शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

वकिली करताना त्यात यशस्वी होण्याचे अचूक असे कुठले सूत्र नाही : कपिल सिब्बल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 19:31 IST

यशस्वी वकिल होण्याचे मुळ हे वकीलाच्या आकलन आणि समजुतदारपणा यात आहे...

ठळक मुद्देडॉ. पतंगराव कदम स्मृती व्याख्यान

पुणे : वकिली करताना त्यात यशस्वी होण्याचे अचूक असे कुठले सुत्र नाही. आपला युक्तिवाद न्यायालयाला प्रभावीपणे पटवून देणे यासाठी वकिलाला मानवी भावनाचे विविध पैलु समजावून घेता यायला हवेत. तसे झाल्यास तो  आपल्या पक्षकाराची बाजु तितक्याच संवेदनशीलतेने मांडु शकतो. यशस्वी वकिल होण्याचे मुळ हे वकीलाच्या आकलन आणि समजुतदारपणा यात आहे. याचा अभ्यास व्हायला हवा. असे मत ज्येष्ठ विधिज्ञ व खासदार कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले.        भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज येथे शनिवारी डॉ. पतंगराव कदम स्मृती व्याख्यानमालेत प्रसिद्ध वकील व  राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल हे   ‘वकिली कौशल्य ( अ‍ॅडव्होकसी स्किल्स’ या विषयावर  बोलत होते. यावेळी कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ. भाग्यश्री देशपांडे, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते. सिब्बल म्हणाले, आपल्या पक्षकाराची न्यायालयात बाजू मांडण्यासाठी जाताना दाव्यांचा बारकाईने अभ्यास करून नेमका वाद काय आहे, हे मांडता आले पाहिजे. कायदेशीर बाजू मांडताना आपण स्वत: आपल्या मुद्द्यांवर ठाम आहोत का हे पाहिले पाहिजे. वकिलीचे क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे जिथे सर्व कायदा या मुद्द्यामुळे समान असतात. कोणीही पदाने, वयाने लहान किंवा मोठा नसतो, त्यामुळे वकिली करताना कोणतीही भिती बाळगू नये. असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.  तसेच वकिलीच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणतेही सूत्र ठरलेले नाही. जसे स्वयंपाक घरात पाककृती करण्यासाठी कोणता पदार्थ किती व कसा वापरायचा याचे पक्के सूत्र ठरलेले नाही, तसे वकिली क्षेत्रालाही हे लागू होते. मात्र वकिली करताना वकिलांना कायदा नेमका काय आहे, त्याची निर्मिती, तो तयार करण्यामागे कोणत्या भावना होत्या हे समजून घेणे आवश्यक आहे. कायदा तोच असला तरी प्रत्येक दाव्यात त्याचे संदर्भ देताना गुन्ह्यामागील मानवी भावना नेमकी काय होते हे वकिलाला मांडता आले पाहिजे, असे सिब्बल यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेkapil sibalकपिल सिब्बलadvocateवकिल