शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: ...तर बुद्ध आणि जैन धर्मात डाॅ. बाबासाहेबांनी घडविले असते ऐक्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 13:11 IST

श्रमण परंपरेतील बौद्ध आणि जैन हे दोन वेगवेगळे विचारप्रवाह नसून, त्या एकाच वृक्षाच्या वेगवेगळ्या फांद्या आहेत

उद्धव धुमाळे

पुणे : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. यानिमित्त त्यांचे अमूल्य कार्य आणि अपुरी राहिलेली स्वप्न समजून घेऊन ती साकार करण्याच्या दिशेने ठाेस पाऊल टाकणे, म्हणजे खऱ्या अर्थाने जयंती साेहळा साजरा करणे हाेय. यानिमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे अभ्यासक डाॅ. अमोल देवळेकर यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना एक व्यापक पट मांडला.

डाॅ. बाबासाहेब आणखी काही वर्षे जगले असते, तर देशात बाैद्ध आणि जैन धर्मांत ऐक्य घडवून श्रमण क्रांती केली असती. बाबासाहेबांच्या आयुष्यातील शेवटच्या सहा दिवसांचा पट अनुभवला तर याचा प्रत्यय येताे. धार्मिक उन्नती हेच बाबासाहेबांचे उत्तर कार्य हाेते, असे माई आंबेडकर, नानकचंद रत्तू आणि चांगदेव खैरमाेडे यांच्या ग्रंथातून सूचित हाेते.

विविध स्तरांवर, वेगवेगळ्या क्षेत्रांत बाबासाहेबांनी उत्तुंग कामगिरी केली असली तरी त्यांची काही स्वप्ने अपुरी राहिली असून, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास भारत महासत्ता हाेण्यापासून कुणीही राेखू शकणार नाही. पत्नी माई आंबेडकर, चरित्रकार धनंजय कीर, स्वीय सहायक नानकचंद रत्तू आणि अनुयायी चांगदेव खैरमोडे लिखित ग्रंथ यासाठी मार्गदर्शक ठरतात. त्यात आलेल्या उल्लेखानुसार, दि. ६ डिसेंबर १९५६ राेजी हाेणाऱ्या अखिल भारतीय जैन परिषदेत डाॅ. बाबासाहेब भूमिका मांडू शकले असते तर देशातील चित्र निश्चितच वेगळे असते, असे डाॅ. देवळेकर म्हणतात.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी दि. ४ डिसेंबर १९५६ राेजी सकाळी अकराच्या सुमारास ‘जैन’ धर्माचे काही लोक घरी आले हाेते. या मंडळींनी बाबासाहेबांशी जैन आणि बौद्ध धर्मांतील तत्त्वांची सम आणि विषम स्थळे यावर प्रदीर्घ चर्चा केली. तसेच ‘श्रमण परंपरेतील या दाेन्ही धर्मांतील लोकांचा मिलाफ करण्याच्या दृष्टीने आपण योजना आखावी,’ अशी विनंती जैन धर्मगुरूंनी बाबासाहेबांना केली. त्यावर बाबासाहेब म्हणाले, ‘यासंबंधी आपण उद्या (दि. ५ डिसेंबर १९५६) रात्री अधिक चर्चा करू,’ असे म्हणून निराेप घेतला. ही माहिती सर्व चरित्रकारांनी आपल्या लेखनात नमूद केली आहे.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी (दि. ५ डिसेंबर १९५६) जैन मंडळी बाबासाहेबांना भेटण्यास येणार हाेती. तत्पूर्वी बाबासाहेबांनी आपल्या ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेवर शेवटचा हात फिरवला. ठरल्याप्रमाणे जैन शिष्टमंडळ आले. खरे तर त्या दिवशी बाबासाहेबांचे स्वास्थ्य चांगले नव्हते. त्यामुळे नानकचंद रत्तू यांच्याकडे त्यांनी निरोप दिला की, ‘मी फार थकलो आहे. त्यांना उद्या बोलवा.’ क्षणात सांगतात, त्यांना थांबायला सांग. आणि बाबासाहेब आवरून त्यांना भेटतात. जैन विद्वानांनी बाबासाहेबांना नमस्कार केला. त्यांच्यात बौद्ध आणि जैन यांचे धार्मिक ऐक्य घडवण्यासाठी काय करता येईल? यावर चर्चा झाली.

त्याच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात दि. ६ डिसेंबरला जैनांचे एक संमेलन दिल्लीत भरणार होते, त्याविषयी शिष्टमंडळाने बाबासाहेबांना माहिती दिली. त्यात ‘बौद्ध धर्म आणि जैन धर्म’ या विषयावर बाबासाहेबांनी मत मांडावे, अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. जैन मंडळींनी बाबासाहेबांना सदिच्छा भेट म्हणून ‘श्रमण संस्कृति की दो धाराएँ : जैनिजम और बुद्धिजम’ ही पुस्तिका भेट दिली. बाबासाहेबांनी ती पुस्तिका चाळत आस्थापूर्वक व तपशीलवार चर्चा केली. बाबासाहेबांचे जैन आणि बौद्ध या दोन्ही धर्मांचे सखोल आकलन बघून जैन शिष्टमंडळ अतिशय प्रभावित झाले. तसेच ‘६ तारखेला संध्याकाळी ठरवूया,’ असे त्यांनी बाबासाहेबांना सांगितले.

श्रमण परंपरेतील बौद्ध आणि जैन हे दोन वेगवेगळे विचारप्रवाह नसून, त्या एकाच वृक्षाच्या वेगवेगळ्या फांद्या आहेत. त्यांच्यातील साम्यस्थळे बघता भविष्यात हातात हात घालून काम करतील. यासाठी श्रमणपरंपरा पुनर्जीवित करणे हे ऐतिहासिक कार्य आहे; कारण हे दोन्ही धर्म माणसाला आत्मकल्याणकारी, अंत:प्रज्वलित, डोळस बनवतात. बाबासाहेबांचे विवेचन शिष्टमंडळाला मनापासून पटले. त्यावर ‘असे असल्यास आम्हीसुद्धा आपले नेतृत्व स्वीकारू आणि या परंपरेचे पाईक होऊ,’ असे आश्वासन जैन शिष्टमंडळाने बाबासाहेबांना दिले आणि तपशीलवार कार्यक्रम ठरवूया, असे सांगत निरोप घेतला, असा उल्लेख अनेक ग्रंथात आहे.

टॅग्स :PuneपुणेDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरIndiaभारतSocialसामाजिकcultureसांस्कृतिक