शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

'उध्दव ठाकरेंनी गद्दारी केली, आता त्यांची गरज नाही; अजितदादांमुळे सरकारला स्थैर्य'- विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 9:16 PM

इंडियाच्या आघाडीला निवडणूकीत यश येणार नाही.

पुणे : ‘‘उध्दव ठाकरे यांची आम्हाला आता गरज नाही. कारण अजित पवार आमच्यासोबत आले आहेत. ते आल्याने सरकारला स्थैर्य आले आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हे योग्य आहे. आम्हाला आता उध्दव ठाकरे यांची अजिबात गरज नाही, त्यांनी गद्दारी केली आहे, त्यामुळे त्यांचा विषयच आता नाही,’’ असे स्पष्टीकरण भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिले.

पुणे पुस्तक महोत्सवासाठी आयोजित एका कार्यक्रमासाठी शनिवारी तावडे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आले होते. तेव्हा पत्रकारांशी ते बोलत होते. या वेळी त्यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलणार नाही, असेही म्हटले. मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले, आताचे सरकार अतिशय योग्य काम करत असून, योग्य तोडगा त्यावर लवकरच निघेल. ते ओबीसीमधून द्यायचे की आणखी काेणत्या माध्यमातून ते ठरवतील. येत्या काळात ते दिसून येईल.’’

सध्या देशात भाजपला चांगले यश मिळत आहे. इंडिया आघाडीला मुळातच यश मिळणार नाही. कारण जागांवरून वाद होऊ शकतो. पंजाबमध्ये ते मान आम्ही जागा देणार नाही, असे बोलले तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले की आम्ही काँग्रेसला जागा देणार नाही, त्यामुळे इंडिया आघाडी यशस्वी होणार नाही, असे वाटते,’’ असे तावडे यांनी सांगितले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना