शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
2
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
3
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
4
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
5
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
6
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
7
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
8
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
9
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
10
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
11
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
12
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
13
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
14
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
15
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
16
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

...तर सत्तेचे चक्र उलटू शकते; नरहरी झिरवळ पुन्हा हंगामी सभापती होऊ शकतात, तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 10:50 IST

आजवरच्या राजकीय इतिहासात असा पेचप्रसंग कधीही निर्माण झालेला नाही.

पुणे : पक्षांतर बंदी कायद्यातील अनुच्छेद २ आणि ४ नुसार १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईचा निर्णय ठरणार आहे. आमदार अपात्र ठरवले जाणारच नाहीत, असे कुणी सांगू शकत नाही. घटनाक्रम उलटाही फिरू शकतो. नरहरी झिरवळ हे पुन्हा हंगामी सभापती होऊन आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते अथवा सात ते नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाच्या कोर्टात हा चेंडू टाकला जाऊ शकतो. 

आजवरच्या राजकीय इतिहासात असा पेचप्रसंग कधीही निर्माण झालेला नाही. त्यामुळे लोकशाहीच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, असा सूर घटनातज्ज्ञ आणि कायद्याच्या अभ्यासकांनी परिसंवादात आळवला. निमित्त हाेते, पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयाेजित परिसंवादाचे. त्यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकरराव आव्हाड आणि घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट, ॲड. असीम सरोदे सहभागी झाले होते. यावेळी संघाचे अध्यक्ष स्वप्निल बापट आणि सरचिटणीस पांडुरंग सरोदे उपस्थित होते.

ॲड. आव्हाड म्हणाले, ‘सभापती आणि उपसभापती यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव हा विचाराधीन असला पाहिजे; पण मुळात ठराव आहे का? तो ईमेल वर पाठवण्यात आला, जो अधिकृत नव्हता. तरीही नरहरी झिरवळ यांच्याविरूद्ध अविश्वासाचा ठराव करून कांगावा करण्यात आला. शिंदे गटाला दहाव्या परिशिष्टानुसार कोणत्या तरी पक्षात विलीनीकरण करावे लागेल. लोकशाहीमध्ये सगळे लिहिलेले नसते; पण काही संकेत आहेत. आज लोकशाही पायदळी तुडवली जात आहे. नैतिक गोष्टी कुणालाही नको आहेत.

पक्षांतर करणारा लोकप्रतिनिधी हा लोकशाहीचा गुन्हेगार असतो. त्यामुळे १९८५ मध्ये लागू करण्यात आलेला  ‘पक्षांतर बंदीचा’ कायदा अधिक कडक करण्याची गरज असल्याचे कायदेतज्ज्ञांनी सांगितले.शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केलेल्या कृतीतून त्यांनी पक्ष सोडला हे सिद्ध होत आहे. सध्या राज्यात घडणारा घटनाक्रम लोकशाहीला ढवळून काढणारा असल्याचे ॲड. असीम सरोदे म्हणाले.दोन तृतीयांश आमदार फुटले असले तरी त्यांना कोणत्या तरी पक्षात विलीनीकरण करावे लागेल. कोणता गट खरा? कोणत्या पक्षाला कोणते चिन्ह द्यायचे? हा सर्वस्वी निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, असे सुधाकरराव आव्हाड यांनी सांगितले.

पक्षांतर बंदी कायद्यानुसार पक्ष सोडता येणार नाही. देशातला सर्वात मोठा प्रश्न हा विश्वासार्हतेचा आहे. आपला कुणावरच विश्वास राहिलेला नाही. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचे पटत नसेल तर राज्यपालाला परत बोलवावे लागते. मात्र, त्यांना हटवणे हे सर्वस्वी पंतप्रधानांच्या हातात असते.- डॉ. उल्हास बापट, घटनातज्ज्ञ 

राज्यपाल, सभापती आणि निवडणूक आयोग हे महत्वपूर्ण घटनात्मक अंग आहेत. यात सर्वोच्च न्यायालयाचा काही संबंध नाही, घटनेचे योग्य पालन केले जात आहे का नाही हे पाहण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेला स्थगिती दिल्यामुळे घटनात्मक पेच निर्माण झाला आहे.- सुधाकरराव आव्हाड, ज्येष्ठ विधिज्ज्ञ 

राजकीय नेत्यांचा संविधानाशी काही सबंध आहे, असे वाटत नाही. संविधानाची मोडतोड करून त्याचे नुकसान करणारे नेतृत्व म्हणजे लोकशाहीला लागलेले ग्रहण आहे. आमदार अपात्र ठरले तर आगामी निवडणूक लढवू शकणार नाहीत, अशी तरतूद दहाव्या परिशिष्टामध्ये करावी लागेल.- ॲड. असीम सरोदे,  कायद्याचे अभ्यासक

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे