शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

‘माळेगाव’ ची निवडणूक स्थानिक;यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती- शरद पवार यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:47 IST

या घडामोडींवर ज्येष्ठ नेते  शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या  निवडणूक स्थानिक असून, यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती, असे मत व्यक्त केले आहे.

बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगांव निवडणुकीच्या आखाड्यात स्वत: उतरत ‘ब’ वर्ग मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.शिवाय आगामी पाच वर्ष कारखान्याचे चेअरमन म्हणुन देखील उपमुख्यमंत्री यांनी स्वत:च्याच नावाची घोषणा केली आहे.त्यामुळे माळेगांव कारखान्याची निवडणुक लक्षवेधी ठरली आहे.या घडामोडींवर ज्येष्ठ नेते  शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या  निवडणूक स्थानिक असून, यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती, असे मत व्यक्त केले आहे.ज्येष्ठ नेते पवार यांनी आगामी दोन दिवसांत बारामती परीसरात विविध कार्यक्रम आहेत. या पार्श्वभुमीवर पवार हे बारामती दाैर्यावर आहेत.बुधवारी(दि १८) माळेगांव येथील गोविंदबाग निवासस`थानी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी उपमुख्यमंत्री पवार यांंच्या स्वत: उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या भुमिकेवर हे मत व्यक्त केले आहे.पवार म्हणाले, 'या निवडणुकीकडे राज्याकडं राज्याचे लक्ष लागलं आहे असं कसे म्हणता येईल? हा स्थानिक प्रश्न आहे." याचा अर्थ, ही निवडणूक फक्त स्थानिक पातळीवरची आहे.याकडे राज्याने लक्ष देण्याची गरज नाही. आजू बाजूला जे तालुके आहेत त्यांचे लक्ष इथे नाही. या निवडणुकीत आमची टोकाची भूमिका घ्यायची इच्छा नव्हती आजही नाही. म्हणजे, आसपासच्या तालुक्यांचेही या निवडणुकीकडे लक्ष नाही.एक विशिष्ट स्थिती झाली. लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती, पण ठीक हे झालं हे झालं. आजचा १९००० सभासदांचा प्रश्न आहे," असे पवार म्हणाले. याचा अर्थ, लोकांना सोबत घेतले असते, तर वेगळी परिस्थिती असती. आता १९ हजार सभासदांचा प्रश्न आहे. बारामतीमध्ये सूतगिरणी का झाली नाही, याबद्दल बोलताना ते म्हणाले, "बारामतीत सूतगिरणी झालीच नाही. एकेकाळी बारामती हा कापसाचा भाग होता परंतु आता कापूस इथे राहिला नाही." म्हणजे, पूर्वी बारामती कापसासाठी ओळखली जात होती, पण आता तिथे कापूस नसल्याचे म्हणाले.महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या अेआयच्या निर्णयाबद्दल ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारने काल ५०० कोटीचा निर्णय घेतला आहे. ऊस आणि बाकीचे पिके वापरण्याचे धोरण फायनल केलं. हा फायद्याचे असेल म्हणून निर्णय घेतला. तसेच,देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. त्यांनी निर्णय करण्याचे धाडस दाखवलं त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. देशात पहिलं राज्य आहे की एआय स्वीकारत आहे, त्यामुळे मी सरकारचे अभिनंदन करतो,अशा शब्दात पवार यांनी सरकारचे काैतुक  केले.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र