शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

नवीन पिढीने प्रतिज्ञा केली पाहिजे की मी जातीयता पाळणार नाही; नितीन गडकरींचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 12:29 IST

बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय प्रगतीचे शिखर गाठू शकत नाही

पुणे : आपला देश आता सुपर इकॉनॉमी बनण्याच्या मोडवर आहे. भारत आत्मनिर्भर होईल. आपण इकॉनॉमी पॉवर आत्मसात करू; पण देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता निर्माण होणार आहे. ती दूर झाली पाहिजे. यासाठी सामाजिक व सर्वसमावेशक विचार आवश्यक आहेत, असे मत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

‘नागपूरच्या मारवाडी फाउंडेशन’च्या वतीने ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर म्युझियम अँड मेमोरियल’च्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार यांना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.  या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, माजी खासदार श्रीनिवास पाटील, उद्योजक विठ्ठल मणियार, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, अतुल पोटेचा, डी. आर. मल आणि सुधीर बाहेती आदी मान्यवर उपस्थित होते.

‘देशाचा आर्थिक विकास महत्त्वाचा आहेच. पण त्याचबरोबर सामाजिक व शैक्षणिक मूल्याधिष्टित प्रगती आवश्यक आहे. मात्र, आपल्याकडे विचार भिन्नता नव्हे विचार शून्यता ही समस्या आहे. यासाठी सर्व विचारांचे पालन करणे हे काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे. आज शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे शिक्षण दिले जात आहे. यावर उद्याच्या भारताचे भवितव्य ठरणार आहे. सांप्रदायिकविरहित सामाजिक विचार महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘नवीन पिढीने प्रतिज्ञा केली पाहिजे की मी जातीयता पाळणार नाही. अशी प्रगल्भ संपन्नता एकात्म पद्धतीने पुढे जाईल तेव्हाच बाबासाहेब यांचे स्वप्न पूर्ण होईल. भविष्यातला विद्यार्थी तयार करण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय प्रगतीचे शिखर गाठू शकत नाही असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरPoliticsराजकारणEducationशिक्षण