शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

...तर पक्ष फोडून आमदार कसे जमा करायचे याचा पायंडाच पडेल; उल्हास बापट यांनी व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 09:48 IST

निकालात विधिमंडळ पक्षाकडे बहुमत यावरच भर दिला असून सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले तत्त्व सरळसरळ धुडकावले आहेत

पुणे: लोकशाही भक्कम व्हावी, पक्षांतराला आळा बसावा, या हेतूने राज्यघटनेत पक्षांतर बंदीबाबतचे १० वे कलम घालण्यात आले आहे. त्याचा बरोबर चुकीचा अर्थ लावून विधानसभा अध्यक्षांकडून निकाल दिला गेला आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेच या कलमाचा बरोबर अर्थ स्पष्ट करावा, असे मत घटनातज्ज्ञ डॉ. उल्हास बापट यांनी व्यक्त केले. हा निकाल कायम राहिला तर पक्ष फोडून आमदार कसे जमा करायचे याचा पायंडाच पडेल, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

डाॅ. बापट म्हणाले की, पक्षांतर कसे करायचे याचे उत्तम गाइड म्हणजे हा निकाल आहे. सर्वोच्च न्यायालयात ओरिजनल पक्ष, पार्लमेंटरी पक्ष (पक्षसंघटना व विधिमंडळ पक्ष) यात पक्षसंघटना, त्यांचे बहुमत याला महत्त्व दिले होते. निकाल देताना त्यामध्ये पक्षसंघटना नाही, घटना निश्चित नाही, असे आक्षेप घेत विधिमंडळ पक्षाकडे बहुमत आहे यावरच भर दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले तत्त्व सरळसरळ धुडकावले आहे. आता उद्धव ठाकरे अपीलात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेच या १० व्या कलमाची व्याख्या स्पष्ट करावी.

ठाकरे या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जातीलच; पण तिथे सुनावणी व अन्य गोष्टी यात सहजपणे दोन महिने जातील. आधीच हा निकाल तब्बल दीड वर्षाने दिला गेला. आता अपीलाचा निकाल लागेपर्यंत नव्या निवडणुका येतच आहेत. म्हणजे या सर्व गोष्टींना काही अर्थच राहणार नाही, असेही डॉ. बापट म्हणाले.

ठाकरे गटाचे आमदार पात्र आणि शिंदे गटाचेही आमदार पात्र ही तर गंमतच आहे. निकालातच असे असल्यावर ते १६ आमदार अपात्र ठरवण्याचा प्रश्नच राहत नाही. या निकालामध्ये १० व्या कलमातून इतक्या पळवाटा काढल्या गेल्या आहेत की, ते कलम कशासाठी असा प्रश्न पडावा. लोकशाहीसाठी ही अत्यंत घातक गोष्टी आहे. निकालात बरेच कायदेशीर मुद्दे उपस्थित केले गेले आहेत. त्या सर्वांचा अभ्यास केल्यानंतरच अधिक सविस्तर बोलता येईल. - डाॅ. उल्हास बापट, घटनातज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय