शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

Pune By Election: व्हाॅट्सॲपवरचं 'ते' निमंत्रण व्हायरल झालं अन् नेते संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 16:34 IST

राजकारणातील रूसवे-फुगवे साधे नसतात, लग्नातल्यापेक्षाही अवघड असतात

राजू इनामदार 

- साधा फोटो तो काय?; पण राजकारणात त्यालाही फार महत्त्व असतं. त्यावरून लग्नात होत नाहीत असे रुसवेफुगवे, मानापमान होतात. आत्ता सुरू असलेल्या कसब्यातील पोटनिवडणुकीचंच घ्या ना. एका उमेदवाराने अर्ज भरायला जातानासाठीचं म्हणून निमंत्रण तयार केलं. आजच्या पद्धतीप्रमाणे ते व्हाॅट्सॲपवरचं होतं. पक्षाच्या सगळ्या नेत्यांची छायाचित्रं त्यात त्यानं घेतली. मित्रपक्षाच्या नेत्यांनाही त्यात आवर्जून स्थान दिलं. तरीही एक राहिलंच. त्याच्याच पक्षातील नेत्याचं. तेही निवडणूक असलेल्या मतदारसंघातल्याच एका नेत्याचं. माजी लोकप्रतिनिधी ते. मान्यवर, प्रसिद्ध व विद्वानही.

व्हाॅट्सॲपवरचं निमंत्रण ते. अवघ्या काही मिनिटात व्हायरल झालं. त्या नेत्यांनाही गेलं. संतापले ना ते. हा काय प्रकार? नेते नाराज झाले. गेले निघून परगावी. बसा म्हटले तुमचे तुम्हीच प्रचार करत. उमेदवारापर्यंत सगळी माहिती पोहचली. त्याच्या समर्थकांनाही समजली. निवडणुकीत असे कोणी नाराज होणं परवडत नाही. उमदेवाराला तर नाहीच नाही. मग काय तर? त्यांनी फोन केला, उचलला नाही. भेट घ्यावी म्हटले तर माणूस जागेवर नाही.

नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फोन करून सांगितले. तुम्हालाच शोधताहेत उमेदवार. नेते म्हणाले, होऊ दे त्याला जरा जाणीव. त्याशिवाय नाही येणार.’ आता उमेदवाराचे समर्थक त्या नेत्याचा ‘रूसवा’ काढण्याच्या प्रयत्नात आहेत. काहीतरी करून त्यांना प्रचारात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकारणातील रूसवे-फुगवे साधे नसतात, लग्नातल्यापेक्षाही अवघड असतात.

सन १९८५ मध्येही काँग्रेसला मिळाला होता विजय 

बहुतेकांना वाटते की कसबा मतदारसंघ काँग्रेसने १९९२ च्या पोटनिवडणुकीतच जिंकला; पण सन १९८५ च्या नियमित निवडणुकीतही काँग्रेसने या मतदारसंघात विजय मिळवला होता. शिवसेनेचे त्यावेळचे कसब्यातील नगरसेवक असलेल्या काळोखे यांना बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ या तेव्हाच्या काँग्रेसच्या बड्या हस्तीने १९८३ मध्ये पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर सन १९८५ मध्ये थेट विधानसभेची उमेदवारीच दिली. त्यावेळचे भाजपचे उमेदवार होते डॉ. अरविंद लेले. आधी २ वेळा ते विजयी झालेच होते. त्यामुळे त्यांचा विजय भाजपच्या सर्वांनाच सोपा वाटत होता. त्यात काळोखे बाहेरून आलेले. तशी टीकाही भाजपने केली. मतदानच काय पण मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हासुद्धा भाजपचे कार्यकर्ते अगदी निवांत होते. त्यात सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये डॉ. लेले बरेच पुढे गेले. काळोखे मागेच राहिले. अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये त्यांनी बरोबरी साधली व शेवटची फेरी झाली त्यावेळी ते काही हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसElectionनिवडणूकPoliticsराजकारण