शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

जिल्ह्याचा पुढील पाच वर्षांचा शेतीचा आराखडा होणार;कृषी विभाग १५ दिवसांत करणार आराखडा

By नितीन चौधरी | Updated: March 6, 2025 19:45 IST

पुणे, मुंबईसारखी बाजारपेठ आंतरराष्ट्रीय विमानतळ या कारणांमुळे शेतमालाला निर्यातीसाठी मोठी संधी आहे.

पुणे  कृषिक्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुणे जिल्ह्यात आगामी पाच वर्षांत उत्पादनवाढीसह निर्यातीवरही भर दिला जाणार आहे. त्यासाठी सर्वंकष आराखडा येत्या पंधरा दिवसांत तयार केला जाणार आहे. हा आराखडा तयार करताना शेतकरी, संशोधन संस्था तसेच कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मते अंतर्भूत केली जाणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला आहे.जिल्ह्यात फुलशेतीसह फळबागांखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहेत. पुणे, मुंबईसारखी बाजारपेठ आंतरराष्ट्रीय विमानतळ या कारणांमुळे शेतमालाला निर्यातीसाठी मोठी संधी आहे. केवळ निर्यातच नव्हे, तर देशांतर्गत बाजारपेठही पुण्यातून मोठ्या प्रमाणावर अंतर्गत वाहतूक केली जाते. मात्र, त्यात सुसूत्रता आणण्यासाठी धोरणात काही बदल करणे गरजेचे आहे. हे लक्षात आल्यानंतर डुडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभाग, प्रगतिशील शेतकरी, बिगरसरकारी संस्थांचे प्रतिनिधी व जिल्ह्यातील संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञांची एकत्रित बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, प्रगतिशील शेतकरी सोपान कांचन, समीर डोळे, जितेंद्र बिडवई, सुनील भगत, भरत शिंदे, मुकुंद ठाकर तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाट, सुनील जाधव, तुळशीराम चौधरी उपस्थित होते.डुडी म्हणाले, जिल्ह्यात व्यावसायिक तत्त्वावर मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. त्यातून फुले तसेच फळांचीदेखील निर्यात होत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत बाजारपेठेत नेमके काय हवे आहे. याचा अभ्यास करून त्यानुसार जिल्ह्यात लागवड होणे गरजेचे आहे. शेतकरी व अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचा पुढील पाच वर्षांसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. यासाठी कृषी विभागाला आराखडा तयार करण्यासाठी सांगण्यात आले आहे.यावेळी डुडी यांनी जिल्ह्यात निर्यातीसह सेंद्रिय शेती यावरही भर देण्याचे निर्देश दिले. यावेळी फूल उत्पादक शेतकऱ्यांनी फुलांच्या वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या कोल्ड चेनची पायाभूत सुविधा निर्माण करावी, अशी मागणी केली. काही शेतकऱ्यांनी निर्यात तसेच आयातीसंदर्भात शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणीही केली.

जिल्ह्याचा शेतीक्षेत्राचा पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार बैठकीत आलेल्या सूचनांचा तसेच तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसांत आराखडा तयार करण्यात येईल. - संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजना