शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

मोदी आणि ‘आरएसएस’च्या विचाराने चाललेल्या देशाचे भवितव्यच धोक्यात; बाबा आढावांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:51 IST

लोकशाही संपुष्टात आणून हुकूमशाही आणि दडपशाही आणण्यासाठी लोकांना खिरापती वाटणे, ते न जमल्यास लोकांचे आवाज दडपणे, असे प्रकार मोदी सध्या सर्रास करत आहेत

पुणे : सध्या लोकशाही धोक्यात आली असून आता जर सामान्य जनतेने जागी होऊन संविधान रक्षण केले नाही, तर इतिहास आपल्याला क्षमा करणार नाही. आजच्या मोदी आणि ‘आरएसएस’च्या विचाराने चाललेल्या देशात भारताची लोकशाहीच नव्हे, तर देशाचे भवितव्यच धोक्यात आले आहे, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित आगामी गांधी विचार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन रविवारी (दि.२) डॉ. आढाव, राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजा कांदळकर यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि ‘सत्याग्रही विचारधारा’चे संपादक डॉ. कुमार सप्तर्षी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

गांधी विचार साहित्य संमेलन विशेषांकाचे गांधी भवन येथे दि. ७ ते ९ मार्च २०२५ रोजी होणार आहे. त्यानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या या विशेषांकात गांधीजींच्या जीवन आणि संदेशाविषयी लेखन समाविष्ट करण्यात आले आहे. यावेळी गांधी स्मारक निधीचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, अन्वर राजन, राजा कांदळकर आणि राजेश तोंडे उपस्थित होते.

आढाव म्हणाले, प्रत्येकाने लोकशाही वाचवण्यासाठी संविधान रक्षण करण्यासाठी खारीचा वाटा उचलावा एवढेच कळकळीने सांगण्यासाठी मी या वयातही आवर्जून आलो. लोकशाही संपुष्टात आणून हुकूमशाही आणली आहे आणि दडपशाही आणण्यासाठी लोकांना खिरापती वाटणे, ते न जमल्यास लोकांचे आवाज दडपणे, असे प्रकार मोदी सध्या सर्रास करत आहेत. त्यासाठी त्यांनी सर्व सरकारी यंत्रणा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. महात्मा गांधी यांचे विचारच आजच्या देशातील परिस्थितीवर खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरतील. याचसाठी गांधी विचारांचा यज्ञ म्हणून हे तीन दिवसीय साहित्य संमेलन भरविण्यात आले आहे, अशी माहिती सप्तर्षी यांनी यावेळी दिली.

डॉ. कुमार सप्तर्षी यांचे विचार आणि कार्य पथदर्शक असून त्यांच्यामुळेच मी सामाजिक, राजकीय चळवळीत आलो, असे कांदळकर यांनी सांगितले. आजच्या देशातील परिस्थितीवर मात करायची असेल तर साने गुरुजींचे विचार आठवावे लागतील. देशातील जाती धर्मातील बंधुभाव जो वर जिवंत राहील तोवरच लोकशाही टिकेल, असे साने गुरुजी म्हणाले होते. म्हणूनच देशातील बंधुभाव पूर्णतः नष्ट करण्याचे सर्व प्रयत्न मोदी सरकार करीत आहे. ते हाणून पाडण्यासाठी आपल्याला बंधुभाव एकात्मता आणि समता कायम ठेवावी लागेल, असे मत कांदळकर यांनी व्यक्त केले. देशमुख यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन अभय देशपांडे यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेBaba Adhavबाबा आढावNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ