शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Supriya Sule: सरकारला जरांगे पाटलांच्या तब्येतीची चिंता नाही, याला जबाबदार कोण? सुप्रिया सुळेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 17:28 IST

मराठा, धनगर, मुस्लीम, लिंगायत आणि भटक्या विमुक्त समाजाची आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारने पूर्णपणे फसवणूक केली

पुणे: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी आहे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. उपोषणादरम्यान अन्न पाण्याचा त्याग केल्याने जरांगे पाटील यांची तब्बेत खालावली आहे. त्यावरून सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. जरांगे पाटलांवर सातत्याने उपोषण करण्याची का वेळ आली. त्यांच्या तब्येतीची चिंता नाही यांना, याला जबाबदार कोण, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला आहे. बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 

सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडवणीस गृहमंत्री होतात, तेव्हा क्राइम रेट वाढतो. ड्रग्स,हिट अॅण्ड रनच्या केसेस, महिलांवरील अत्याचार वाढले. सरकारवर मायबाप जनतेचा कसा विश्वास राहणार, असे सुळे म्हणाल्या. पुर्णपणे मराठा, धनगर, मुस्लीम, लिंगायत आणि भटक्या विमुक्त समाजाची आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारने फसवणूक केली. बारामतीत १० वर्षांपुर्वी आंदोलन झाले होते. त्यावेळी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देण्याबाबत शब्द दिला होता. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनाला मुख्यमंत्री स्वत: जातात. त्यानंतर देखील याबाबत निर्णय झालेला नाही. जरांगे पाटलांवर सातत्याने उपोषण करण्याची का वेळ आली. त्यांच्या तब्येतीची चिंता नाही यांना, याला जबाबदार कोण, असा सवाल सुळे यांनी केला. आरक्षण प्रश्नावर निर्माण झालेल्या तणावाला राज्यातील ट्रिपल इंजिन खोके सरकार जबाबदार असल्याचा आरोप सुळे यांनी केला.

या सरकारने पक्ष फोडले , घर फोडल, इन्कम टॅक्स सीबीआय इडीच्या नोटीसा पाठविल्या एवढंच केले. कोणतेही ठोस कामे केली नाहीत. सरकारकडे सांगण्यासारखं काही नाही. त्यामुळे प्रत्येक ‘कॅबिनेट‘ला पंधरा दिवसाला नविन निर्णय घेण्यासारखा ‘गतिमान‘ सरकारला उत्साह कसा आला, असा टोला यावेळी सुळे यांनी लगावला आहे. 

सरकारला उत्त्तरे द्यावी लागतील

महाराष्ट्रात ‘एन्काऊंटर’ शब्द ऐकलेला नाही. हा एन्काऊंटर आहे का, याबाबत स्पष्टता करावी. त्याचा चेहरा काळा कपड्याने झाकलं होत, त्याचे हात बांधले होते, मग तो बंदुकी पर्यंत पोहोचला कसा, पोलिसांना गोळी लागली कशी, एन्काऊंटर झाला कसा हाच मोठा प्रश्न मला पडला आहे. सरकारने हा खटला फास्टट्रॅकद्वारे चालवून जाहिररीत्या आरोपीला फाशी देण्याची ‘कमिटमेंट’ सरकारने केली होती. या प्रकरणी ‘एफ आय आर’ ला किती आणि का वेळ लागला,याची सरकारला उत्त्तरे द्यावी लागतील, यापासून सरकारला सुट्टी नसल्याचा इशारा सुळे यांनी दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलPoliticsराजकारणMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस