शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

पुणे रेल्वेस्थानकात पाय ठेवायला जागा नाही; बाहेरगावी जाणाऱ्यांची वाढली संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 12:49 IST

प्रवासाचा विचार करून रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रवाशांनी सांगितले...

पुणे : दसरा, दिवाळी आणि छठपूजेसाठी पुण्यातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुणे स्थानक शुक्रवारी प्रवाशांनी खचाखच भरले होते. फलाट क्रमांक एकवर तर पाय ठेवायला जागा नव्हती. तर बाहेर उन्हात थांबलेल्या प्रवाशांची संख्या लक्षणीय होती. अशा वेळी प्रवाशांच्या दृष्टीने सोय करणे गरजेचे आहे; पण याकडे कोण लक्ष देणार, असा प्रश्न पडत आहे. सण- उत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाकडून जादा गाड्यांची मागणी जोर धरत आहे. प्रवासाचा विचार करून रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रवाशांनी सांगितले.

पुण्यातून दररोज ७२ गाड्या, तर पुणे रेल्वे स्थानकावरून साधारणपणे २०० ते २३० गाड्यांची ये-जा असते. पुणे रेल्वे स्टेशनवर ६ प्लॉटफार्मवर असून पुण्यातून दररोज दीड ते दोन लाख प्रवाशांची ये-जा करीत असतात. त्यात सण, उत्सवाच्या काळात प्रवाशांची संख्या लाखोंनी वाढली आहे. सध्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवाशांची ये-जा करण्याची संख्या वाढत आहे. त्यात यूपी, बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आणखी रेल्वे गाड्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे चित्र येथील गर्दीवरून स्पष्ट झाले आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच ७४ विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, यातील अधिक गाड्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोडण्यात आल्या आहेत. पुण्यातून सोडण्यात आलेल्या गाड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे अधिकच्या गाड्या सोडण्याची गरज असून, रेल्वे प्रशासनाने पुण्यातून विशेष गाड्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड