शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Bharat Gaurav Railway: 'भारत गौरव'ची तिसरी रेल्वे मुंबईतून २३ तारखेला सुटणार

By नितीश गोवंडे | Updated: May 20, 2023 17:36 IST

मुंबईहून ही रेल्वे सुटल्यानंतर पुण्याहून प्रवासी घेऊन पुढे रवाना होणार आहे....

पुणे :रेल्वे मंत्रालयाच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेंतर्गत सोडण्यात येणारी तिसरी भारत गौरव रेल्वे येत्या 23 मे रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सुटणार आहे. तर २ जून रोजी पुन्हा ती मुंबईला येणार आहे. या रेल्वेला आयआरसीटीसीकडून ‘श्री रामेश्वरम-तिरुपती : दक्षिण यात्रा’ असे नाव देण्यात आले असून, ही रेल्वे मुंबई-मैसूरु-बेंगळुरू-कन्याकुमारी-तिरूअनंतपुरम-रामेश्वरम-मदुराई-तिरुपती-मुंबई अशी धावणार आहे. मुंबईहून ही रेल्वे सुटल्यानंतर पुण्याहून प्रवासी घेऊन पुढे रवाना होणार आहे.

भारत गौरव यात्रेची पहिली रेल्वे पुणे रेल्वे स्थानकावरून २८ एप्रिल रोजी सुटली होती. ही रेल्वे ‘पुरी-गंगासागर दिव्य काशी यात्रा’ या नावाने धावली. त्यानंतर दुसरी रेल्वे ११ मे रोजी पुण्यातून सुटली. ही गाडी ‘महाकालेश्वर संग उत्तर भारत देवभूमी यात्रा’ या नावाने उत्तर भारतातील पर्यटन स्थळांसाठी सोडण्यात आली होती. आता ही तिसरी रेल्वे मुंबईतून दक्षिणेकडे जाणार आहे. ७५० प्रवासी या रेल्वेतून प्रवास करू शकणार आहेत.

‘भारत गौरव’ रेल्वेत या सुविधा मिळणार..- स्थानिक स्थळांची माहिती मिळणार- सोबतीला गाइड असणार- मुक्कामाच्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था- रेल्वेतच जेवणाची व्यवस्था- हॉटेल ते रेल्वे स्थानक आणि हॉटेल ते स्थानिक स्थळांसाठी वाहनाची सोय- पॅकेजमध्येच या सर्व बाबींचे शुल्क आकारले असल्याने, प्रवाशांना वेगळे शुल्क देण्याची गरज नाही

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडrailwayरेल्वे