शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नुसत्याच घोषणा, पुण्याचा विकास कधी होणार? विरोधकांचा प्रश्न, धंगेकर, मोहोळ, मोरे तिघे एकाच मंचावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 13:43 IST

लोकसभेत ४०० पारमध्ये आमचा एक आला तर काय फरक पडणार आहे, ते त्यांच्या साहेबांसमोर बोलत नाहीत

पुणे : पुणे शहर देशात स्मार्ट शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. तसेच विद्येचे माहेरघर असल्याने शहराने भारतात वेगळीच ओळख निर्माण केली आहे. परंतु ट्राफिक, पाणी, कचरा, गुन्हेगारी असे सार्वजनिक प्रश्न अजूनही भेडसावत आहेत. तर या सांस्कृतिक शहराची संस्कृती कुठेतरी कमी होताना दिसते आहे. आपल्याला सगळ्याच बाबतीत विकास करून पुण्याला देशात १ नंबरवर आणायचं आहे. परंतु नुसत्या घोषणा होतायेत पुण्याचा विकास कधी होणार? असा सवाल पुणे लोकसभेच्या विरोधक उमेदवारांनी उपस्थित केला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.  

माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, देशात अनेक योजना आल्या आहेत. त्यांची नावे घेतली तर वेळ कमी पडेल. गेल्या १० वर्षात लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे गेले. ३१ लाख कोटी रक्कम जनतेच्या खात्यात गेली.हा क्रांतिकारक बदल आहे. सर्वसामान्य माणसाचा विचार नेहमीच केला गेला. जागतिक स्तरावर महासत्ता म्हणून निर्माण करण्याकडेही जास्त लक्ष दिल गेलं. पुण्यात कागदावरची मेट्रो प्रत्यक्षात आली. मला अभिमानाने सांगावस वाटतंय कि मोदींनी मेट्रोचे उदघाटन केलं. हा मोठा बदल आहे. ११०० कोटी खर्च करून वाहतूक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य नंतरच्या काळात पहिलं वैद्यकीय महाविद्यालय पुण्यात तयार झाल. केंद्र सरकारच्या उपलब्धीमुळे अनेक काम आज पूर्ण झाली आहेत. प्रधानमंत्री योजनेतून हजारो घरे तयार होतायेत, गेल्या पाच वर्षात पुणे महापालिकेने अनेक योजना समोर आणल्या आहेत. उड्डाणपूल झाले, कर्वे रस्ता पूर्ण झाला, सिंहगड उड्डाणपूल सुरु आहे. सार्वजनिक व्यवस्था सुधारण्यावर भर देण्यात आला आहे.  पुणे महापालिकेने केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक कामे केली. सार्वजनिक व्यवस्था सुधारण्यासाठी करण्यासाठी ई बस रस्त्यावर आल्या आहेत. भविष्यात पुण्यातले मार्ग पूर्ण करायचे आहेत, उड्डाणपूल नवीन रस्ते, पूर्ण करण्यावर भर देण्याचा विचार आहे. देशाची निवडणूक आहे. देशाचा विकास, आंतरराष्ट्रीय प्रश्न, देशाचे स्थान यावर निवडणूक होणार आहे. आपली अर्थव्यवस्था सर्वोच्च स्थानावर आणायची आहे. शहरातल्या नागरिकांचे प्रश्न, वस्तीतला माणूस, त्यांच्या गरजा केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडवता येतील. पुण्यात आधी बस कशा आणता येतील हा विचार करू. समाजातल्या प्रत्येक माणसाला मेट्रोचा प्रवास करता यावा यासाठी प्रयत्न करतोय. बस आणि मेट्रो एकत्रित काम करण्याचं आम्ही विचार करतोय,  

माजी नगरसेवक वसंत मोरे,  वाहतूक कोंडी कामे करणे हे सध्या महत्वाचे वाटते. पुणे महापालिकेने  ३००, ३५० बसेस दिल्या आहेत.  महापालिकेकडे या बसेस लावण्याची व्यवस्था आहे का , बसेस उभारण्यासाठी कुठं पार्किंग करणार आहे, त्यावर तोडगा काढायला पाहिजे. अक्षरश फुटपाथ वर बस उभ्या असतात, पाणी प्रश्न खडकवासला वर अवलंबून आहे. स्वतंत्र धरण होणार आहे का नाही कधी, कात्रजच्या घाटमाथ्यावर ११०० एकर जागा आहे. तलावांची साठवण क्षमता वाढवली तर दक्षिण पुण्याचा पाणी प्रश्न सुटेल. पुण्यातील एका भागाचा प्रश्न सुटला तर खडकवासला धरणावरवर लोड येणार नाही. अशा प्रकारे इतर भागातले पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजेत. पुणे शहरात ट्राफिक अभियंता का नाहीत, पाण्यासाठी वॉटर अभियंता द्यावा लागेल, कचऱ्यासाठी पण सेपरेट अभियंता पाहिजे. अधिकारी फक्त ठेवले जातात. महापालिकेत त्या त्या विषयांचं ज्ञान असणारे अधिकारी बसवा, हा माझा तो माझा म्हणून कोणालाही बसवू नका. नदी सुधार प्रकल्प २०२२ च्या अगोदर सुरु झालय. त्याचे वास्तव आता समोर यायला लागलाय. नद्यांत स्वच्छ पाणी जायला पाहिजे. मला विकासाचा दिखावा नको. त्याच्या आजूबाजूला गार्डन, झाडे लावण्यापेक्षा नदी स्वच करा. त्या स्वच्छ झाल्या तर प्रकल्प चांगले होतील. पुणे  शहराची सुरक्षेचे नाकेनऊ झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडले जातायेत. महिलांसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्त व्हायला पाहिजे, ससून रुग्णालयात आयसीयू विभागात तरुणाला उंदर कुरतडतात, आरोग्य व्यवस्थेचे धिंडोळे निघाले आहेत. त्याकडे लक्ष द्यायला मला आवडेल. वाचन संस्कृती वाढवायची आहे. पुणे शहारातील स्मारके जपली पाहिजेत. मला लोकसभेत गेल्यावर कोणाच्या मागे बसून बाक वाजवायची नाहीयेत. 

रवींद्र धंगेकर म्हणाले, हे विद्येचे माहेरघर आहे, देशात पुण्याला वेगळे स्थान आहे. ट्राफिक च मोठं संकट आहे. मेट्रोचा डीपीआर काँग्रेसने आणला. नागपूरची मेट्रो पळत आहे. पुण्याची मेट्रो स्टेशन स्टेशन वर उदघाटन होतंय. पुण्यात वाहतुकीची अडचण आहे. महापालिकेचे अनेक प्रकल्प झाले, पर्यावरण कुठल्या दिशेला चाललंय. निसर्ग अबाधित राहून कामे झाली पाहिजेत. प्रकल्प पुढे जात नाहीत. फक्त पैसे काढले जातायेत. गॅसचे भाव काय झाले, पेट्रोलचे भाव काय झाले, आयुष्यमान योजनेचे काय झालं, पुण्याची गुन्हेगारी, अमली पदार्थ, पाणीपुरवठा याकडे लक्ष द्यद्यला पाहिजे.  नुसत्या घोषणा होत आहेत. काम होत नाहीत. मेट्रोला का उशीर होतोय. का अडचणी येतायेत, विचारांची लढाई विचारानेच होणार आहे. अमली पदार्थ प्रत्येकाच्या उंबऱ्यावर येऊन थांबलाय, घरात घ्यायचं बाकी आहे. शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत. दूध महाग होत चाललंय. योजनेत खतांचे पैसे दिले जातात. पण ते होत नाही, ४०० पार जाणार असतील त्यामध्ये एक आला तर काय फरक पडणार आहे. ते त्यांच्या साहेबांसमोर बोलत नाहीत.  

टॅग्स :pune-pcपुणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Vasant Moreवसंत मोरेravindra dhangekarरविंद्र धंगेकरmurlidhar moholमुरलीधर मोहोळ