शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पिढीने प्रतिज्ञा केली पाहिजे की मी जातीयता पाळणार नाही; नितीन गडकरींचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 12:29 IST

बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय प्रगतीचे शिखर गाठू शकत नाही

पुणे : आपला देश आता सुपर इकॉनॉमी बनण्याच्या मोडवर आहे. भारत आत्मनिर्भर होईल. आपण इकॉनॉमी पॉवर आत्मसात करू; पण देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता निर्माण होणार आहे. ती दूर झाली पाहिजे. यासाठी सामाजिक व सर्वसमावेशक विचार आवश्यक आहेत, असे मत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

‘नागपूरच्या मारवाडी फाउंडेशन’च्या वतीने ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर म्युझियम अँड मेमोरियल’च्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार यांना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.  या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, माजी खासदार श्रीनिवास पाटील, उद्योजक विठ्ठल मणियार, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, अतुल पोटेचा, डी. आर. मल आणि सुधीर बाहेती आदी मान्यवर उपस्थित होते.

‘देशाचा आर्थिक विकास महत्त्वाचा आहेच. पण त्याचबरोबर सामाजिक व शैक्षणिक मूल्याधिष्टित प्रगती आवश्यक आहे. मात्र, आपल्याकडे विचार भिन्नता नव्हे विचार शून्यता ही समस्या आहे. यासाठी सर्व विचारांचे पालन करणे हे काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे. आज शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे शिक्षण दिले जात आहे. यावर उद्याच्या भारताचे भवितव्य ठरणार आहे. सांप्रदायिकविरहित सामाजिक विचार महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘नवीन पिढीने प्रतिज्ञा केली पाहिजे की मी जातीयता पाळणार नाही. अशी प्रगल्भ संपन्नता एकात्म पद्धतीने पुढे जाईल तेव्हाच बाबासाहेब यांचे स्वप्न पूर्ण होईल. भविष्यातला विद्यार्थी तयार करण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय प्रगतीचे शिखर गाठू शकत नाही असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरPoliticsराजकारणEducationशिक्षण