शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

‘माळेगाव’ ची निवडणूक स्थानिक;यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती- शरद पवार यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:47 IST

या घडामोडींवर ज्येष्ठ नेते  शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या  निवडणूक स्थानिक असून, यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती, असे मत व्यक्त केले आहे.

बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगांव निवडणुकीच्या आखाड्यात स्वत: उतरत ‘ब’ वर्ग मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.शिवाय आगामी पाच वर्ष कारखान्याचे चेअरमन म्हणुन देखील उपमुख्यमंत्री यांनी स्वत:च्याच नावाची घोषणा केली आहे.त्यामुळे माळेगांव कारखान्याची निवडणुक लक्षवेधी ठरली आहे.या घडामोडींवर ज्येष्ठ नेते  शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या  निवडणूक स्थानिक असून, यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती, असे मत व्यक्त केले आहे.ज्येष्ठ नेते पवार यांनी आगामी दोन दिवसांत बारामती परीसरात विविध कार्यक्रम आहेत. या पार्श्वभुमीवर पवार हे बारामती दाैर्यावर आहेत.बुधवारी(दि १८) माळेगांव येथील गोविंदबाग निवासस`थानी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी उपमुख्यमंत्री पवार यांंच्या स्वत: उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या भुमिकेवर हे मत व्यक्त केले आहे.पवार म्हणाले, 'या निवडणुकीकडे राज्याकडं राज्याचे लक्ष लागलं आहे असं कसे म्हणता येईल? हा स्थानिक प्रश्न आहे." याचा अर्थ, ही निवडणूक फक्त स्थानिक पातळीवरची आहे.याकडे राज्याने लक्ष देण्याची गरज नाही. आजू बाजूला जे तालुके आहेत त्यांचे लक्ष इथे नाही. या निवडणुकीत आमची टोकाची भूमिका घ्यायची इच्छा नव्हती आजही नाही. म्हणजे, आसपासच्या तालुक्यांचेही या निवडणुकीकडे लक्ष नाही.एक विशिष्ट स्थिती झाली. लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती, पण ठीक हे झालं हे झालं. आजचा १९००० सभासदांचा प्रश्न आहे," असे पवार म्हणाले. याचा अर्थ, लोकांना सोबत घेतले असते, तर वेगळी परिस्थिती असती. आता १९ हजार सभासदांचा प्रश्न आहे. बारामतीमध्ये सूतगिरणी का झाली नाही, याबद्दल बोलताना ते म्हणाले, "बारामतीत सूतगिरणी झालीच नाही. एकेकाळी बारामती हा कापसाचा भाग होता परंतु आता कापूस इथे राहिला नाही." म्हणजे, पूर्वी बारामती कापसासाठी ओळखली जात होती, पण आता तिथे कापूस नसल्याचे म्हणाले.महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या अेआयच्या निर्णयाबद्दल ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारने काल ५०० कोटीचा निर्णय घेतला आहे. ऊस आणि बाकीचे पिके वापरण्याचे धोरण फायनल केलं. हा फायद्याचे असेल म्हणून निर्णय घेतला. तसेच,देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. त्यांनी निर्णय करण्याचे धाडस दाखवलं त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. देशात पहिलं राज्य आहे की एआय स्वीकारत आहे, त्यामुळे मी सरकारचे अभिनंदन करतो,अशा शब्दात पवार यांनी सरकारचे काैतुक  केले.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र