शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

फसव्या आघाडीवर महाराष्ट्रातील जनता विश्वास ठेवणार नाही; गजेंद्र सिंह शेखावत यांची टीका

By राजू हिंगे | Updated: November 18, 2024 19:17 IST

लाडकी बहीण योजनेस आघाडीच्या नेते विरोध करून न्यायालयात गेले. पण, आता त्यांनीच स्वतःच्या जाहीरनाम्यात अशीच योजना आणणे हास्यास्पद

पुणे : महाविकास आघाडी सरकारने केवळ जनकल्याणाच्या योजनांना स्थगिती देण्याचेच काम केले. त्यामुळे या काळात महाराष्ट्राचा विकास मंदावला आणि भ्रष्टाचार फोफावला, असा आरोप केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. महायुती सरकारच्या काळात लाडकी बहीण योजनेस महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला आणि न्यायालयात गेले. पण, आता त्यांनीच स्वतःच्या जाहीरनाम्यात अशीच योजना टाकणे हास्यास्पद आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, संजय मयेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, उमेश चौधरी, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले, प्रशांत कोतवाल उपस्थित होते. गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरी बसून सरकार चालवले. त्यामुळे करोना काळात अनेकांचा जीव गेला. करोनाकाळात या सरकारने मोठा भ्रष्टाचार केला. तत्कालीन गृहमंत्र्यांंना तुरुंगात जावे लागले. अशा फसव्या आघाडीवर महाराष्ट्रातील जनता विश्वास ठेवणार नाही. लाडकी बहीण योजनेचा लाभ अडीच कोटी बहिणींना मिळाला आहे. राजस्थानात फसवी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या काँग्रेसने एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. पर्यटनाला चालना पुण्यातील शिवसृष्टी प्रकल्पाला केंद्राने ८० कोटी रुपयांचे साह्य केले आहे. पुण्यातील ऐतिहासिक वारसा देशातील पर्यटन केंद्रांशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यातील दहा किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित व्हावेत, यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. विविध राज्यांनी आठ हजार कोटी रुपयांच्या पर्यटन प्रकल्पांसाठीचे प्रस्ताव पाठवले आहेत, असे गजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Central Governmentकेंद्र सरकारMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी