शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

ऐतिहासिक चित्रपटांची आवड निर्माण करण्याची गरज

By admin | Updated: February 19, 2015 01:20 IST

आजच्या काळात थिल्लर चित्रपटांना तरुणाईची गर्दी होते; पण ऐतिहासिक चित्रपटांकडे पाठ फिरवली जाते, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.

पुणे : आजच्या काळात थिल्लर चित्रपटांना तरुणाईची गर्दी होते; पण ऐतिहासिक चित्रपटांकडे पाठ फिरवली जाते, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. ऐतिहासिक चित्रपट पाहण्याची आवड निर्माण करण्याचे काम झाले पाहिजे, असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी व्यक्त केले. ‘अक्षरधारा बुक गॅलरी’च्या वतीने छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गो. नी. दांडेकर लिखित ‘शिवकाल’ या कादंबरीतील शिवराज्याभिषेकावरील ‘हे तो श्रींची इच्छा’ याच्या अभिवाचनाचा विक्रमी ६५0 वा प्रयोग नवी पेठेतील निवारा वृद्धाश्रमाच्या सभागृहात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रा. मिलिंद जोशी, गो. नी. दांडेकर यांची कन्या डॉ. वीणा देव, डॉ. विजय देव उपस्थित होते. बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, की प्रवचन, कीर्तन, अभिवाचन ही वक्तृत्वाची प्रभावी माध्यमं आहेत. मात्र नव्या पिढीचा समज असा आहे, की प्रवचन म्हणजे बसून बोलणे आणि कीर्तन म्हणजे उभे राहून संवाद साधणे. पण सप्ताह, कीर्तन, प्रवचन यांमधून वक्तृत्वाचा आविष्कार साकारत गेला. आज माध्यमं भरपूर आहेत; पण त्याचा खरा कितपत उपयोग केला जातो, हाच मुळात प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘विजयनगरचे साम्राज्य बुडाल्यानंतर शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे स्वातंत्र्याची चळवळ शिवरायांपासून झाली. पाश्चात्यांची आक्रमणे होत गेली, स्वातंत्र्याभिमान विरला. पण हिंदवी स्वराज्याच्या सामर्थ्यातून तो अभिमान पुन्हा जागृत झाल्याचे डॉ. विजय देव यांनी सांगितले. या वेळी डॉ. वीणा देव, डॉ. विजय देव, रुचिर कुलकर्णी आणि विराजस कुलकर्णी यांनी सादर केलेल्या शिवराज्याभिषेकावरील अभिवाचनातून शिवकालाचे एकेक पर्व उलगडत गेले. संवादाची पकड... त्यातील चढउतार... यातून प्रत्येक पात्र त्यांनी रसिकांसमोर उभे केले. गागाभट्ट आणि शिवरायांमधील संवाद... शिवराज्याभिषेकामागची पार्श्वभूमी... या गोष्टींंमधून शिवकाल उपस्थितांनी अनुभवला. (प्रतिनिधी)शिवरायांच्या जन्मापासून शेवटच्या घटकापर्यंत अशा पाच खंडांत मिळून ही एक कादंबरी साकार झाली आहे. ’शिवराय’ नव्हे तर ’काळ’ हा या कादंबरीचा गाभा आहे. शिवरायांच्या काळात राज्याभिषेक हा कळससाध्य होता. - डॉ. वीणा देव