शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

नवीन पिढीने प्रतिज्ञा केली पाहिजे की मी जातीयता पाळणार नाही; नितीन गडकरींचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 12:29 IST

बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय प्रगतीचे शिखर गाठू शकत नाही

पुणे : आपला देश आता सुपर इकॉनॉमी बनण्याच्या मोडवर आहे. भारत आत्मनिर्भर होईल. आपण इकॉनॉमी पॉवर आत्मसात करू; पण देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता निर्माण होणार आहे. ती दूर झाली पाहिजे. यासाठी सामाजिक व सर्वसमावेशक विचार आवश्यक आहेत, असे मत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

‘नागपूरच्या मारवाडी फाउंडेशन’च्या वतीने ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर म्युझियम अँड मेमोरियल’च्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार यांना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.  या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, माजी खासदार श्रीनिवास पाटील, उद्योजक विठ्ठल मणियार, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, अतुल पोटेचा, डी. आर. मल आणि सुधीर बाहेती आदी मान्यवर उपस्थित होते.

‘देशाचा आर्थिक विकास महत्त्वाचा आहेच. पण त्याचबरोबर सामाजिक व शैक्षणिक मूल्याधिष्टित प्रगती आवश्यक आहे. मात्र, आपल्याकडे विचार भिन्नता नव्हे विचार शून्यता ही समस्या आहे. यासाठी सर्व विचारांचे पालन करणे हे काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे. आज शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे शिक्षण दिले जात आहे. यावर उद्याच्या भारताचे भवितव्य ठरणार आहे. सांप्रदायिकविरहित सामाजिक विचार महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘नवीन पिढीने प्रतिज्ञा केली पाहिजे की मी जातीयता पाळणार नाही. अशी प्रगल्भ संपन्नता एकात्म पद्धतीने पुढे जाईल तेव्हाच बाबासाहेब यांचे स्वप्न पूर्ण होईल. भविष्यातला विद्यार्थी तयार करण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय प्रगतीचे शिखर गाठू शकत नाही असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरPoliticsराजकारणEducationशिक्षण