेतली. लोक ऐनवेळी निर्णय बदलतात. कोविन ॲपची समस्या आहे, अशी कारणे आहे. खासगी डॉक्टर्स ना पण लस द्यावी अशी मागणी आहे. त्याबाबत निर्णय घेऊ असेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणBJPभाजपाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAjit Pawarअजित पवारElectionनिवडणूक