शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

पाऊस कोपला अन् घास हिरावला! विम्याच्या दाव्यासाठी राज्यात ७६.३६ लाख तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 13:00 IST

सर्वाधिक १० लाख तक्रारी एकट्या बीड जिल्ह्यातून आल्या आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: यंदा वेळेवर दाखल झालेल्या मान्सूनने खरिपातील पेरण्या साधल्या. मात्र, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर तसेच ऑक्टोबरमधील परतीच्या पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे खरीप पिक विमा काढलेल्या राज्यातील शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे नुकसान भरपाईसाठी सुमारे ७६ लाख ३६ हजार तक्रारी अर्थात दावे दाखल केले आहेत. या सर्वेक्षणाचे क्षेत्रीय पातळीवर सुरू असून नुकसान भरपाईबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. सर्वाधिक १० लाख तक्रारी एकट्या बीड जिल्ह्यातून आल्या आहेत.

राज्यात यंदा पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत १ कोटी ६५ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. ऑक्टोबरमध्ये आलेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे आणखीन नुकसान झाले त्यामुळे हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. त्यामुळेच नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे तब्बल ७६ लाख ३६ हजार ८६७ तक्रारी दाखल केल्या आहेत.

शंभर टक्के नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षणाची गरज

- याबाबत आवटे म्हणाले, “नुकसानीचे सर्वेक्षण क्षेत्रीय पातळीवर सुरू आहे. विमा संरक्षित क्षेत्राच्या पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान झाले असल्यास नुकसानाची तीव्रता जास्त असल्याचे गृहीत धरून सरासरी ३० टक्के नुकसानग्रस्त नमुन्यांचे सर्वेक्षण केले जाते. यातून आलेल्या नुकसानीची सरासरी काढून त्याचा भरपाई दावा काढण्यात येईल. व त्यानुसार सर्व क्षेत्रावरील शेतकऱ्यांचे समान नुकसान झाल्याचे गृहित धरण्यात येते. त्यामुळे सर्व शंभर टक्के नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याची गरज भासत नाही.- राज्यात ही स्थिती सर्वदूर आहे. या नुकसानीचा अहवाल तालुका स्तरावरील समितीकडून जिल्हास्तरावर पाठविला जाईल. त्यानंतर राज्यस्तरावर त्या संदर्भात निर्णय घेऊन नुकसान भरपाईबाबत सरकारकडे अहवाल सादर करण्यात येईल त्यानुसार विमा कंपन्यांना नुकसान भरपाईसाठी आदेश देण्यात येतील.” - शेतकऱ्यांना या तक्रारी ऑनलाईन व ऑफलाईनही करता येतात. त्यात ७६ लाख २० हजार २४४ तक्राी ऑनलाईन तर १६ हजार ६२३ तक्रारी ऑफलाईन आल्या आहेत. सर्वाधिक १० लाख ८७ हजार ९४४ तक्रारी एकट्या बीड जिल्ह्यातून आल्या आहेत. त्या खालोखाल ८ लाख ९ हजार २३५ तक्री नांदेड जिल्ह्यातून आल्या आहेत. या पावसाचा सर्वात मोठा फटका, उडीद, मूग, सोयाबीन, कापूस, भाजीपाला, बाजरी या पिकांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.

परतीच्या पावसाचे धूमशान; दोन दिवस अलर्ट

- नाशिक/जळगाव/ नागपूर : राज्यात परतीच्या पावसाने राज्याच्या बहुसंख्य भागात धुमाकूळ घातले असून, पिकांची नासाडी केली आहे. विशेषत: खान्देशातील जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. त्यातच हवामान खात्याने आणखी दोन दिवस पावसाचा अलर्ट जारी केला आहे. - गुरुवारपासून नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने देवळा आणि सुरगाणा येथे पिकांसह घरांचे नुकसान केले आहे. कांदा आणि भात पिकासाठी हा पाऊस नुकसानदायक असून, जिल्ह्यातील धरणांमधून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

वीज पडून ११ वर्षीय बालक ठार

जळगाव: जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी रात्री झालेल्या परतीच्या वादळी पावसाने केळी, मका, कपाशी, सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर अंगावर वीज पडल्याने एका ११ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.

जिल्हानिहाय पीक विम्याच्या तक्रारी

नगर    २६४७७९नाशिक    ७३९०१चंद्रपूर    ८७९३७सोलापूर    १९८०७४जळगाव    १३२४२२सातारा    २४६७परभणी    ७१५३४९वर्धा    १८८२७०नागपूर    ९१६२३जालना    ४३५६७२गोंदिया    ३१७कोल्हापूर    ५९२६ठाणे    ३७रत्नागिरी    ४२सिंधुदुर्ग    ६१नांदेड    ८०९३२५संभाजीनगर     ७८४५९०भंडारा    १८६५६पालघर     २६७०रायगड    ६७७वाशिम     २८०६४३बुलढाणा    ४४५११९सांगली     १५७२७नंदुरबार     २९९४४बीड    १०८७९४४हिंगोली    ४९३६००अकोला    २६८५०४धुळे    ६८४१०पुणे    ६३२२धाराशिव    ५५०१६३यवतमाळ    ३९०३१३अमरावती    १०९६५७गडचिरोली    ३४४४लातूर    ७४२८२-------------------एकूण ७६२०२४४-------------------

वीज पडून अमरावतीत दोन ठार

अमरावती : जिल्ह्यात शनिवारी दुपारी वीज पडल्याने दोन व्यक्ती ठार, पाच महिला जखमी झाल्या आहेत. वीज पडून तीन म्हशी, १२ शेळ्या ठार झाल्या. या पावसाने काढणीच्या हंगामात सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRainपाऊस