शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

...तर पक्ष फोडून आमदार कसे जमा करायचे याचा पायंडाच पडेल; उल्हास बापट यांनी व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 09:48 IST

निकालात विधिमंडळ पक्षाकडे बहुमत यावरच भर दिला असून सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले तत्त्व सरळसरळ धुडकावले आहेत

पुणे: लोकशाही भक्कम व्हावी, पक्षांतराला आळा बसावा, या हेतूने राज्यघटनेत पक्षांतर बंदीबाबतचे १० वे कलम घालण्यात आले आहे. त्याचा बरोबर चुकीचा अर्थ लावून विधानसभा अध्यक्षांकडून निकाल दिला गेला आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेच या कलमाचा बरोबर अर्थ स्पष्ट करावा, असे मत घटनातज्ज्ञ डॉ. उल्हास बापट यांनी व्यक्त केले. हा निकाल कायम राहिला तर पक्ष फोडून आमदार कसे जमा करायचे याचा पायंडाच पडेल, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

डाॅ. बापट म्हणाले की, पक्षांतर कसे करायचे याचे उत्तम गाइड म्हणजे हा निकाल आहे. सर्वोच्च न्यायालयात ओरिजनल पक्ष, पार्लमेंटरी पक्ष (पक्षसंघटना व विधिमंडळ पक्ष) यात पक्षसंघटना, त्यांचे बहुमत याला महत्त्व दिले होते. निकाल देताना त्यामध्ये पक्षसंघटना नाही, घटना निश्चित नाही, असे आक्षेप घेत विधिमंडळ पक्षाकडे बहुमत आहे यावरच भर दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले तत्त्व सरळसरळ धुडकावले आहे. आता उद्धव ठाकरे अपीलात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेच या १० व्या कलमाची व्याख्या स्पष्ट करावी.

ठाकरे या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जातीलच; पण तिथे सुनावणी व अन्य गोष्टी यात सहजपणे दोन महिने जातील. आधीच हा निकाल तब्बल दीड वर्षाने दिला गेला. आता अपीलाचा निकाल लागेपर्यंत नव्या निवडणुका येतच आहेत. म्हणजे या सर्व गोष्टींना काही अर्थच राहणार नाही, असेही डॉ. बापट म्हणाले.

ठाकरे गटाचे आमदार पात्र आणि शिंदे गटाचेही आमदार पात्र ही तर गंमतच आहे. निकालातच असे असल्यावर ते १६ आमदार अपात्र ठरवण्याचा प्रश्नच राहत नाही. या निकालामध्ये १० व्या कलमातून इतक्या पळवाटा काढल्या गेल्या आहेत की, ते कलम कशासाठी असा प्रश्न पडावा. लोकशाहीसाठी ही अत्यंत घातक गोष्टी आहे. निकालात बरेच कायदेशीर मुद्दे उपस्थित केले गेले आहेत. त्या सर्वांचा अभ्यास केल्यानंतरच अधिक सविस्तर बोलता येईल. - डाॅ. उल्हास बापट, घटनातज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय