शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

योग्य उपचार हीच मात्रा; ‘जीबीएस’चा रुग्ण वेळेत होऊ शकतो बरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:34 IST

खोट्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

-  अंबादास गवंडीपुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात गुईनेल बॅरी सिंड्रोम (जीबीएस) रुग्णांची संख्या वाढत असली तरी हळूहळू त्याचा प्रभाव कमी हाेत आहे. हा आजार दुर्मिळ असून, बरा होण्यासाठी पाच ते सहा महिने कालावधी लागत आहे. वेळेत निदान आणि उपचार झाल्यास रुग्ण लवकर बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.गेल्या एक महिन्यापासून पुणे शहर आणि जिल्ह्यात जीबीएसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. हा आजार दुर्मिळ असल्यामुळे रुग्ण बरा होण्यासाठी वेळ लागतो. शिवाय उपचाराचा खर्च खूप असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या आजाराबाबत अनेक तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहे. परंतु केंद्र शासनाकडून जीबीएसच्या उपचारपद्धती आणि रुग्णांच्या पुनर्वसनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जीबीएस आजाराची तीव्रता लक्षात घेऊन इम्युनोथेरपी, इंट्राव्हिनस इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शन आणि प्लाझ्मा फेरेसिस करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे, रुग्णांना घरी सोडल्यावर स्नायूंची ताकद आणि कार्य वाढवण्यासाठी फिजिओथेरपी, आजारामुळे आलेले नैराश्य दूर करण्यासाठी मानसिक आधार, औषधोपचार आणि डॉक्टरांचा सल्ल्यावर भर दिला तर हे रुग्ण वेळेत बरे होतील. प्लाझ्मा, आयव्हीआयजी असे दोन प्रकारे उपचार ‘जीबीएस’च्या रुग्णांवर प्लाझ्मा आणि ‘आयव्हीआयजी’ इंजेक्शनद्वारे उपचार केले जातात. प्लाझ्मा उपचार पद्धतीत रुग्णाच्या शरीरातील दूषित प्लाझ्मा काढून तो बदलला जातो. याच वेळी ‘आयव्हीआयजी’ उपचारांमध्ये रुग्णाला ‘इम्युनोग्लोब्युलिन’ इंजेक्शन दिली जाते. अशा रुग्णांना आयव्हीआयजी इंजेक्शनचे देण्यात येते. यामुळे शरारीत जीबीएसचे जे ॲटिबाॅडी तयार झाले आहेत, त्यांना अकार्यक्षम करण्याचे काम इंजेक्शनद्वारे केले जाते. ‘जीबीएस’चा प्रभाव कमीजानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात गुईलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. परंतु या आजाराची तीव्रता सध्या कमी झाली असून, नव्याने सापडणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. यामुळे दिलासा मिळाला आहे. गुरुवारपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून एकूण संशयित रुग्णसंख्या १७३ पाेहोचली आहे. परंतु यापैकी ६२ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. मज्जातंतूवर होतो परिणामगुईलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा दुर्मीळ प्रकारचा आजार असून, या आजारात रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर मज्जातंतूवर परिणाम होतो. त्यामुळे पायाच्या व हातांच्या स्नायूंमधील ताकद कमी होते. श्वास घेण्यास त्रास होतो. साधारणपणे अतिसार, जुलाब, उलट्या तसेच फ्लू सारखे आजार झालेल्या रुग्णांमध्ये हा आजार आढळून येतो.

दिनांक सापडलेले रुग्ण१ फेब्रुवारी ०९२ फेब्रुवारी ०६३ फेब्रुवारी ०४४ फेब्रुवारी ०३५ फेब्रुवारी ०४६ फेब्रुवारी ०३

दोन आठवड्यांत उपचार घेणे आवश्यक आहे. आयव्हीआयजी इंजेक्शन आणि प्लाझ्माद्वारे यावर उपचार केले जातात. रुग्णांच्या रक्तांमध्ये जे अँटिबाॅडी तयार झाले आहेत, त्याचा प्रभाव कमी करतात; परंतु जे अँटिबाॅडी नसांना चिकटलेले आहेत, त्यांना निघायला वेळ लागतो. त्यामुळे दोन आठवडे आजार वाढतो. त्यानंतर दोन आठवडे स्थिर राहतो. चार ते सहा आठवड्यांनी आजार कमी होण्यास सुरुवात होते. मात्र, काही रुग्णांना वेळ लागतो.- डाॅ. नीलेश पळसदेवकर, न्यूरोलाॅजिस्ट

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी