शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा पुढील पाच वर्षांचा शेतीचा आराखडा होणार;कृषी विभाग १५ दिवसांत करणार आराखडा

By नितीन चौधरी | Updated: March 6, 2025 19:45 IST

पुणे, मुंबईसारखी बाजारपेठ आंतरराष्ट्रीय विमानतळ या कारणांमुळे शेतमालाला निर्यातीसाठी मोठी संधी आहे.

पुणे  कृषिक्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुणे जिल्ह्यात आगामी पाच वर्षांत उत्पादनवाढीसह निर्यातीवरही भर दिला जाणार आहे. त्यासाठी सर्वंकष आराखडा येत्या पंधरा दिवसांत तयार केला जाणार आहे. हा आराखडा तयार करताना शेतकरी, संशोधन संस्था तसेच कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मते अंतर्भूत केली जाणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला आहे.जिल्ह्यात फुलशेतीसह फळबागांखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहेत. पुणे, मुंबईसारखी बाजारपेठ आंतरराष्ट्रीय विमानतळ या कारणांमुळे शेतमालाला निर्यातीसाठी मोठी संधी आहे. केवळ निर्यातच नव्हे, तर देशांतर्गत बाजारपेठही पुण्यातून मोठ्या प्रमाणावर अंतर्गत वाहतूक केली जाते. मात्र, त्यात सुसूत्रता आणण्यासाठी धोरणात काही बदल करणे गरजेचे आहे. हे लक्षात आल्यानंतर डुडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभाग, प्रगतिशील शेतकरी, बिगरसरकारी संस्थांचे प्रतिनिधी व जिल्ह्यातील संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञांची एकत्रित बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, प्रगतिशील शेतकरी सोपान कांचन, समीर डोळे, जितेंद्र बिडवई, सुनील भगत, भरत शिंदे, मुकुंद ठाकर तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाट, सुनील जाधव, तुळशीराम चौधरी उपस्थित होते.डुडी म्हणाले, जिल्ह्यात व्यावसायिक तत्त्वावर मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. त्यातून फुले तसेच फळांचीदेखील निर्यात होत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत बाजारपेठेत नेमके काय हवे आहे. याचा अभ्यास करून त्यानुसार जिल्ह्यात लागवड होणे गरजेचे आहे. शेतकरी व अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचा पुढील पाच वर्षांसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. यासाठी कृषी विभागाला आराखडा तयार करण्यासाठी सांगण्यात आले आहे.यावेळी डुडी यांनी जिल्ह्यात निर्यातीसह सेंद्रिय शेती यावरही भर देण्याचे निर्देश दिले. यावेळी फूल उत्पादक शेतकऱ्यांनी फुलांच्या वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या कोल्ड चेनची पायाभूत सुविधा निर्माण करावी, अशी मागणी केली. काही शेतकऱ्यांनी निर्यात तसेच आयातीसंदर्भात शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणीही केली.

जिल्ह्याचा शेतीक्षेत्राचा पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार बैठकीत आलेल्या सूचनांचा तसेच तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसांत आराखडा तयार करण्यात येईल. - संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजना