शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
2
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
3
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
4
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
5
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
6
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
7
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
8
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
9
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
10
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
11
खराब हवेचे खापर इथिओपियातील ज्वालामुखीवर फोडू नका; प्रदूषणावरून हायकोर्टाने सरकारला सुनावले
12
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
13
ठाण्याची झणझणीत मिसळ की पुण्याचे श्रीखंड; शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी रस्सीखेच?
14
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
15
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
16
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
17
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
18
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
19
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
20
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटना चिंताजनक; राज्य कोणत्या दिशेने चाललंय हा उत्तम नमुना - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 11:30 IST

मणिपुरमधील अवस्थेलाही काँग्रेसला जबाबदार धरण्याची भाजपची भुमिका योग्य नाही

बारामती : ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सार्वजनिक रुग्णालयात हि घटना घडलेली घटना चिंताजनक आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्यात अशी घटना घडली असेल. तर राज्य कोणत्या दिशेने चालले आहे, याचा हा उत्तम नमुना आपल्याला बघायला मिळाला आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलण्याची गरज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.

बारामती येथे गोविंदबाग निवासस्थानी पवार यांनी ठाणे येथील घटनेबाबत चिंता व्यक्त करीत शासनावर टीका केली. पवार पुढे म्हणाले, जयंत पाटील यांच्या बंधुंना ईडीची नोटीस मिळाल्याची माहिती कानावर आली आहे. भाजपचा सत्तेचा गैरवापर करुन हि पावले टाकली जात आहेत. आमच्या काही सहकाऱ्यांना नोटीसा आल्या, त्यानंतर ते भाजपमध्ये जाऊन बसले. तोच प्रयत्न करण्याची भुमिका जयंत पाटील यांच्याबाबत दिसुन येत आहे. मात्र,जयंत पाटील विचारांच्याबाबत स्पष्ट आहेत, याची मला खात्री असल्याचे पवार म्हणाले.   मणिपुरकडे केंद्र सरकारचे लक्ष नाही. संसदेत आम्ही याबाबत चर्चा करण्याची मागणी केली. मात्र आमच्या मागणीकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले. मणिपुरच्या जनतेला दिलासा देण्यासाठी सक्तीची भुमिका घेण्याची गरज आहे. पंतप्रधानांच्या दोन अडीच तासांच्या भाषणात या भुमिकेचा अभाव होता. मणिपुरमधील सध्याच्या अवस्थेला काँग्रेसला जबाबदार धरण्याची भाजपची भुमिका योग्य नाही. ९ वर्षांपासुन भाजपकडे तेथील सत्ता आहे. समजा काँग्रेसने काम चांगले केले नसल्याने तेथील लोकांनी भाजपला संधी दिली. नऊ वर्षापासुन भाजपची तेथे सत्ता आहे. नऊ वर्ष संधी देऊन तुम्ही काय दिवे लावले, अशी  टिका पवार यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाSharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण