शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Pune By Election: व्हाॅट्सॲपवरचं 'ते' निमंत्रण व्हायरल झालं अन् नेते संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 16:34 IST

राजकारणातील रूसवे-फुगवे साधे नसतात, लग्नातल्यापेक्षाही अवघड असतात

राजू इनामदार 

- साधा फोटो तो काय?; पण राजकारणात त्यालाही फार महत्त्व असतं. त्यावरून लग्नात होत नाहीत असे रुसवेफुगवे, मानापमान होतात. आत्ता सुरू असलेल्या कसब्यातील पोटनिवडणुकीचंच घ्या ना. एका उमेदवाराने अर्ज भरायला जातानासाठीचं म्हणून निमंत्रण तयार केलं. आजच्या पद्धतीप्रमाणे ते व्हाॅट्सॲपवरचं होतं. पक्षाच्या सगळ्या नेत्यांची छायाचित्रं त्यात त्यानं घेतली. मित्रपक्षाच्या नेत्यांनाही त्यात आवर्जून स्थान दिलं. तरीही एक राहिलंच. त्याच्याच पक्षातील नेत्याचं. तेही निवडणूक असलेल्या मतदारसंघातल्याच एका नेत्याचं. माजी लोकप्रतिनिधी ते. मान्यवर, प्रसिद्ध व विद्वानही.

व्हाॅट्सॲपवरचं निमंत्रण ते. अवघ्या काही मिनिटात व्हायरल झालं. त्या नेत्यांनाही गेलं. संतापले ना ते. हा काय प्रकार? नेते नाराज झाले. गेले निघून परगावी. बसा म्हटले तुमचे तुम्हीच प्रचार करत. उमेदवारापर्यंत सगळी माहिती पोहचली. त्याच्या समर्थकांनाही समजली. निवडणुकीत असे कोणी नाराज होणं परवडत नाही. उमदेवाराला तर नाहीच नाही. मग काय तर? त्यांनी फोन केला, उचलला नाही. भेट घ्यावी म्हटले तर माणूस जागेवर नाही.

नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फोन करून सांगितले. तुम्हालाच शोधताहेत उमेदवार. नेते म्हणाले, होऊ दे त्याला जरा जाणीव. त्याशिवाय नाही येणार.’ आता उमेदवाराचे समर्थक त्या नेत्याचा ‘रूसवा’ काढण्याच्या प्रयत्नात आहेत. काहीतरी करून त्यांना प्रचारात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकारणातील रूसवे-फुगवे साधे नसतात, लग्नातल्यापेक्षाही अवघड असतात.

सन १९८५ मध्येही काँग्रेसला मिळाला होता विजय 

बहुतेकांना वाटते की कसबा मतदारसंघ काँग्रेसने १९९२ च्या पोटनिवडणुकीतच जिंकला; पण सन १९८५ च्या नियमित निवडणुकीतही काँग्रेसने या मतदारसंघात विजय मिळवला होता. शिवसेनेचे त्यावेळचे कसब्यातील नगरसेवक असलेल्या काळोखे यांना बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ या तेव्हाच्या काँग्रेसच्या बड्या हस्तीने १९८३ मध्ये पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर सन १९८५ मध्ये थेट विधानसभेची उमेदवारीच दिली. त्यावेळचे भाजपचे उमेदवार होते डॉ. अरविंद लेले. आधी २ वेळा ते विजयी झालेच होते. त्यामुळे त्यांचा विजय भाजपच्या सर्वांनाच सोपा वाटत होता. त्यात काळोखे बाहेरून आलेले. तशी टीकाही भाजपने केली. मतदानच काय पण मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हासुद्धा भाजपचे कार्यकर्ते अगदी निवांत होते. त्यात सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये डॉ. लेले बरेच पुढे गेले. काळोखे मागेच राहिले. अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये त्यांनी बरोबरी साधली व शेवटची फेरी झाली त्यावेळी ते काही हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसElectionनिवडणूकPoliticsराजकारण