शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील घटना चिंताजनक; राज्य कोणत्या दिशेने चाललंय हा उत्तम नमुना - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 11:30 IST

मणिपुरमधील अवस्थेलाही काँग्रेसला जबाबदार धरण्याची भाजपची भुमिका योग्य नाही

बारामती : ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सार्वजनिक रुग्णालयात हि घटना घडलेली घटना चिंताजनक आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्यात अशी घटना घडली असेल. तर राज्य कोणत्या दिशेने चालले आहे, याचा हा उत्तम नमुना आपल्याला बघायला मिळाला आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलण्याची गरज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.

बारामती येथे गोविंदबाग निवासस्थानी पवार यांनी ठाणे येथील घटनेबाबत चिंता व्यक्त करीत शासनावर टीका केली. पवार पुढे म्हणाले, जयंत पाटील यांच्या बंधुंना ईडीची नोटीस मिळाल्याची माहिती कानावर आली आहे. भाजपचा सत्तेचा गैरवापर करुन हि पावले टाकली जात आहेत. आमच्या काही सहकाऱ्यांना नोटीसा आल्या, त्यानंतर ते भाजपमध्ये जाऊन बसले. तोच प्रयत्न करण्याची भुमिका जयंत पाटील यांच्याबाबत दिसुन येत आहे. मात्र,जयंत पाटील विचारांच्याबाबत स्पष्ट आहेत, याची मला खात्री असल्याचे पवार म्हणाले.   मणिपुरकडे केंद्र सरकारचे लक्ष नाही. संसदेत आम्ही याबाबत चर्चा करण्याची मागणी केली. मात्र आमच्या मागणीकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले. मणिपुरच्या जनतेला दिलासा देण्यासाठी सक्तीची भुमिका घेण्याची गरज आहे. पंतप्रधानांच्या दोन अडीच तासांच्या भाषणात या भुमिकेचा अभाव होता. मणिपुरमधील सध्याच्या अवस्थेला काँग्रेसला जबाबदार धरण्याची भाजपची भुमिका योग्य नाही. ९ वर्षांपासुन भाजपकडे तेथील सत्ता आहे. समजा काँग्रेसने काम चांगले केले नसल्याने तेथील लोकांनी भाजपला संधी दिली. नऊ वर्षापासुन भाजपची तेथे सत्ता आहे. नऊ वर्ष संधी देऊन तुम्ही काय दिवे लावले, अशी  टिका पवार यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाSharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण