शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नुसत्याच घोषणा, पुण्याचा विकास कधी होणार? विरोधकांचा प्रश्न, धंगेकर, मोहोळ, मोरे तिघे एकाच मंचावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 13:43 IST

लोकसभेत ४०० पारमध्ये आमचा एक आला तर काय फरक पडणार आहे, ते त्यांच्या साहेबांसमोर बोलत नाहीत

पुणे : पुणे शहर देशात स्मार्ट शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. तसेच विद्येचे माहेरघर असल्याने शहराने भारतात वेगळीच ओळख निर्माण केली आहे. परंतु ट्राफिक, पाणी, कचरा, गुन्हेगारी असे सार्वजनिक प्रश्न अजूनही भेडसावत आहेत. तर या सांस्कृतिक शहराची संस्कृती कुठेतरी कमी होताना दिसते आहे. आपल्याला सगळ्याच बाबतीत विकास करून पुण्याला देशात १ नंबरवर आणायचं आहे. परंतु नुसत्या घोषणा होतायेत पुण्याचा विकास कधी होणार? असा सवाल पुणे लोकसभेच्या विरोधक उमेदवारांनी उपस्थित केला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.  

माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, देशात अनेक योजना आल्या आहेत. त्यांची नावे घेतली तर वेळ कमी पडेल. गेल्या १० वर्षात लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे गेले. ३१ लाख कोटी रक्कम जनतेच्या खात्यात गेली.हा क्रांतिकारक बदल आहे. सर्वसामान्य माणसाचा विचार नेहमीच केला गेला. जागतिक स्तरावर महासत्ता म्हणून निर्माण करण्याकडेही जास्त लक्ष दिल गेलं. पुण्यात कागदावरची मेट्रो प्रत्यक्षात आली. मला अभिमानाने सांगावस वाटतंय कि मोदींनी मेट्रोचे उदघाटन केलं. हा मोठा बदल आहे. ११०० कोटी खर्च करून वाहतूक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य नंतरच्या काळात पहिलं वैद्यकीय महाविद्यालय पुण्यात तयार झाल. केंद्र सरकारच्या उपलब्धीमुळे अनेक काम आज पूर्ण झाली आहेत. प्रधानमंत्री योजनेतून हजारो घरे तयार होतायेत, गेल्या पाच वर्षात पुणे महापालिकेने अनेक योजना समोर आणल्या आहेत. उड्डाणपूल झाले, कर्वे रस्ता पूर्ण झाला, सिंहगड उड्डाणपूल सुरु आहे. सार्वजनिक व्यवस्था सुधारण्यावर भर देण्यात आला आहे.  पुणे महापालिकेने केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक कामे केली. सार्वजनिक व्यवस्था सुधारण्यासाठी करण्यासाठी ई बस रस्त्यावर आल्या आहेत. भविष्यात पुण्यातले मार्ग पूर्ण करायचे आहेत, उड्डाणपूल नवीन रस्ते, पूर्ण करण्यावर भर देण्याचा विचार आहे. देशाची निवडणूक आहे. देशाचा विकास, आंतरराष्ट्रीय प्रश्न, देशाचे स्थान यावर निवडणूक होणार आहे. आपली अर्थव्यवस्था सर्वोच्च स्थानावर आणायची आहे. शहरातल्या नागरिकांचे प्रश्न, वस्तीतला माणूस, त्यांच्या गरजा केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडवता येतील. पुण्यात आधी बस कशा आणता येतील हा विचार करू. समाजातल्या प्रत्येक माणसाला मेट्रोचा प्रवास करता यावा यासाठी प्रयत्न करतोय. बस आणि मेट्रो एकत्रित काम करण्याचं आम्ही विचार करतोय,  

माजी नगरसेवक वसंत मोरे,  वाहतूक कोंडी कामे करणे हे सध्या महत्वाचे वाटते. पुणे महापालिकेने  ३००, ३५० बसेस दिल्या आहेत.  महापालिकेकडे या बसेस लावण्याची व्यवस्था आहे का , बसेस उभारण्यासाठी कुठं पार्किंग करणार आहे, त्यावर तोडगा काढायला पाहिजे. अक्षरश फुटपाथ वर बस उभ्या असतात, पाणी प्रश्न खडकवासला वर अवलंबून आहे. स्वतंत्र धरण होणार आहे का नाही कधी, कात्रजच्या घाटमाथ्यावर ११०० एकर जागा आहे. तलावांची साठवण क्षमता वाढवली तर दक्षिण पुण्याचा पाणी प्रश्न सुटेल. पुण्यातील एका भागाचा प्रश्न सुटला तर खडकवासला धरणावरवर लोड येणार नाही. अशा प्रकारे इतर भागातले पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजेत. पुणे शहरात ट्राफिक अभियंता का नाहीत, पाण्यासाठी वॉटर अभियंता द्यावा लागेल, कचऱ्यासाठी पण सेपरेट अभियंता पाहिजे. अधिकारी फक्त ठेवले जातात. महापालिकेत त्या त्या विषयांचं ज्ञान असणारे अधिकारी बसवा, हा माझा तो माझा म्हणून कोणालाही बसवू नका. नदी सुधार प्रकल्प २०२२ च्या अगोदर सुरु झालय. त्याचे वास्तव आता समोर यायला लागलाय. नद्यांत स्वच्छ पाणी जायला पाहिजे. मला विकासाचा दिखावा नको. त्याच्या आजूबाजूला गार्डन, झाडे लावण्यापेक्षा नदी स्वच करा. त्या स्वच्छ झाल्या तर प्रकल्प चांगले होतील. पुणे  शहराची सुरक्षेचे नाकेनऊ झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडले जातायेत. महिलांसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्त व्हायला पाहिजे, ससून रुग्णालयात आयसीयू विभागात तरुणाला उंदर कुरतडतात, आरोग्य व्यवस्थेचे धिंडोळे निघाले आहेत. त्याकडे लक्ष द्यायला मला आवडेल. वाचन संस्कृती वाढवायची आहे. पुणे शहारातील स्मारके जपली पाहिजेत. मला लोकसभेत गेल्यावर कोणाच्या मागे बसून बाक वाजवायची नाहीयेत. 

रवींद्र धंगेकर म्हणाले, हे विद्येचे माहेरघर आहे, देशात पुण्याला वेगळे स्थान आहे. ट्राफिक च मोठं संकट आहे. मेट्रोचा डीपीआर काँग्रेसने आणला. नागपूरची मेट्रो पळत आहे. पुण्याची मेट्रो स्टेशन स्टेशन वर उदघाटन होतंय. पुण्यात वाहतुकीची अडचण आहे. महापालिकेचे अनेक प्रकल्प झाले, पर्यावरण कुठल्या दिशेला चाललंय. निसर्ग अबाधित राहून कामे झाली पाहिजेत. प्रकल्प पुढे जात नाहीत. फक्त पैसे काढले जातायेत. गॅसचे भाव काय झाले, पेट्रोलचे भाव काय झाले, आयुष्यमान योजनेचे काय झालं, पुण्याची गुन्हेगारी, अमली पदार्थ, पाणीपुरवठा याकडे लक्ष द्यद्यला पाहिजे.  नुसत्या घोषणा होत आहेत. काम होत नाहीत. मेट्रोला का उशीर होतोय. का अडचणी येतायेत, विचारांची लढाई विचारानेच होणार आहे. अमली पदार्थ प्रत्येकाच्या उंबऱ्यावर येऊन थांबलाय, घरात घ्यायचं बाकी आहे. शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत. दूध महाग होत चाललंय. योजनेत खतांचे पैसे दिले जातात. पण ते होत नाही, ४०० पार जाणार असतील त्यामध्ये एक आला तर काय फरक पडणार आहे. ते त्यांच्या साहेबांसमोर बोलत नाहीत.  

टॅग्स :pune-pcपुणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Vasant Moreवसंत मोरेravindra dhangekarरविंद्र धंगेकरmurlidhar moholमुरलीधर मोहोळ