शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी राजकीय इच्छाशक्ती पडतेय कमी ; पीबीएचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 17:40 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या पुण्यातील खंडपीठासाठी राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याचा आराेप पुणे बार असाेसिएशनने केला आहे.

पुणे : पुणे आणि औरंगाबाद येथे खंडपीठ सुरू करण्याचा प्रस्ताव १९७८ मध्ये विधिमंडळाने मंजूर केला आहे. त्यानुसार १९८१ मध्ये औरंगाबाद येथे खंडपीठ सुरूही झाले. मात्र, प्रस्तावाला ४१ वर्षे झाली. तरी अजूनही पुण्यात खंडपीठ सुरू झालेले नाही. त्यासाठी राजकीय इच्छा शक्ती कमी पडत असल्याचा आरोप पुणे बार असोसिएशनने (पीबीए) केला आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, विधानभवनावर मोर्चा, पुण्यात येणा-या राज्य आणि केंद्र सरकारमधील मंत्र्यांना वारंवार निवेदने, एक थेंब रक्ताचा आंदोलन, मुंबईत मोर्चा, पुणे न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच सलग १६ दिवस न्यायालयीन कामकाज बंद अशा प्रकारच्या विविध आंदोलनांच्या माध्यमातून वकील वर्ग सातत्याने खंडपीठाची मागणी करतो आहे. कोणत्याही प्रकारचा राजकीय पाठिंबा आणि राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे पुण्यातील वकील खंडपीठ मागणीमध्ये मागे पडत आहेत. कोल्हापूरकडून करण्यात येणा-या खंडपीठ मागणीला मोठ्या प्रमाणावर राजकीय पाठिंबा आहे. मात्र पुण्यात ते चित्र नाही. कोल्हापूरला खंडपीठ देण्यास पुण्याचा विरोध नाही. मात्र, पुण्याच्या मागणीचाही विचार व्हायला हवा. आमची मागणी सर्वात जुनी आहे, असे पीबीएचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष पवार यांनी सांगितले. 

कोल्हापूरमधील खंडपीठाबाबत स्थानिक नेते देखील आग्रही आहेत. कोल्हापुरात खंडपीठ होण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या एका बैठकीत त्यांनी १ हजार १०० कोटींच्या तरतुदीपैकी शंभर कोटींची ठोक तरतूद करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यामुळे राज्य सरकारने पुण्याच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करीत पुणे जिल्ह्यातील न्यायालयांमधील वकिलांनी कामावर बहिष्कार टाकला होता. २८ जानेवारीपर्यंत खंडपीठाला मंजुरी न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापुरमधील वकिलांनी दिला आहे. त्यामुळे पुण्यातील खंडपीठाची मागणी जोर धरू लागली आहे. पुण्यात भाजपाचे ८ आमदार, २ खासदार आणि पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये बहुमत असताना देखील त्यांच्याकडून खंडपीठाची दखल घेतली जात नाही. त्यामुळे लवकरात लवकर खंडपीठस मंजूर न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पीबीएकडून देण्यात आला आहे. 

पक्षकारांची सोय महत्त्वाची मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेले ४० टक्के खटले हे पुणे जिल्ह्यातील आहेत. या खटल्यांच्या तारखांच्या निमित्ताने पुण्यातून दररोज सुमारे ५०० वाहनांद्वारे वकील व पक्षकार मुंबईला जातात. त्याचा परिणाम वाहतुकीवर होत असून वकील व पक्षकारांना आर्थिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे. येथील प्रलंबित दाव्यांची संख्या देखील मोठी असून तो आकडा वाढतच आहे. खंडपीठात वकिलांचा कोणताही स्वार्थ नसून पीडित जनतेला न्याय मिळने गरजेचे आहे. पुण्याला खंडपीठ मिळाल्यास पक्षकारांना लवकर न्याय मिळणे शक्य होईल, असे अ‍ॅड. पवार यांनी सांगितले.  पुरंदरमध्ये मिळणार १०० एकर जागा  खंडपीठासाठी जागा कोठे मिळेल, आर्थिक तरतूद कोठून करता येईल, याबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांच्याबरोबर तत्त्कालीन कार्यकारणीने चर्चा देखील आहे. तसेच पुण्यासाठी खंडपीठ मंजूर झाल्यास त्यासाठी नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून १०० एकर जागा खंडपीठासाठी देण्याचे आश्वासन जलसंपदा राज्यमंत्री मंत्री विजय शिवतारे यांनी दिले होते.

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणेMumbai High Courtमुंबई हायकोर्ट