शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Pashan Lake: पुण्यातील ब्रिटिशकालीन पाषाण तलावाची प्रदूषणामुळे दुर्दशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 15:54 IST

एकेकाळी पुण्याचे वैभव असलेला पाषाण तलाव आज अत्यंत वाईट अवस्थेत आहे

पुणे: एकेकाळी पुण्याचे वैभव असलेला पाषाण तलाव आज अत्यंत वाईट अवस्थेत आहे. पुण्याच्या मध्यभागी असलेला पाषाण तलाव हा मानव निर्मित तलाव असून, गर्व्हनर बंगल्यास (आत्ताचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर ) आणि पाषाण सुतारवाडी भागास पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने ब्रिटिश काळात हा तलाव बांधण्यात आला होता. स्थलांतरित पक्षांचे वस्तीस्थान म्हणून या तलावाची ख्याती होती. अलीकडच्या काळात ढिसाळ व्यवस्थापन, अनियोजित विकास, प्रदूषण इत्यादींमुळे या तलावाची दुर्दशा झाली आहे. या तलावाचे पुनरुज्जीवन पर्यावरणपूरक व्हावे, यासाठी अभ्यासपूर्ण कृती आराखडा तयार करण्यात आला असून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सहकार्याने पाषाण तलावास मूळ स्वरुप प्राप्त करुन देण्यात येणार आहे.

किर्लोस्कर वसुंधराच्या वतीने अतिक्रमण, अस्वच्छता, प्रदूषण आणि राड्यारोड्याच्या विळख्यात सापडलेल्या रामनदीचे पुनरुज्जीवन व्हावे, यासाठी नवनवीन प्रयोग सातत्याने करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाषाण तलावाच्या पुनर्वैभव प्राप्तीसाठी किर्लोस्कर वसुंधराने पुढाकार घेतला असल्याची माहिती इकोलॉजीकल सोसायटीचे संस्थापक आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. गुरूदास नूलकर आणि किर्लोस्कर वसुंधरा रामनदीपुनरुज्जीवन अभियानाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वसुंधरा स्वचछ्ता अभियानाचे अनिल गायकवाड, मिशन ग्राऊंड वॉटरच्या वैशाली पाटकर, जल देवता सेवा अभियानाचे शैलेंद्र पटेल आणि पर्यावरण तज्ज्ञ ज्योती पानसे उपस्थित होते. जल प्रजातींना घातक ठरणा-या बोटींसारख्या सुविधेला परवानगी दिल्याने मानवी हस्तक्षेप वाढला. बावधान, बाणेर, पाषाण या भागात वाढलेल्या शहरीकरणामुळे प्रक्रियामुक्त सांडपाणी सोडले जाऊ लागले. त्यामुळे प्रदूषणात भरच पडली असल्याचे डॉ.नूलकर यांनी सांगितले.

पाषाण तलावाची वैशिष्ट्ये

 पाषाण तलाव परिसर पाणथळ परिसंस्थेने घेरलेला आहे. बशीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेल्या आणि उथळ काठ असलेला हा तलाव नैसर्गिक विविधतेने संपन्न आहे. समृद्ध वैविध्यपूर्ण अधिवास स्थलांतरीत पक्षी आणि जलचरांकरीत उपलब्ध होत होता. परंतू 2008 ते 2013 या काळत तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या नावाथाली इथला वैशिष्ट्यपूर्ण अधिवास नष्ट केला गेला. निलगिरी आणि बांबू यासारखी झाडे लावून इथला नैसर्गिक आधीवास काढूनटाकण्यात आला. पाश्चात्य देशांसह भारतातील दुर्गम भागातून दुर्मिळ प्रजाती आणि पक्षी येथे सातत्याने निसर्गचक्राप्रमाणे नियमितपणे स्थलांतर करून येत होते. 2013 नंतर मात्र, हे चित्र बदलले.

काय करावे लागेल?

तलावाच्या पुनरूज्जीवनासाठी नैसर्गिक इको सिस्टीम उभे करणे गरजेचे आहे. खाटपेवाडी, भुकूम, भूगांव, डिआरडीओ अशी टप्प्या टप्प्याने स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. पाषाण तलावाच्या सभोवतालचे मृदा आणि जल परीक्षण सासत्याने करणे आवश्यक आहे. तलावात कारंजे उभे करून पाण्यातील प्राणवायू 8 पीपीएम पर्यंत आणावा लागेल.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीtourismपर्यटनkatrajकात्रज