शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

...तर आपच्या २२ ही जागा आल्या नसत्या : बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 12:37 IST

काँग्रेसची साथ घेतली नाही, म्हणून आप पक्ष वाचला. ते दोघे एकत्र लढले असते तर सर्व ७० जागा भाजपच्या आला असत्या

पुणे : काँग्रेस आणि आम आदमी पक्ष (आप) वेगळे लढल्याने भाजपला फायदा झाला, असे म्हणण्यात काही तथ्य नाही. महाराष्ट्रात सर्व एकत्र होते, काय फरक पडला. काँग्रेससोबत आप पक्ष लढला असता तर त्याच्या २२ सुद्धा जागा निवडून आल्या नसत्या. काँग्रेसची साथ घेतली नाही, म्हणून आप पक्ष वाचला. ते दोघे एकत्र लढले असते तर सर्व ७० जागा भाजपच्या आला असत्या, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित हिंदू गर्जना प्रतिष्ठान कुस्ती चषक स्पर्धेस बावनकुळे यांनी शनिवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. समवेत भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, बालन ग्रुपचे पुनीत बालन उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, दिल्लीत भाजपला मिळालेला विजय ऐतिहासिक आहे. दिल्लीतील ७० पैकी ४८ जागांवर भाजपला विजयी करून दिल्लीकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर विश्वास टाकला आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व जे. पी. नड्डा यांच्या संघटन कौशल्यामुळे २७ वर्षांनंतर भाजपला हा मोठा विजय मिळाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी अजूनही महाराष्ट्राचा निकाल पचवत नाहीत. त्यांनी आत्मपरीक्षण करून संघटनेमध्ये फेरबदल केले असते. तर चांगले दिवस आले असते, असेही ते म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत कोणी दोषी आढळत नाही, तोपर्यंत कोणाचाही राजीनामा घेणार नाही. मुंडे दोषी निघाले तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बोलण्याइतकी उंची राहुल सोलापूरकरांची नाही. अशा व्यक्तीने महाराजांच्या इतिहासावर किंतु, परंतु करणे योग्य नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad transportरस्ते वाहतूकCrime Newsगुन्हेगारी