शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पोलीस पाटलांमुळे दुष्काळातही रोखल्या चोऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 14:22 IST

जुन्नर तालुक्यामध्ये सध्या ४० महिला पोलीस पाटलांसह एकूण १४० पोलीस पाटील गावाच्या कारभारात कार्यरत आहेत.

ठळक मुद्देमानधन तुटपुंजे; पण जबाबदारी मोठी 

राजुरी : जुन्नर तालुक्यात सध्या दुष्काळाच्या झळा वाढल्या आणि दुष्काळात हाताला काम नसल्याने अनेक वेळा चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे चित्र बहुतांश गावात दिसते. मात्र, जुन्नर तालुक्यात मात्र कधी नव्हे ते यंदा मोठा दुष्काळ असतानाही चोऱ्यांच्या प्रमाणाला आळा बसला आहे. याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे तालुक्यात कार्यरत असलेले १४० पोलीस पाटील.जुन्नर तालुक्यामध्ये मागील वर्षी शासनाने पोलीस पाटलांसाठी लेखी परीक्षा घेतली होती. त्यामध्ये युवक वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. सदर परीक्षा पास झालेल्या ८० पोलीस पाटलांना २८ एप्रिल २०१८ रोजी नियुक्तीचे पत्र दिले होते. जुन्नर तालुक्यामध्ये सध्या ४० महिला पोलीस पाटलांसह एकूण १४० पोलीस पाटील गावाच्या कारभारात कार्यरत आहेत. यामध्ये तरुण आणि सुशिक्षित पाटलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कायदा व सुरक्षा राखण्यासाठी मोठी मदत तालुक्याला होत आहे.जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील एकूण २२ पाटील असून यामध्ये काळवाडी, नळवणे झापवाडी, शिंदेवाडी या चार गावांवर महिला पाटील कार्यरत आहेत. या महिला असूनही मोठ्या हिरिरीने गावची पाटिलकी सांभाळत आहे. पूर्वी दुष्काळ म्हटले की, चोऱ्यांचे प्रमाण वाढायचे. मात्र जुन्नर तालुक्यामध्ये अनेक गावात पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ग्रामसुरक्षादल स्थापन करण्यात आली. याचे प्रमुखपद गावचे पोलीस पाटील असतात यामध्ये रात्रीच्या वेळी गावामध्ये गस्त घालण्यात येते. यामध्येसुद्धा या पोलीस पाटलांनी आपली भूमिका चोखपणे बजावल्यामुळे चोरीच्या प्रमाणात घट झाली आणि गावातील नागरिक सुद्धा निर्धास्त झाले.  शिवाय पोलिसांशी सातत्याने संपर्कात राहतात  त्यामुळे पोलिसांवरील ताण बहुतांश प्रमाणात कमी झाला आहे. ...........मानधन तुटपुंजे; पण जबाबदारी मोठी पोलीस पाटील हा  गाव आणि प्रशासनामधील महत्त्वाचा दुवा झाला आहे. सध्या पोलीस पाटलांना शासनातर्फे दर महिन्याला सहा हजार रुपये मानधन दिले जाते; मात्र ते अत्यंत तुटपुंजे आहे. रात्रीच्या वेळी कोणत्याही क्षणी कायद्या व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर, स्वसंरक्षणासाठी  कोणतेही साधन नसताना घटनास्थळी धाव घ्यावी लागते. याबाबत शासनाने पाटलांना शस्त्र परवाना देण्यात यावा. तसेच, ग्रामपंचायतीजवळच पोलीस पाटलांचे स्वतंत्र कार्यालय केल्यास ग्रामस्थांना पोलीस पाटलांशी संवाद साधता येईल. 

टॅग्स :Junnarजुन्नरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी