शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

...तर आपच्या २२ ही जागा आल्या नसत्या : बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 12:37 IST

काँग्रेसची साथ घेतली नाही, म्हणून आप पक्ष वाचला. ते दोघे एकत्र लढले असते तर सर्व ७० जागा भाजपच्या आला असत्या

पुणे : काँग्रेस आणि आम आदमी पक्ष (आप) वेगळे लढल्याने भाजपला फायदा झाला, असे म्हणण्यात काही तथ्य नाही. महाराष्ट्रात सर्व एकत्र होते, काय फरक पडला. काँग्रेससोबत आप पक्ष लढला असता तर त्याच्या २२ सुद्धा जागा निवडून आल्या नसत्या. काँग्रेसची साथ घेतली नाही, म्हणून आप पक्ष वाचला. ते दोघे एकत्र लढले असते तर सर्व ७० जागा भाजपच्या आला असत्या, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित हिंदू गर्जना प्रतिष्ठान कुस्ती चषक स्पर्धेस बावनकुळे यांनी शनिवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. समवेत भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, बालन ग्रुपचे पुनीत बालन उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, दिल्लीत भाजपला मिळालेला विजय ऐतिहासिक आहे. दिल्लीतील ७० पैकी ४८ जागांवर भाजपला विजयी करून दिल्लीकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर विश्वास टाकला आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व जे. पी. नड्डा यांच्या संघटन कौशल्यामुळे २७ वर्षांनंतर भाजपला हा मोठा विजय मिळाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी अजूनही महाराष्ट्राचा निकाल पचवत नाहीत. त्यांनी आत्मपरीक्षण करून संघटनेमध्ये फेरबदल केले असते. तर चांगले दिवस आले असते, असेही ते म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत कोणी दोषी आढळत नाही, तोपर्यंत कोणाचाही राजीनामा घेणार नाही. मुंडे दोषी निघाले तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बोलण्याइतकी उंची राहुल सोलापूरकरांची नाही. अशा व्यक्तीने महाराजांच्या इतिहासावर किंतु, परंतु करणे योग्य नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad transportरस्ते वाहतूकCrime Newsगुन्हेगारी